नाशिक : नाशिकमधील एका नामांकित कंपनीत महिला छळवणूक आणि धर्मांतराशी संबंधित गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी नाशिक येथील मुंबई नाका आणि देवळाली पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणाची मुख्य सूत्रधार म्हणून समोर आलेली २६ वर्षीय निदा खान (Nida Khan) मात्र गेल्या २० दिवसांपासून फरार आहे.
होर्मुज सामुद्रधुनीत सुरू असलेल्या अमेरिकेच्या नाकेबंदीच्या पार्श्वभूमीवर भारतीय एलपीजी जहाज ‘जग विक्रम’ भारतात पोहोचण्यात यशस्वी ठरले आहे. ...
या प्रकरणात कंपनीची एचआर अश्विनी चैनानी (HR Ashwini Chainani) हिला अटक करण्यात आली असून तिच्या चौकशीत अनेक महत्त्वाचे तपशील समोर आले आहेत. सहा पुरुष आणि दोन महिला आरोपींच्या सहभागातून हा प्रकार व्हॉट्सॲप (WhatsApp) ग्रुपच्या माध्यमातून चालवला जात असल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे.
मुंबई : भारतीय हवामान विभागाने यंदाच्या मान्सूनबाबत दीर्घकालीन अंदाज जाहीर केला असून देशात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यंदा ...
निदा खानची अटक या प्रकरणातील सर्वात महत्त्वाची कडी मानली जात असून तिच्या चौकशीतून या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाइंड आणि संभाव्य नेटवर्क उघड होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली असून कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.