Minister Shivendrasinharaje Bhosale : सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची घरे होणार अधिक प्रशस्त

चटई क्षेत्रफळात वाढ; सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा निर्णय


मुंबई : राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. बदलती जीवनशैली आणि वाढत्या गरजा लक्षात घेऊन शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात (कार्पेट एरिया) वाढ करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गुरुवारी जाहीर केला. या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आता अधिक आधुनिक आणि प्रशस्त घरे उपलब्ध होणार आहेत.


सातव्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणीनुसार विविध गटांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचे क्षेत्रफळ नव्याने निश्चित करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) निर्गमित केला असून, उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेनंतर यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.



सुधारित आराखड्यानुसार, ही निवासस्थाने टाईप-ए ते टाईप-जी अशा विविध श्रेणींमध्ये विभागली आहेत. उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसाठी २४० चौरस मीटरपर्यंत, तर निम्न वेतनगटातील कर्मचाऱ्यांसाठी किमान ४५ चौरस मीटर क्षेत्रफळ निश्चित करण्यात आले आहे. नवीन रचनेत बैठकीची खोली, स्वतंत्र भोजनकक्ष, शयनकक्ष, आधुनिक स्वयंपाकघर आणि बाल्कनीचा समावेश असेल. विशेष म्हणजे, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांत कार्यालयीन कक्ष, अभ्यासिका आणि सेवक कक्षही उपलब्ध करून दिले जाणार आहेत.



आधुनिक सुविधांवर भर


केवळ जागेत वाढ न करता सुविधांमध्येही सुधारणा करण्यात आली आहे. प्रत्येक खोलीत इंटरनेट आणि दूरध्वनी सुविधेसाठी स्वतंत्र पॉइंट्स दिले जातील. बहुमजली इमारतींमध्ये जिने, कॉरिडॉर आणि सामाईक सोयींसाठी स्वतंत्र जागा राखून ठेवली जाईल, जेणेकरून घराच्या मुख्य क्षेत्रफळावर त्याचा परिणाम होणार नाही. हा निर्णय केवळ नव्याने सुरू होणाऱ्या बांधकाम प्रकल्पांसाठी लागू असेल. सध्या बांधकामाधीन असलेल्या किंवा पूर्ण झालेल्या इमारतींच्या रचनेत कोणताही बदल केला जाणार नाही. ज्या कर्मचाऱ्यांना आधीच निवासस्थाने वाटप झाली आहेत, त्यांच्या श्रेणीमध्ये कोणताही बदल होणार नाही.

Comments
Add Comment

FDA Raid : सीसीआय', 'एमआयजी क्लब', जुहू जिमखान्यासह नामांकित क्लबवर 'एफडीए'ची कारवाई

परवाने निलंबित; स्वयंपाकघरांमध्ये माश्या, झुरळांचा सुळसुळाट, बुरशी लागलेल्या भाज्या आणि अस्वच्छतेचे

Drug Free Mumbai : 'ड्रग्ज फ्री मुंबई'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी ३० जुलै २०२६ रोजी शुभारंभ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  तरूणाईला व्यसनाधिनतेपासून रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी योग्य

Devendra Fadnavis : पालघरच्या महापूर बाधितांसाठी एकात्मिक मदत आराखडा करावा

मुंबई : पालघर हा मुबलक पाऊस पडणारा आणि वेगाने नागरीकरण होत असलेला जिल्हा असल्याने या अनुषंगाने भविष्यातील विविध

Nitesh Rane : मोर्शीतील अत्याधुनिक मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे काम वेळेत पूर्ण करा; मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

अमरावती : राज्यातील मत्स्य शिक्षण आणि संशोधनाला चालना देण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे उभारण्यात

Drugs Free Mumbai : 'ड्रग्स फ्री मुंबई' मॉडेलचा राज्यभर विस्तार; राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये 'नशामुक्ती मार्गदर्शन आणि समुपदेशन समिती' स्थापन होणार

मुंबई : मुंबई शहरात अमली पदार्थांच्या विरोधात सुरू करण्यात आलेल्या 'ड्रग्स फ्री मुंबई' अभियानाचे मॉडेल आता

Guru Purnima : गुरुपौर्णिमा नेमकी कधी ? जाणून घ्या गुरुपौर्णिमेचे महत्त्व

मुंबई : हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. आपल्या गुरुबद्दल असलेला आदर, कृतज्ञता व्यक्त