Maharashtra Vidhan Parishad Election 2026 : विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर

- १२ मे रोजी मतदान; संख्याबळानुसार महाविकास आघाडीच्या पदरात केवळ एकच जागा पडणार


मुंबई : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता राज्याच्या वरिष्ठ सभागृहातही विरोधकांची पीछेहाट होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानपरिषदेच्या ९ रिक्त जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला असून, येत्या १२ मे रोजी यासाठी मतदान होणार आहे. विधानसभेतील सध्याचे पक्षीय बलाबल पाहता, या निवड सत्ताधारी महायुतीचे वर्चस्व राहणार असून, महाविकास आघाडीला ९ पैकी केवळ एका जागेवर समाधान मानावे लागणार आहे.


या निवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी अधिसूचना जारी होईल. तर, ३० एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. १२ मे रोजी सकाळी ९ ते ४ या वेळेत मतदान पार पडेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता मतमोजणी होऊन निकाल स्पष्ट होईल. निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये भाजपचे रणजितसिंह मोहिते-पाटील, संजय केनेकर, संदीप जोशी आणि दादाराव केचे यांचा समावेश आहे. याशिवाय नीलम गोऱ्हे (शिवसेना), अमोल मिटकरी (राष्ट्रवादी), शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी- शरद पवार गट), राजेश राठोड (काँग्रेस) आणि उद्धव ठाकरे (उबाठा) यांचीही मुदत संपत आहे. विधानसभेत महायुतीचे (भाजप १३२, शिवसेना ५७ आणि अजित पवार गट ४१) असे प्रचंड संख्याबळ आहे. त्यातच राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीनंतर महायुतीच्या खात्यात आणखी दोन आमदारांची भर पडणार असल्याने ९ पैकी ७ जागांवर महायुतीचा विजय सुकर मानला जात आहे.

एका जागेमुळे मविआत पेच :


महाविकास आघाडीकडे सध्या एकूण ४६ (उबाठा २०, काँग्रेस १६ आणि शरद पवार गट १०) आमदार आहेत. एका जागेसाठी लागणारा कोटा पाहता मविआचा एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. मात्र, दुसऱ्या जागेसाठी त्यांना किमान १० मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. राज्यसभेच्या वेळी झालेल्या तडजोडीनुसार, यावेळी शरद पवार गटाला माघार घ्यावी लागण्याची शक्यता असून, ही एकमेव जागा ‘उबाठा’ गटाच्या पदरात पडू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी : 


भाजप आपल्या रिक्त होणाऱ्या जागांच्या तुलनेत अधिक जागा जिंकण्याच्या स्थितीत आहे. पक्षाकडून केशव उपाध्ये, माधवी नाईक, रणजीतसिंह नाईक निंबाळकर, राम सातपुते यांच्या नावांची चर्चा सुरू असून, अनेक माजी आमदार आणि पदाधिकाऱ्यांनीही परिषदेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.



निवडणूक कार्यक्रम असा


अधिसूचना : २३ एप्रिल २०२६
अर्ज भरण्याची शेवटची तारीख : ३० एप्रिल २०२६
अर्जांची छाननी : २ मे २०२६
अर्ज मागे घेण्याची मुदत : ४ मे २०२६
मतदान : १२ मे २०२६ (सकाळी ९ ते ४)
निकाल : १२ मे २०२६ (संध्याकाळी ५ वाजता)

Comments
Add Comment

Maharashtra wedding card new rule : लग्न ठरलंय? मग हा नवा नियम जाणून घ्या; पत्रिकेत द्यावी लागणार 'ही' महत्त्वाची माहिती

बालविवाह रोखण्यासाठी सरकारचा नवा फॉर्म्युला; लग्नपत्रिकेत होणार मोठा बदल महाराष्ट्रात बालविवाह (Child Marriage)

Nashik Crime : ‘तू एकट्यानेच मटण का खाल्ले?’ मित्र संतापला अन उकळते पातेले थेट...

Nashik Crime : मित्रांची दारू पार्टी अन त्यात मटण म्हटल्यावर अनेकांसाठी ही मजा काही औरच असते. पण नाशिकच्या एका तरुणाला

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना घरचा आहेर! सिनेटचा इराणविरोधी लष्करी कारवाया रोखण्याचा ठराव मंजूर; व्हाईट हाऊसवर वाढला दबाव

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या इराणविषयक धोरणाला देशांतर्गत मोठा राजकीय

Nilesh Rane : सिंधुदुर्गमधील घरकुलांसाठी गायरान आणि शासकीय जमिनी देणार

आमदार निलेश राणे यांच्या प्रश्नावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे सकारात्मक उत्तर; नवीन घरकुलांना जमीन

CM Devendra Fadnavis: २०२९-३० पर्यंत महाराष्ट्रातील वीज दर गुजरातपेक्षाही स्वस्त होणार; मुख्यमंत्र्यांचे विधान परिषदेत आश्वासन

वीज यंत्रणा सक्षम होणार, ३ वर्षांत 'डीपी' फेल होणे थांबणार मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पावसाळी

Ketan Agarwal Murder Case : वाढदिवसासाठी दिलेलं Surprise, आता Viral Video चर्चेत

मुंबई : Ketan Agarwal Murder Case मध्ये दररोज नवे खुलासे (Revelations) समोर येत आहेत. दरम्यान, केतन अग्रवाल आणि त्याची होणारी पत्नी (Fiancée)