Israel - Iran - US War Impact : कांद्याची आता पावडर होणार!

निर्यात थंडावल्याने सरकारची योजना; तालुकानिहाय प्रक्रिया केंद्रांचे जाळे उभारणार


मुंबई : इराण-इस्रायल युद्धामुळे कांदा निर्यातीची साखळी खंडित झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर, कांद्याचे कोसळणारे भाव सावरण्यासाठी राज्य सरकारने साठवणुकीपेक्षा प्रक्रिया उद्योगावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. अतिरिक्त कांद्यापासून पावडर तयार करणाऱ्या प्रकल्पांना ७०० कोटी रुपयांचे अनुदान देण्याचा प्रस्ताव पणन विभागाने तयार केला असून, मंत्री जयकुमार रावल तो लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करणार आहेत.



कांदा उत्पादन आणि निर्यातीत महाराष्ट्र देशात आघाडीवर असला, तरी सध्या आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय मागणी घटली आहे. त्याचा थेट फटका स्थानिक बाजारपेठेतील दरांना बसत असल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून सरकारने प्रक्रिया उद्योगाना बळ देण्याचा निर्णय घेतला आहे.


राज्यातील प्रत्येक तालुक्यात कांदा प्रक्रिया केंद्र (प्रोसेसिंग युनिट) उभारण्याचे सरकारचे नियोजन आहे. विशेष म्हणजे, ही केंद्रे चालवण्यासाठी महिला बचत गटांची मदत घेतली जाणार असल्याने ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. सुमारे २५ लाख टन कांद्यावर प्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी ७०० कोटींची तरतूद प्रस्तावित आहे. गेल्या तीन वर्षांत सरकारने कांदा अनुदानावर सुमारे १ हजार ४०० कोटी रुपये खर्च केले आहेत. त्याऐवजी एकदाच प्रक्रिया प्रकल्पांना बळ दिल्यास भविष्यात इतक्या मोठ्या अनुदानाची गरज उरणार नाही, असा सरकारचा कयास आहे.



प्रक्रिया उद्योगांची गरज का?


राज्यातील कांदा प्रामुख्याने श्रीलंका, बांगलादेश आणि आखाती देशांत निर्यात होतो. मात्र, बांगलादेश आणि श्रीलंकेने स्वतःच्या उत्पादनावर भर दिल्याने आणि युद्धामुळे वाहतूक विस्कळीत झाल्याने निर्यातकोंडी निर्माण झाली आहे. एकट्या महाराष्ट्रात १६० ते १७० लाख टन कांदा पिकतो, तर संपूर्ण देशाची गरज १५० लाख टनांच्या आसपास आहे. ही अतिरिक्त आवक सावरण्यासाठी प्रक्रिया उद्योग हाच शाश्वत पर्याय असल्याचे सरकारने मत आहे.



प्रतिकिलो ४०० रुपयांपर्यंत भाव


कांद्याची पावडर बनवणे तांत्रिकदृष्ट्या सोपे असून ती १० महिने टिकू शकते. सध्या बाजारात कांदा पावडरीला प्रतिकिलो ४०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. कांदा महागला की ग्राहक नाराज होतात आणि दर पडले की शेतकरी हवालदिल होतो; या दोन्ही समस्यांवर प्रक्रिया उद्योग हेच उत्तर असल्याचे मत जयकुमार रावल यांनी व्यक्त केले. ज्या तालुक्यांत कांद्याचे उत्पादन अधिक आहे, तिथे एकापेक्षा जास्त युनिट्स उभारण्याची तयारीही पणन विभागाने दर्शविली आहे.

Comments
Add Comment

Water Storage in Mumbai : जुलैच्या सरींकडे मुंबईकरांच्या नजरा खिळल्या, तलावांत केवळ ८.५ टक्के पाणीसाठा; २० ऑगस्टपर्यंत पुरेल पाणी

मुंबई  : मुंबईत मंगळवारपासून पुढील तीन दिवस पाऊस पडेल. मात्र, हा पाऊस पडला तरी तो ३० जूनपर्यंत या संपूर्ण

IAS Transfer : पी. वेलरासू यांच्यासह तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य सरकारने सोमवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि महापारेषणमधील

Chandrakant Patil : पॉलीटेक्निक प्रवेश अर्जासाठी 2 जुलैपर्यंत मुदतवाढ; 1.45 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी

 उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील मुंबई,  : प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी (पॉलीटेक्निक)

Monsoon Update : मान्सूनच्या प्रगतीमुळे राज्यात आनंदाचे वातावरण

मुंबई : बहुप्रतिक्षित मान्सूनने अखेर दोन आठवड्यांच्या विलंबानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात पुढे वाटचाल सुरू

Temple Endowment Law : नवा देवस्थान इनाम जमीन कायदा सर्वंकष न्याय देणारा असेल, महसूलमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई : राज्यातील देवस्थान इनाम जमिनींचे संवर्धन करण्यासह वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले समस्या मार्गी

Bangladeshi infiltrators : अडीच वर्षांत महाराष्ट्रातून ३ हजार ५४१ बांगलादेशी घुसखोरांची हकालपट्टी

मुंबई : वर्ष २०२४ पासून आजपर्यंत म्हणजेच गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रातून