Israel - Iran - US War Impact : कांद्याची आता पावडर होणार!

निर्यात थंडावल्याने सरकारची योजना; तालुकानिहाय प्रक्रिया केंद्रांचे जाळे उभारणार


मुंबई : इराण-इस्रायल युद्धामुळे कांदा निर्यातीची साखळी खंडित झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर, कांद्याचे कोसळणारे भाव सावरण्यासाठी राज्य सरकारने साठवणुकीपेक्षा प्रक्रिया उद्योगावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. अतिरिक्त कांद्यापासून पावडर तयार करणाऱ्या प्रकल्पांना ७०० कोटी रुपयांचे अनुदान देण्याचा प्रस्ताव पणन विभागाने तयार केला असून, मंत्री जयकुमार रावल तो लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करणार आहेत.



कांदा उत्पादन आणि निर्यातीत महाराष्ट्र देशात आघाडीवर असला, तरी सध्या आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय मागणी घटली आहे. त्याचा थेट फटका स्थानिक बाजारपेठेतील दरांना बसत असल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून सरकारने प्रक्रिया उद्योगाना बळ देण्याचा निर्णय घेतला आहे.


राज्यातील प्रत्येक तालुक्यात कांदा प्रक्रिया केंद्र (प्रोसेसिंग युनिट) उभारण्याचे सरकारचे नियोजन आहे. विशेष म्हणजे, ही केंद्रे चालवण्यासाठी महिला बचत गटांची मदत घेतली जाणार असल्याने ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. सुमारे २५ लाख टन कांद्यावर प्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी ७०० कोटींची तरतूद प्रस्तावित आहे. गेल्या तीन वर्षांत सरकारने कांदा अनुदानावर सुमारे १ हजार ४०० कोटी रुपये खर्च केले आहेत. त्याऐवजी एकदाच प्रक्रिया प्रकल्पांना बळ दिल्यास भविष्यात इतक्या मोठ्या अनुदानाची गरज उरणार नाही, असा सरकारचा कयास आहे.



प्रक्रिया उद्योगांची गरज का?


राज्यातील कांदा प्रामुख्याने श्रीलंका, बांगलादेश आणि आखाती देशांत निर्यात होतो. मात्र, बांगलादेश आणि श्रीलंकेने स्वतःच्या उत्पादनावर भर दिल्याने आणि युद्धामुळे वाहतूक विस्कळीत झाल्याने निर्यातकोंडी निर्माण झाली आहे. एकट्या महाराष्ट्रात १६० ते १७० लाख टन कांदा पिकतो, तर संपूर्ण देशाची गरज १५० लाख टनांच्या आसपास आहे. ही अतिरिक्त आवक सावरण्यासाठी प्रक्रिया उद्योग हाच शाश्वत पर्याय असल्याचे सरकारने मत आहे.



प्रतिकिलो ४०० रुपयांपर्यंत भाव


कांद्याची पावडर बनवणे तांत्रिकदृष्ट्या सोपे असून ती १० महिने टिकू शकते. सध्या बाजारात कांदा पावडरीला प्रतिकिलो ४०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. कांदा महागला की ग्राहक नाराज होतात आणि दर पडले की शेतकरी हवालदिल होतो; या दोन्ही समस्यांवर प्रक्रिया उद्योग हेच उत्तर असल्याचे मत जयकुमार रावल यांनी व्यक्त केले. ज्या तालुक्यांत कांद्याचे उत्पादन अधिक आहे, तिथे एकापेक्षा जास्त युनिट्स उभारण्याची तयारीही पणन विभागाने दर्शविली आहे.

Comments
Add Comment

Central Railway : मध्य रेल्वेच्या ताफ्यात स्वयंचलित दरवाजांची 'नॉन-एसी' लोकल; मराठी भाषेला डावलल्याने नव्या वादाला तोंड

मुंबई : मुंबईकरांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर करण्यासाठी मध्य रेल्वेच्या ताफ्यात सोमवारी स्वयंचलित

Shrikant Shinde : श्रीकांत शिंदेंसमोर भिडणाऱ्या पदाधिकाऱ्यांना हटवले

 सोलापूर आणि माढ्यातील शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त मुंबई : शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सोलापूर

Elite Guard : मंत्रालयाला आता ‘एलिट गार्ड’चे अभेद्य कवच

‘तिहेरी’ सुरक्षा व्यवस्था; मुख्य प्रवेशद्वारावर ‘एके-४७’सह कमांडो तैनात मुंबई : राज्याचे मुख्य प्रशासकीय

BMC News : उबाठा,काँग्रेस नगरसेवकांच्या प्रभागात कोटींचा निधी

- निधी वाटपात भेदभाव केल्याचा आरोप, पण भाजपने राखला विरोधी पक्षाच्या नगरसेवकांचाही मान मुंबई (सचिन धानजी) मुंबई

Online LPG bookings : ऑनलाइन एलपीजी बुकिंंगमध्ये ९८ टक्क्यांनी वाढ; शासनाच्या कडक कारवाईमुळे ग्राहकांच्या विश्वासात वाढ

मुंबई : एलपीजी उपलब्धतेबाबत ग्राहकांमध्ये विश्वास आणि सकारात्मक बदल दिसून येत आहेत. इंधन टंचाईची भीती आणि

BKC Metro Accident : मेट्रोच्या खांबावर बीम बसवताना क्रेनचा अचानक तोल गेल्याने अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतुकीवर परिणाम

मुंबई : मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) परिसरात म्हणजेच बीकेसी परिसरात आज सकाळी (बुधवार, १५ एप्रिल) सकाळी