Elite Guard : मंत्रालयाला आता ‘एलिट गार्ड’चे अभेद्य कवच

‘तिहेरी’ सुरक्षा व्यवस्था; मुख्य प्रवेशद्वारावर ‘एके-४७’सह कमांडो तैनात


मुंबई : राज्याचे मुख्य प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयाच्या संरक्षणासाठी आता महाराष्ट्र पोलिसांच्या अत्यंत प्रशिक्षित अशा 'एलिट गार्ड' या विशेष कमांडो तुकडीचे संरक्षक कवच देण्यात आले आहे. हे कमांडो आधुनिक शस्त्रास्त्रांसह मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर तैनात केले जाणार आहेत.



मुंबईतील महत्त्वाची शासकीय कार्यालये आणि संवेदनशील ठिकाणे दहशतवाद्यांच्या लक्ष्यस्थानी असल्याच्या गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रालयात दररोज हजारो नागरिक आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची ये-जा असते, त्यामुळे येथील सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. आता मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि गार्डन गेटवर 'एलिट गार्ड'चे कमांडो सदैव सज्ज असणार आहेत.


डोळ्यांवर काळा गॉगल, अंगावर विशेष गणवेश आणि हातात 'एके-४७' सारखे अत्याधुनिक शस्त्र घेऊन हे कमांडो संशयास्पद हालचालींवर करडी नजर ठेवतील. विशेष म्हणजे, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असलेल्या या कमांडोंचे एक बोट सदैव बंदुकीच्या 'ट्रिगर'वर असते.



मंत्रालयाची सुरक्षा व्यवस्था यापूर्वीच कडक होती, मात्र आता एलिट गार्डच्या समावेशामुळे येथे तिहेरी सुरक्षा कवच निर्माण झाले आहे. स्थानिक पोलीस, राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) आणि आता एलिट गार्ड अशा स्तरांवर मंत्रालयाची तपासणी आणि देखरेख केली जात आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ही विशेष फोर्स आता मंत्रालयात कायमस्वरूपी तैनात करण्यात आली असून, प्रवेशद्वारावरील प्रत्येक हालचालीची बारकाईने नोंद घेतली जात आहे.



काय आहे ‘एलिट गार्ड’?


एलिट गार्ड ही पोलीस दलातील एक विशेष निमलष्करी तुकडी आहे. दहशतवादी कारवाया मोडून काढणे, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना संरक्षण देणे आणि अत्यंत गोपनीय व कठीण मोहिमा फत्ते करण्याचे विशेष प्रशिक्षण या जवानांना दिले जाते. गनिमी काव्याने होणारे हल्ले परतवून लावण्यात हे कमांडो निष्णात मानले जातात.

Comments
Add Comment

BMC News : उबाठा,काँग्रेस नगरसेवकांच्या प्रभागात कोटींचा निधी

- निधी वाटपात भेदभाव केल्याचा आरोप, पण भाजपने राखला विरोधी पक्षाच्या नगरसेवकांचाही मान मुंबई (सचिन धानजी) मुंबई

Online LPG bookings : ऑनलाइन एलपीजी बुकिंंगमध्ये ९८ टक्क्यांनी वाढ; शासनाच्या कडक कारवाईमुळे ग्राहकांच्या विश्वासात वाढ

मुंबई : एलपीजी उपलब्धतेबाबत ग्राहकांमध्ये विश्वास आणि सकारात्मक बदल दिसून येत आहेत. इंधन टंचाईची भीती आणि

BKC Metro Accident : मेट्रोच्या खांबावर बीम बसवताना क्रेनचा अचानक तोल गेल्याने अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतुकीवर परिणाम

मुंबई : मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) परिसरात म्हणजेच बीकेसी परिसरात आज सकाळी (बुधवार, १५ एप्रिल) सकाळी

Maharashtra : महाराष्ट्रात पाईप गॅसची सुविधा घरोघरी पोहोचवण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न जोरात

मुंबई : आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे उद्भवलेल्या ऊर्जा संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने

SOP For Heat wave : उष्णतेच्या लाटांपासून संरक्षणासाठी राज्य शासनाकडून एसओपी जारी

मुंबई : राज्य शासनाने राज्य उष्णता कृती आराखडा आणि भारतीय हवामान विभागाच्या (IMD) रंग-कोडेड उष्णता सतर्कतांच्या

Ashok Kharat, Rupali Chakankar : खरात प्रकरणात माझ्या बदनामीचा डाव - रुपाली चाकणकर

मुंबई : "गेल्या २८ दिवसांपासून माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर होणारे सर्व आरोप हे केवळ हेतूपुरस्सर आणि बदनामी