Elite Guard : मंत्रालयाला आता ‘एलिट गार्ड’चे अभेद्य कवच

‘तिहेरी’ सुरक्षा व्यवस्था; मुख्य प्रवेशद्वारावर ‘एके-४७’सह कमांडो तैनात


मुंबई : राज्याचे मुख्य प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयाच्या संरक्षणासाठी आता महाराष्ट्र पोलिसांच्या अत्यंत प्रशिक्षित अशा 'एलिट गार्ड' या विशेष कमांडो तुकडीचे संरक्षक कवच देण्यात आले आहे. हे कमांडो आधुनिक शस्त्रास्त्रांसह मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर तैनात केले जाणार आहेत.



मुंबईतील महत्त्वाची शासकीय कार्यालये आणि संवेदनशील ठिकाणे दहशतवाद्यांच्या लक्ष्यस्थानी असल्याच्या गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रालयात दररोज हजारो नागरिक आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची ये-जा असते, त्यामुळे येथील सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. आता मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि गार्डन गेटवर 'एलिट गार्ड'चे कमांडो सदैव सज्ज असणार आहेत.


डोळ्यांवर काळा गॉगल, अंगावर विशेष गणवेश आणि हातात 'एके-४७' सारखे अत्याधुनिक शस्त्र घेऊन हे कमांडो संशयास्पद हालचालींवर करडी नजर ठेवतील. विशेष म्हणजे, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असलेल्या या कमांडोंचे एक बोट सदैव बंदुकीच्या 'ट्रिगर'वर असते.



मंत्रालयाची सुरक्षा व्यवस्था यापूर्वीच कडक होती, मात्र आता एलिट गार्डच्या समावेशामुळे येथे तिहेरी सुरक्षा कवच निर्माण झाले आहे. स्थानिक पोलीस, राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) आणि आता एलिट गार्ड अशा स्तरांवर मंत्रालयाची तपासणी आणि देखरेख केली जात आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ही विशेष फोर्स आता मंत्रालयात कायमस्वरूपी तैनात करण्यात आली असून, प्रवेशद्वारावरील प्रत्येक हालचालीची बारकाईने नोंद घेतली जात आहे.



काय आहे ‘एलिट गार्ड’?


एलिट गार्ड ही पोलीस दलातील एक विशेष निमलष्करी तुकडी आहे. दहशतवादी कारवाया मोडून काढणे, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना संरक्षण देणे आणि अत्यंत गोपनीय व कठीण मोहिमा फत्ते करण्याचे विशेष प्रशिक्षण या जवानांना दिले जाते. गनिमी काव्याने होणारे हल्ले परतवून लावण्यात हे कमांडो निष्णात मानले जातात.

Comments
Add Comment

Commissioner Dr. Ashwini Joshi : अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांची बदली

प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांची नियुक्ती मुंबई  : मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांची

Water Shortage : पाणीटंचाईचे सावट गडद

जलतरण तलाव व बांधकामांच्या जलजोडण्या खंडित ; उद्योगांना २० टक्के कपात मुंबई : नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन

Alternative Transport Hub : बोरिवली स्थानकावरील गर्दी कमी होणार; कांदिवलीचा 'पर्यायी वाहतूक केंद्र' म्हणून विकास

मुंबई: पश्चिम रेल्वेवरील सर्वात वर्दळीचे स्थानक असलेल्या बोरिवली स्थानकावरील प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी

Malnourished children : तीव्र कुपोषित बालकांचा घसरला आलेख

प्रशासनाच्या प्रयत्नांना यश पालघर: कुपोषित बालकांचे प्रमाण जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये पालघर जिल्ह्याचे

Corridor : विरार-अलिबाग मार्गिकेचा मार्ग मोकळा; निविदा प्रक्रियेला लवकरच सुरुवात; कोकण विकासाला मिळणार चालना

मुंबई: राज्यातील पायाभूत सुविधांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या 'विरार-अलिबाग बहुउद्देशीय

Vijay Singhal : विजय सिंघल यांची धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या विशेष कार्य अधिकारी पदी नियुक्ती

 राज्यातील आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई : राज्य सरकारने मंगळवारी आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे