ECOSOC India Elected : संयुक्त राष्ट्रसंघात भारताचा दबदबा! तीन जागतिक समित्यांमध्ये भारताची निवड

- २०२७-३० साठी मोठं राजनैतिक यश


मुंबई : २ एप्रिल २०२६ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या इकोनॉमिक अँड सोशल कॉन्सिल कॉनशील (ECOSOC) अंतर्गत विविध महत्त्वाच्या संस्थांमध्ये भारताची निवड करण्यात आली. न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्र मुख्यालयात पार पडलेल्या या प्रक्रियेत भारताला २०२७ ते २०३० या कालावधीसाठी महत्त्वपूर्ण समित्यांमध्ये स्थान मिळालं आहे.


भारताची “गुन्हेगारी प्रतिबंध आणि फौजदारी न्याय आयोग - Commission on Crime Prevention and Criminal Justice (CCPCJ), “यूएन महिला - UN Women” च्या कार्यकारी मंडळात तसेच “कार्यक्रम आणि समन्वय समिती - Committee for Programme and Coordination (CPC)” मध्ये निवड झाली आहे. या संस्था गुन्हेगारी प्रतिबंध, महिला सक्षमीकरण आणि जागतिक कार्यक्रमांचे नियोजन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर काम करतात.



या निवडीमुळे भारताला जागतिक धोरणनिर्मितीत अधिक सक्रिय भूमिका निभावण्याची संधी मिळणार आहे. गुन्हेगारी नियंत्रण, सामाजिक विकास, लैंगिक समानता आणि आर्थिक सहकार्य या क्षेत्रांमध्ये भारताचा आवाज अधिक प्रभावीपणे मांडला जाणार आहे.


गेल्या काही वर्षांत “Digital India”, “Beti Bachao Beti Padhao” आणि “Jan Dhan Yojana” यांसारख्या उपक्रमांमुळे भारताने जागतिक स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळेच या संस्थांमध्ये भारताची निवड ही केवळ राजनैतिक यश नसून, देशाच्या विकास मॉडेलला मिळालेली जागतिक मान्यता मानली जात आहे.


यासोबतच भारताची “soft power diplomacy” अधिक मजबूत होत असल्याचंही या निवडीवरून स्पष्ट होतं. विशेषतः “Global South” देशांसाठी भारत एक आदर्श म्हणून पुढे येत आहे.


तथापि, या निवडीसोबत काही जबाबदाऱ्या आणि आव्हानेही आहेत. CCPCJ मध्ये भारताला सायबर क्राइम, मानव तस्करी यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर ठोस भूमिका मांडावी लागेल. तर UN Women मध्ये महिला सक्षमीकरणाच्या जागतिक धोरणांमध्ये प्रभावी योगदान देणं आवश्यक असेल.


एकूणच, ECOSOC अंतर्गत भारताची ही निवड देशाच्या वाढत्या जागतिक प्रभावाची साक्ष देणारी आहे. आता या संधीचा उपयोग करून भारताने केवळ स्वतःच्या हितांसाठी नव्हे, तर जागतिक स्तरावर समतोल आणि न्याय्य विकासासाठी योगदान देणं हीच खरी कसोटी ठरणार आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Sadan : 'दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा'

नवी दिल्ली : सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्ली दौऱ्यादरम्यान नवीन व जुने

Heatwave : उष्णतेच्या लाटेत विशेष खबरदारी घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आवाहन

नवी दिल्ली : दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि पंजाबसह अनेक राज्यांमध्ये तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या

Thalapathy vijay meets pm narendra modi : CM थलपती विजय यांनी घेतली PM मोदींची भेट! २५ मिनिटांच्या चर्चेने वाढवले राजकीय तापमान!

नवी दिल्ली : तामिळनाडूचे (Tamilnadu Minister) नवनियुक्त मुख्यमंत्री आणि प्रसिद्ध अभिनेते जोसेफ विजय (थलपती विजय) (Vijay Joseph) हे

AMCA stealth fighter : संरक्षण क्षेत्रात क्रांती! भारताच्या पहिल्या स्टेल्थ फायटर 'AMCA' साठी १५,००० कोटींची शर्यत सुरू; ३ बड्या कंपन्या शॉर्टलिस्ट!

नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेची ताकद अनेक पटींनी वाढवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने (Ministry of Defence) आज एक ऐतिहासिक पाऊल

जलजीवन मिशनच्या ५१ हजार योजनांचा आढावा; नदीजोड प्रकल्पाला प्राधान्य देणार

केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांच्या उपस्थितीत जलजीवन मिशनमधील योजनांचा दिल्लीत आढावा मुख्यमंत्री देवेंद्र

Keralam : माजी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या घरावर ED चे छापे; केरळमधील थरारक व्हिडिओमुळे देशात खळबळ!

तिरुवनंतपुरम : केरळच्या राजधानीत आज अत्यंत तणावाचे आणि हिंसक वातावरण पाहायला मिळाले. कोचीन मिनरल्स अँड रुटाईल