Iran - India : हॉर्मूझ सामुद्रधुनीचा प्रवास भारतासाठी 'टोल फ्री'; पुन्हा एकदा इराणकडून भारताशी मजबूत संबंध अधोरेखित

इराण अमेरिका यांच्यातील शांती करार निष्फळ ठरल्यानांतर इराणकडून हॉर्मूझ सामुद्रधुनीतून प्रवास करण्यासाठी टोल आकारण्यात आला. मात्र इराणने सोमवारी (१३ एप्रिल) ठामपणे स्पष्ट केले की, हॉर्मूझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणत्याही प्रकारचा टोल आकाराला जाणार नाही. त्यांच्या या निर्णयातून पुन्हा एकदा इराणने भारताशी असलेले “चांगले संबंध” संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे.


गेल्या काही दिवसांपासून भारतीय जहाजांच्या सुरक्षित मार्गासाठी इराणने भारताकडून पैसे घेतले अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यावर नवी दिल्लीतील इराणी दूतावासात झालेल्या पत्रकार परिषदेत फथाली यांनी सांगितले, “आत्तापर्यंत आम्ही भारताकडून कोणतेही शुल्क घेतले आहे का, हे तुम्ही भारतीय सरकारलाच विचारू शकता.” असं म्हणत त्यांनी भारतीय जहाजांच्या सुरक्षित मार्गासाठी पैसे देण्यात आल्याच्या दाव्यांना स्पष्टपणे फेटाळले.


दरम्यान, युद्धानंतर काही प्रमाणात वाहतुकीवर निर्बंध आल्याने भारताच्या सुमारे १५ जहाजे पर्शियन आखातात अडकून असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच एलपीजी वाहतूक करणाऱ्या ९ जहाजांना बाहेर काढण्यासाठी टोल भरल्याच्या बातम्यांनाही भारताने नाकारले आहे.



फथाली यांनी भारताला “विश्वासू भागीदार” संबोधत दोन्ही देशांतील संबंध मजबूत असल्याचे सांगितले. “या कठीण काळातही आमचे संबंध चांगले आहेत. भारत आणि इराणचे हितसंबंध समान आहेत,” असे त्यांनी नमूद केले. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनीही भारताला मैत्रीपूर्ण देशांच्या यादीत स्थान दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


हॉर्मूझ सामुद्रधुनी भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा ऊर्जा मार्ग असून, देशाच्या जवळपास निम्म्या कच्च्या तेल आणि एलपीजी आयातीचा पुरवठा याच मार्गाने होतो.


याशिवाय, इराणने अमेरिकेसोबत पुन्हा चर्चेसाठी तयारी दर्शवली असून, “बेकायदेशीर अटी” टाळल्यास संवाद शक्य असल्याचे संकेत दिले आहेत. इस्लामाबादमध्ये नुकत्याच झालेल्या चर्चेत कोणताही ठोस निर्णय न झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


दरम्यान, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणी बंदरांवर नाकेबंदीची धमकी दिल्यानंतर तणाव वाढला आहे. मात्र, हॉर्मूझ सामुद्रधुनी इराणच्या हद्दीत असल्याचा पुनरुच्चार करत इराणने आपली भूमिका अधिक ठाम केली आहे.

Comments
Add Comment

Baruipur Murder Case : गुप्तांगांवर जखमा, डोक्यावर प्रहार अन् १२ वर्षीय मुलीवर पाशवी बलात्कार; पश्चिम बंगाल हादरले!

पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील बारुईपूर येथे एका १२ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार

Cloudburst : ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास काय करावे? जाणून घ्या आपत्कालीन व्यवस्थापन आणि सुरक्षेचे उपाय

Cloudburst : सध्या राज्यात पावसाचा वेग वाढला आहे. नाशिकमध्ये तर ढगसदृश्य पाऊस सांगितला आहे. अशावेळेस नागरिकांनी घाबरून

Indian Navy : भारतीय नौदलाची ताकद वाढणार; 'आयएनएस महेंद्रगिरी' आणि 'आयएनएस मालवण' लवकरच ताफ्यात येणार

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढणार असून लवकरच ‘आयएनएस महेंद्रगिरी’ आणि ‘आयएनएस मालवण’ या दोन

Indian Navy : भारतीय नौदलाच्या युद्धनौकांच्या सिंगापूर भेटीची यशस्वी सांगता

नवी दिल्ली : भारत आणि सिंगापूर यांच्यातील दृढ सामरिक आणि सागरी भागीदारी अधिक मजबूत करत भारतीय नौदलाच्या पूर्व

Mumbai Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती; विक्रोळी येथे बोअरिंगचे काम सुरू

मुंबई (Mumbai): मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रकल्पासाठी, पहिल्या टनेल बोरिंग मशीनने (TBM) आज विक्रोळी

VB-G-RAM-G च्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारकडून राज्यांना २५ हजार ८६३ कोटी रुपयांचा पहिला हप्ता वितरित

नवी दिल्ली : केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यांच्या