Iran - India : हॉर्मूझ सामुद्रधुनीचा प्रवास भारतासाठी 'टोल फ्री'; पुन्हा एकदा इराणकडून भारताशी मजबूत संबंध अधोरेखित

इराण अमेरिका यांच्यातील शांती करार निष्फळ ठरल्यानांतर इराणकडून हॉर्मूझ सामुद्रधुनीतून प्रवास करण्यासाठी टोल आकारण्यात आला. मात्र इराणने सोमवारी (१३ एप्रिल) ठामपणे स्पष्ट केले की, हॉर्मूझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणत्याही प्रकारचा टोल आकाराला जाणार नाही. त्यांच्या या निर्णयातून पुन्हा एकदा इराणने भारताशी असलेले “चांगले संबंध” संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे.


गेल्या काही दिवसांपासून भारतीय जहाजांच्या सुरक्षित मार्गासाठी इराणने भारताकडून पैसे घेतले अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यावर नवी दिल्लीतील इराणी दूतावासात झालेल्या पत्रकार परिषदेत फथाली यांनी सांगितले, “आत्तापर्यंत आम्ही भारताकडून कोणतेही शुल्क घेतले आहे का, हे तुम्ही भारतीय सरकारलाच विचारू शकता.” असं म्हणत त्यांनी भारतीय जहाजांच्या सुरक्षित मार्गासाठी पैसे देण्यात आल्याच्या दाव्यांना स्पष्टपणे फेटाळले.


दरम्यान, युद्धानंतर काही प्रमाणात वाहतुकीवर निर्बंध आल्याने भारताच्या सुमारे १५ जहाजे पर्शियन आखातात अडकून असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच एलपीजी वाहतूक करणाऱ्या ९ जहाजांना बाहेर काढण्यासाठी टोल भरल्याच्या बातम्यांनाही भारताने नाकारले आहे.



फथाली यांनी भारताला “विश्वासू भागीदार” संबोधत दोन्ही देशांतील संबंध मजबूत असल्याचे सांगितले. “या कठीण काळातही आमचे संबंध चांगले आहेत. भारत आणि इराणचे हितसंबंध समान आहेत,” असे त्यांनी नमूद केले. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनीही भारताला मैत्रीपूर्ण देशांच्या यादीत स्थान दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


हॉर्मूझ सामुद्रधुनी भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा ऊर्जा मार्ग असून, देशाच्या जवळपास निम्म्या कच्च्या तेल आणि एलपीजी आयातीचा पुरवठा याच मार्गाने होतो.


याशिवाय, इराणने अमेरिकेसोबत पुन्हा चर्चेसाठी तयारी दर्शवली असून, “बेकायदेशीर अटी” टाळल्यास संवाद शक्य असल्याचे संकेत दिले आहेत. इस्लामाबादमध्ये नुकत्याच झालेल्या चर्चेत कोणताही ठोस निर्णय न झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


दरम्यान, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणी बंदरांवर नाकेबंदीची धमकी दिल्यानंतर तणाव वाढला आहे. मात्र, हॉर्मूझ सामुद्रधुनी इराणच्या हद्दीत असल्याचा पुनरुच्चार करत इराणने आपली भूमिका अधिक ठाम केली आहे.

Comments
Add Comment

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र

Narendra Modi : 'सेमीकंडक्टरपासून अणुऊर्जेपर्यंत...'; जाणून घ्या पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला

Independence Day 2026 : तिरंगा, २१ तोफांची सलामी आणि ‘वंदे मातरम्’चा निनाद; लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाचा दिमाखदार सोहळा

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील ऐतिहासिक लाल

Independence Day 2026 : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त Google Doodleची खास कलाकृती; भारतीय वस्त्रकलेतून दिसली सांस्कृतिक विविधता

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त Google ने आपल्या होमपेजवर खास आणि रंगीबेरंगी Doodle सादर करून