Iran - India : हॉर्मूझ सामुद्रधुनीचा प्रवास भारतासाठी 'टोल फ्री'; पुन्हा एकदा इराणकडून भारताशी मजबूत संबंध अधोरेखित

इराण अमेरिका यांच्यातील शांती करार निष्फळ ठरल्यानांतर इराणकडून हॉर्मूझ सामुद्रधुनीतून प्रवास करण्यासाठी टोल आकारण्यात आला. मात्र इराणने सोमवारी (१३ एप्रिल) ठामपणे स्पष्ट केले की, हॉर्मूझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणत्याही प्रकारचा टोल आकाराला जाणार नाही. त्यांच्या या निर्णयातून पुन्हा एकदा इराणने भारताशी असलेले “चांगले संबंध” संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे.


गेल्या काही दिवसांपासून भारतीय जहाजांच्या सुरक्षित मार्गासाठी इराणने भारताकडून पैसे घेतले अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यावर नवी दिल्लीतील इराणी दूतावासात झालेल्या पत्रकार परिषदेत फथाली यांनी सांगितले, “आत्तापर्यंत आम्ही भारताकडून कोणतेही शुल्क घेतले आहे का, हे तुम्ही भारतीय सरकारलाच विचारू शकता.” असं म्हणत त्यांनी भारतीय जहाजांच्या सुरक्षित मार्गासाठी पैसे देण्यात आल्याच्या दाव्यांना स्पष्टपणे फेटाळले.


दरम्यान, युद्धानंतर काही प्रमाणात वाहतुकीवर निर्बंध आल्याने भारताच्या सुमारे १५ जहाजे पर्शियन आखातात अडकून असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच एलपीजी वाहतूक करणाऱ्या ९ जहाजांना बाहेर काढण्यासाठी टोल भरल्याच्या बातम्यांनाही भारताने नाकारले आहे.



फथाली यांनी भारताला “विश्वासू भागीदार” संबोधत दोन्ही देशांतील संबंध मजबूत असल्याचे सांगितले. “या कठीण काळातही आमचे संबंध चांगले आहेत. भारत आणि इराणचे हितसंबंध समान आहेत,” असे त्यांनी नमूद केले. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनीही भारताला मैत्रीपूर्ण देशांच्या यादीत स्थान दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


हॉर्मूझ सामुद्रधुनी भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा ऊर्जा मार्ग असून, देशाच्या जवळपास निम्म्या कच्च्या तेल आणि एलपीजी आयातीचा पुरवठा याच मार्गाने होतो.


याशिवाय, इराणने अमेरिकेसोबत पुन्हा चर्चेसाठी तयारी दर्शवली असून, “बेकायदेशीर अटी” टाळल्यास संवाद शक्य असल्याचे संकेत दिले आहेत. इस्लामाबादमध्ये नुकत्याच झालेल्या चर्चेत कोणताही ठोस निर्णय न झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


दरम्यान, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणी बंदरांवर नाकेबंदीची धमकी दिल्यानंतर तणाव वाढला आहे. मात्र, हॉर्मूझ सामुद्रधुनी इराणच्या हद्दीत असल्याचा पुनरुच्चार करत इराणने आपली भूमिका अधिक ठाम केली आहे.

Comments
Add Comment

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’चा अपमान करणे आता गंभीर गुन्हा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, कायद्यात दुरुस्ती

नवी दिल्ली : देशभक्तीशी निगडित प्रतीकांचा सन्मान अबाधित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ‘वंदे

Supreme Court News : सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांची संख्या वाढणार; केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशातील न्यायव्यवस्था अधिक सक्षम आणि जलद करण्याच्या दिशेने मोठं पाऊल उचललं आहे.

Scooter Blast Near BSF Headquarters : BSF मुख्यालयाजवळ स्कूटरचा स्फोट; जालंधरमध्ये खळबळ, सर्व बाजूंनी तपास सुरू

पंजाब : पंजाबमधील जालंधर जिल्ह्यात सीमा सुरक्षा दल (BSF) मुख्यालयाजवळ अचानक स्कूटरचा स्फोट झाल्याची धक्कादायक

Bharat Electronics Limited : संरक्षण मंत्रालयाचा भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड सोबत 1476 कोटींचा करार

नवी दिल्ली : संरक्षण मंत्रालयाने भारतीय लष्करासाठी किमान पाच ग्राउंड-बेस्ड मोबाईल इलेक्ट्रॉनिक सिस्टीमच्या

Narendra Modi : युएईच्या तेलक्षेत्रावरील इराणच्या हल्ल्याचा पंतप्रधान मोदींकडून तीव्र शब्दांत निषेध

नवी दिल्ली : इराणकडून संयुक्त अरब अमिराती (यूएई)च्या फुजैराह तेल औद्योगिक क्षेत्रावर झालेल्या हल्ल्यात तीन

'आयुष्मान भारत' ८ वर्षानंतर राष्ट्रीय होणार, लवकरच 'या' राज्यांमध्ये 'आयुष्मान भारत' लागू होणार

पश्चिम बंगालमधील ऐतिहासिक विजयानंतर, भारतीय जनता पक्ष केवळ राज्यात नेतृत्व निवडीच्या प्रक्रियेतच गुंतलेला