Dombivali News : पर्यटनासाठी कोकणात गेलेल्या डोंबिवलीच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

डोंबिवली : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील आरे समुद्र किनाऱ्यावर घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत डोंबिवलीतील २४ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. निशांत राजेश ठाकरे (रा. डोंबिवली वेस्ट, जि. ठाणे) असे मृत तरुणाचे नाव असून तो आपल्या मित्रांसह पर्यटनासाठी कोकणात आला होता.


मिळालेल्या माहितीनुसार, ११ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास निशांत आपल्या मित्रांसोबत आरे बीचवर पोहण्यासाठी गेला होता. यावेळी समुद्रातील पाण्याचा वेग आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने तो अचानक खोल पाण्यात ओढला गेला. त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्यासाठी आणि शोधण्यासाठी प्रयत्न केले, मात्र तो सापडला नाही. घटनेनंतर तातडीने रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली.



दरम्यान, दुसऱ्या दिवशी म्हणजे १२ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ७:१५ वाजता काळबादेवी-फडजीवाडी परिसरातील मारुती मंदिराजवळ समुद्रकिनाऱ्यावर एक मृतदेह आढळून आला. स्थानिक नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस पाटील आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर निशांतच्या कुटुंबीयांना बोलावण्यात आले आणि त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली.


पोलिसांनी मृतदेह रुग्णवाहिकेतून रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलवला, जिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी बीएनएसएस कलम १९४ अंतर्गत आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.


या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, समुद्रकिनाऱ्यावर पोहताना खबरदारी घेण्याचे आवाहन पुन्हा एकदा करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Pune Crime : धक्कादायक ! शरीरात दैवी शक्तीचा वास असल्याचं भासवून महिलेवर अत्याचार

पुणे : पुण्यामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरात एका भोंदूबाबानं चक्क अंगात देवी

Raja Shivaji : आशा भोसलेंच्या निधनानं सिनेसृष्टीवर शोककळा, 'राजा शिवाजी' सिनेमाबद्दल रितेशनं घेतला 'हा' मोठा निर्णय

मुंबई : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या बहुप्रतिक्षित सिनेमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत होते. या सिनेमाचा

Solapur News : झाडाला बांधलेली दोरी सुटली आणि... सख्ख्या भावंडांवर काळाचा घाला

सोलापूर : सोलापूर तालुक्यातील औज मंद्रूप परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. अंकलगी वस्तीवरील शेततळ्यात बुडून

Mumbai Local : आता पश्चिम रेल्वेचा प्रवास होणार अधिक सोयीस्कर, लवकरच या स्थानकांवर धावणार 15 डब्यांची लोकल

मुंबई : पश्चिम रेल्वेचा प्रवास लवकरच अधिक सोयीस्कर होणार आहे. पश्चिम रेल्वेवरील विरार ते डहाणूदरम्यान १९९४

Asha Bhosle : दुसरा जन्म मिळाला तर, पुन्हा आशा भोसलेच व्हायला आवडेल का?

गायिका आशा भोसले यांना एकदा मुलाखतीमध्ये विचारलेले की, दुसरा जन्म मिळाला तर तुम्हाला आशा भोसलेच व्हायला आवडेल

पं. हृदयनाथ मंगेशकरांचे भाषण अन् भावविवश आशाताई

'स्वरस्वामिनी आशा' या पुस्तकाचे प्रकाशन विले पार्लेतील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात राष्ट्रीय सरसंघचालक मोहन