Neral Housing Scam : नेरळमध्ये 93 गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा आरोप

रायगड : कर्जत तालुक्यातील नेरळ परिसरातील मोहाची वाडी, शनी मंदिर शेजारील ग्रामपंचायत हद्दीत जमीन व्यवहार आणि अपूर्ण बांधकामाशी संबंधित गंभीर आणि कायदेशीर दृष्ट्या गुंतागुंतीचे प्रकरण समोर आले आहे.


मौजे सर्वे क्रमांक 291, 292, 293 आणि 294 मधील सुमारे 58 गुंठे जमिनीवर 2015 साली संजय महेंद्र गुप्ता आणि अर्चना संजय गुप्ता यांनी विकास प्रकल्प सुरू केल्याची माहिती आहे. मात्र स्थानिकांच्या म्हणण्यानुसार ही जमीन गजानन आंबो डबरे या शेतकऱ्याच्या कुटुंबाची असून कोणताही अधिकृत करार न करता विकासकाम सुरू केल्याचा आरोप करण्यात आला आहे.



याच ठिकाणी इमारत उभारणीदरम्यान सुमारे 93 नागरिकांकडून फ्लॅट बुकिंग घेण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र कोणतेही स्पष्ट कारण न देता हे बांधकाम अचानक थांबवण्यात आले असून प्रकल्प अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.


दरम्यान, गजानन डबरे यांचे पुत्र जगदीश गजानन डबरे यांनी या प्रकरणात आपल्यावर खोट्या तक्रारी दाखल करण्यात आल्याचा आरोप केला आहे. तसेच जमीन व्यवहार, बांधकाम परवानग्या आणि बुकिंग प्रक्रियेची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. या प्रकरणात संजय महेंद्र गुप्ता यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल बंद आढळून आला. तसेच त्यांच्या वकिलांशी संपर्क साधण्याचे प्रयत्नही अपयशी ठरले.



स्थानिक नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली असून, अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी संबंधितांनी पुढाकार घ्यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Bihar : बिहारमध्ये बुधवारी सकाळी तीन नेतेच घेणार शपथ

पाटणा : जवळपास दोन दशकं बिहारचे नेतृत्व करणाऱ्या नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. आता ते

Chhattisgarh : वीज प्रकल्पात बॉयलरचा स्फोट, अनेकांचा मृत्यू

शक्ती : छत्तीसगडमधील शक्ती जिल्ह्यात वेदांता कंपनीच्या वीज निर्मिती प्रकल्पात बॉयलरचा स्फोट झाला. या स्फोटात नऊ

Ashok Kharat Case : अशोक खरातला पुन्हा ५ दिवसांची पोलिस कोठडी

नाशिक : भोंदूगिरी व महिलांच्या शोषणाच्या आरोपांमध्ये अडकलेल्या अशोक खरातच्या अडचणी आणखी वाढल्या असून,

Crime : मानवी तस्करी प्रकरणी ८ अटकेत, १६३ मुलांची सुटका

कटनी : बिहारमधून महाराष्ट्रात नेण्यात येत असलेल्या १६३ मुलांना मध्य प्रदेशातील कटनी रेल्वे स्थानकावर रविवारी

पर्यावरणप्रेमी की पर्यावरणाला हानीकारक आहे EV ?

नवी दिल्ली : दिल्ली सरकारने ‘ईव्ही धोरण २.०’ अंतर्गत विद्युत वाहनांना प्रदूषणाविरुद्ध प्रभावी पर्याय म्हणून

US-Iran Tensions : अमेरिका-इराण तणावात फ्रान्सची मध्यस्थी, पॅरिसमध्ये होणार मोठी बैठक

पॅरिस : पश्चिम आशियामध्ये युद्धाचे ढग दाटून आले असताना कूटनीतीची एक नवी किरण दिसू लागली आहे. फ्रान्सचे