- राष्ट्रीय सरचिटणीस पदासोबतच 'यूपी'च्या प्रभारी पदी नियुक्ती
मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ज्येष्ठ नेते आणि खासदार विनोद तावडे (Vinod Tawde) यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी पुनर्निवड करण्यात करण्यात आल्यानंतर, आता त्यांच्याकडे देशातील सर्वात महत्त्वाच्या आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील अशा उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन (BJP National President Nitin Nabin) यांनी याबाबत घोषणा केली.
अंमली पदार्थ विरोधी पथकाचे (NCB) माजी विभागीय संचालक आणि चर्चित आयआरएस अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आपल्या रोखठोक वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा सोशल ...
अडीच वर्षांनी होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीआधी येत्या काळात अत्यंत महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांकडे २०२९ च्या लोकसभेआधीची 'सेमी फायनल' मानले जात असून, त्यादृष्टीने भाजपने आतापासूनच कंबर कसली आहे. उत्तर प्रदेशसह तीन महत्त्वाच्या राज्यांत नव्या प्रभाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यात विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्याकडे उत्तर प्रदेश, सतीश पुनिया यांच्याकडे पंजाब, तर तरुण चुघ यांच्याकडे गुजरात भाजपच्या प्रभारीपदाची धुरा देण्यात आली आहे.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास; अमेरिकेतील कंपन्यांकडून गुंतवणुकीचा ओघ वाढणार मुंबई : "राज्याचा आर्थिक विकास वेगाने होत असून, ...
देशातील सर्वाधिक लोकसंख्या आणि लोकसभा जागा असलेल्या उत्तर प्रदेशमधील पक्षीय कामगिरीचा राष्ट्रीय राजकारणावर थेट परिणाम होत असतो. याआधी बिहार विधानसभा निवडणुकीत प्रभारी म्हणून विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी आपल्या रणनीतीचा आणि उत्कृष्ट संघटनात्मक कौशल्याचा करिष्मा दाखवला होता. त्यामुळे आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाने पुन्हा एकदा त्यांच्यावर मोठा विश्वास टाकला आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते, स्थानिक पदाधिकारी आणि केंद्रीय नेतृत्व यांच्यात योग्य समन्वय साधून विजयाचा मार्ग सुकर करण्याची महत्त्वाची भूमिका त्यांना पार पाडावी लागणार आहे.
भाजपच्या राजकीय रचनेत प्रदेश प्रभारी हे पद अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. केंद्र आणि राज्य संघटनेतील दुवा म्हणून प्रभारी काम पाहतात. पक्षाचा विस्तार करणे, स्थानिक नेत्यांमधील अंतर्गत मतभेद मिटवून ताळमेळ बसवणे आणि केंद्रीय नेतृत्वाने ठरवलेली निवडणूक रणनीती प्रत्यक्ष जमिनीवर यशस्वीपणे राबवणे, हे प्रभारींचे मुख्य काम असते. (Vinod Tawde)