Mumbai Live Concert Drug : मुंबई हादरली! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये मृत्यूचा थरार; ड्रग ओव्हरडोसमुळे २ विद्यार्थ्यांचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील एका लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टदरम्यान (Mumbai Live Concert Drug) घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये ११ एप्रिल रोजी आयोजित कार्यक्रमात ड्रग ओव्हरडोस झाल्यामुळे दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे कॉलेज तरुणांपर्यंत ड्रग्जचे जाळे पोहोचले आहे का, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.



आणखी एक विद्यार्थी गंभीर अवस्थेत :


मृतांमध्ये एक तरुण आणि एक तरुणी असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय आणखी एक विद्यार्थी गंभीर अवस्थेत असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून विशेषतः कॉलेज विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.



५ जणांना अटक :


या प्रकरणी वनराई पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत ५ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये इव्हेंटशी संबंधित एका व्यक्तीचाही समावेश असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. तसेच १३ एप्रिल रोजी नेस्को सेंटरच्या इव्हेंट्स अँड एक्झिबिशन्स विभागातील व्हाइस प्रेसिडेंटलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.



पोलिसांकडून सखोल चौकशी सुरु :


प्राथमिक तपासानुसार, संबंधित विद्यार्थ्यांना ड्रगचे सेवन करण्यास प्रवृत्त करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, नेमका कोणता ड्रग वापरण्यात आला आणि तो कोणी पुरवला, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. पोलिसांकडून याचा सखोल तपास सुरू आहे.


या घटनेमुळे मुंबईतील इव्हेंट्सच्या सुरक्षेवर आणि ड्रग्ज नियंत्रण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तरुण पिढीच्या सुरक्षिततेसाठी अधिक कठोर उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Comments
Add Comment

Blue Flag Beach : श्रीवर्धन समुद्रकिनारा ‘ब्लू फ्लॅग बीच’ म्हणून विकसित होणार

मुंबई : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याचा शाश्वत विकास साधत त्याला ‘ब्लू फ्लॅग बीच’ म्हणून विकसित

Maharashtra : गोदा ते नर्मदा या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६ उपक्रमाचा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून होणार

मुंबई : "गोदा ते नर्मदा" या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६ चा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून

Maharashtra : उदंचन जलविद्युत प्रकल्पाद्वारे ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्र अग्रेसर ठरणार

मुंबई : राज्यातील वीज निर्मितीची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येणार येत उदंचन जलविद्युत प्रकल्पातून एक

Heat Wave : उष्णता लाटेच्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी राज्य शासन सज्ज

मुंबई  : वातावरणीय बदलांमुळे राज्यात हवामानात मोठे आणि अनियमित बदल दिसून येत आहेत. मे महिन्यात पाऊस, एप्रिलमध्ये

Reservation : अनुसूचित जाती उपवर्गीकरणाबाबत निवेदन देण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने निवेदन किंवा अर्ज सादर करण्यासाठी

Nitesh Rane : मत्स्य शेतकऱ्यांच्या उत्पादनांसाठी राज्यात 'क्लस्टर', मूल्यवर्धनासाठी कारखाना उभारण्यावरही चर्चा

मुंबई : राज्यातील मत्स्यव्यवसायाला आधुनिक उद्योगाची जोड देण्यासाठी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे