Vidarbha Heat Wave : विदर्भात उष्णतेचा कहर; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

विदर्भात एप्रिल महिन्याच्या मध्यातच उष्णतेचा तडाखा (Vidarbha Heat Wave) तीव्र होऊ लागला असून नागरिकांना पुढील काही दिवस सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने १३ एप्रिल ते १७ एप्रिल या कालावधीत अकोला सहित विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.


प्रशासनाने दिलेल्या सूचनांनुसार, नागरिकांनी शक्यतो दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे. या काळात सूर्यप्रकाश तीव्र असल्यामुळे उष्माघाताचा धोका अधिक असतो. अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर जाणे टाळावे आणि बाहेर पडताना डोक्यावर टोपी, अंगावर हलके कपडे तसेच पाण्याची बाटली सोबत ठेवावी. तापमान वाढल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत आणि उन्हात वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी.



लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि पाळीव प्राणी यांच्यासाठी विशेष (Vidarbha Heat Wave) दक्षता घेणे आवश्यक आहे. त्यांना बंद किंवा पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये, कारण त्यामुळे जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. तसेच नागरिकांनी तहान लागली नसली तरी नियमितपणे पाणी पिण्यावर भर द्यावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


उष्माघाताची लक्षणे जसे की डोकेदुखी, चक्कर येणे, अशक्तपणा, मळमळ किंवा जास्त घाम येणे याकडे दुर्लक्ष करू नये. अशी लक्षणे जाणवल्यास तात्काळ सावलीत विश्रांती घ्यावी आणि गरज असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.


दरम्यान, पशुधन व पाळीव प्राण्यांनाही उष्णतेपासून (Vidarbha Heat Wave) संरक्षण देणे गरजेचे आहे. त्यांना सावलीत ठेवून स्वच्छ आणि थंड पाण्याची उपलब्धता करून द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Comments
Add Comment

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 143 व्या जयंतीनिमित्त 31 मे रोजी ‘त्रिवेणी’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई : शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला

DCM Eknath Shinde : मोदी खरे धुरंदर, त्यांच्यावर टीका करणारे दलिंदर, हर्षवर्धन सकपाळ यांच्या मोदीवरील टीकेला उपमुख्यमंत्री शिंदेंचे प्रत्युत्तर

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या बारा वर्षांत देशाचे यशस्वीपणे नेतृत्व करत भारताला विकास,

Petrol-diesel hoarders : पेट्रोल-डिझेल साठेबाजांविरोधात मुख्यमंत्री ॲक्शन मोडवर, पुरवठा आणि गृहविभागाकडून संयुक्त कारवाई होणार

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत सरासरीपेक्षा लक्षणीयरित्या मोठी वाढ झाली आहे.

Mantri Nitesh Rane : हर्षवर्धन सपकाळ यांनी लायकीनुसार बोलावे ! मंत्री नितेश राणे

मंत्री नितेश राणे यांचा हल्लाबोल; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेला

Cabinet meeting : मंत्रिमंडळ बैठकीत घेतले 'हे' महत्त्वपूर्ण निर्णय

राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली

गुगलवर अहिराणी बोलीला अधिकृत मान्यता; खान्देश वासियांमध्ये आनंद

खान्देशची ओळख असलेल्या अहिराणी बोलीला आता जागतिक स्तरावर नवी ओळख मिळाली असून, गुगलने अहिराणी भाषेला अधिकृत