NABARD : सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह सागरी जिल्ह्यांतील मच्छिमारांना दिलासा

नाबार्डकडून ६१ कोटी २४ लाख; मुलभूत सोयी सुविधांसह जेट्टी आणि बंदरांचा होणार कायापालट


मुंबई : सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह सागरी जिल्ह्यांतील मच्छिमारांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. किनारपट्टी लाभलेल्या जिल्ह्यांमधील मच्छिमारांना मासळी उतरवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांचे जाळे अधिक सक्षम करण्यासाठी नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधीअंतर्गत ६१ कोटी २४ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाला सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील मच्छिमारांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.



राज्यातील अनेक मासळी उतरवण्याच्या केंद्रांवर मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव असल्याची बाब सातत्याने समोर येत होती. ही उणीव भरून काढण्यासाठी सरकारने नाबार्डच्या कर्ज योजनेतून बंदरे आणि लहान धक्के (जेट्टी) उभारण्याचे निश्चित केले आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पांसाठी लागणाऱ्या एकूण निधीपैकी ९५ टक्के वाटा नाबार्ड उचलणार असून, केवळ ५ टक्के वाटा राज्य सरकारला खर्च करावा लागणार आहे. मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या या निधीतून काही पूर्ण झालेली कामे आणि सध्या प्रगतीपथावर असलेल्या प्रकल्पांना गती दिली जाणार आहे. यात प्रामुख्याने ठाणे जिल्हा दिवाळे गाव, पालघर जिल्ह्यातील धाकटी डहाणू आणि पाचू बंदर. रायगड जिल्ह्यातील बोर्ली मांडला, दिघी, राजपुरी आणि नांदगाव. रत्नागिरीमधील वेलदूर आणि बोऱ्या, तर सिंधुदुर्गमधील विजयदुर्ग आणि मुंबईतील चिंबई येथील कामांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

Wipro Office Religious Harassment : TCS नंतर आता विप्रोही वादाच्या भोवऱ्यात? धर्म बदलण्यास नकार दिल्याने नोकरी गमवावी लागली; पुण्यातील माजी कर्मचारीचा गंभीर आरोप

पुणे : नाशिकमधील TCS कार्यालयात कथित धार्मिक छळ आणि धर्मांतराच्या दबावाच्या आरोपांनंतर आता पुण्यातील आयटी कंपनी

Shrirampur ATS Raid : पाकिस्तानी गँगस्टरच्या सोशल मीडिया नेटवर्कचा महाराष्ट्रात शिरकाव? श्रीरामपूरमध्ये ATS ची मोठी कारवाई, चार जण ताब्यात

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात मोठी कारवाई करत चार संशयितांना

Minister Makarand Jadhav-Patil : राज्यात नवे पुनर्वसन धोरण येणार

मंत्री मकरंद जाधव-पाटील; कालानुरूप सर्व बदल समाविष्ट करणार मुंबई : राज्यातील दरडप्रवण गावांचे कायमस्वरूपी

HSRP Number Plates : वाहनधारकांसाठी महत्त्वाची सूचना! ३० जूनपूर्वी HSRP नंबर प्लेट बसवणे अनिवार्य; अन्यथा कारवाईची शक्यता

राज्यातील लाखो वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ अंतर्गत सर्व शासकीय आणि

Shivrajyabhishek Sohala : शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी शिवभक्तांसाठी विशेष बससेवा सुरू; आता दादरहून थेट सांदोशीपर्यंत प्रवास करता येणार

रायगड : शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगडावर जाणाऱ्या शिवभक्तांसाठी दिलासादायक बातमी समोर आली

Raigad Crime : सोन्याच्या दागिन्यांसाठी महिलेचे अपहरण करून खून; दोघांना अटक

रायगड : सोन्याच्या दागिन्यांच्या लालसेपोटी एका महिलेचे अपहरण करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना मांडवा