NABARD : सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह सागरी जिल्ह्यांतील मच्छिमारांना दिलासा

नाबार्डकडून ६१ कोटी २४ लाख; मुलभूत सोयी सुविधांसह जेट्टी आणि बंदरांचा होणार कायापालट


मुंबई : सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह सागरी जिल्ह्यांतील मच्छिमारांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. किनारपट्टी लाभलेल्या जिल्ह्यांमधील मच्छिमारांना मासळी उतरवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांचे जाळे अधिक सक्षम करण्यासाठी नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधीअंतर्गत ६१ कोटी २४ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाला सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील मच्छिमारांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.



राज्यातील अनेक मासळी उतरवण्याच्या केंद्रांवर मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव असल्याची बाब सातत्याने समोर येत होती. ही उणीव भरून काढण्यासाठी सरकारने नाबार्डच्या कर्ज योजनेतून बंदरे आणि लहान धक्के (जेट्टी) उभारण्याचे निश्चित केले आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पांसाठी लागणाऱ्या एकूण निधीपैकी ९५ टक्के वाटा नाबार्ड उचलणार असून, केवळ ५ टक्के वाटा राज्य सरकारला खर्च करावा लागणार आहे. मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या या निधीतून काही पूर्ण झालेली कामे आणि सध्या प्रगतीपथावर असलेल्या प्रकल्पांना गती दिली जाणार आहे. यात प्रामुख्याने ठाणे जिल्हा दिवाळे गाव, पालघर जिल्ह्यातील धाकटी डहाणू आणि पाचू बंदर. रायगड जिल्ह्यातील बोर्ली मांडला, दिघी, राजपुरी आणि नांदगाव. रत्नागिरीमधील वेलदूर आणि बोऱ्या, तर सिंधुदुर्गमधील विजयदुर्ग आणि मुंबईतील चिंबई येथील कामांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

Weather Update : हवामान विभागाचा 'हाय अलर्ट': पुढचे १० तास देशासाठी धोक्याचे! जाणून घ्या महाराष्ट्राचा अंदाज काय ?

देशातील हवामानात अचानक मोठे बदल पाहायला मिळत असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) अत्यंत धोक्याचा इशारा दिला आहे.

Sangali Tadkadtai : महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अनोखा वारसा; कोकणचा ‘संकासूर’ आणि सांगलीची ‘तडकडताई’

महाराष्ट्र: महाराष्ट्र हे विविधतेने नटलेले राज्य आहे. येथे केवळ सण-उत्सव साजरे केले जात नाहीत, तर शतकानुशतके चालत

Pune News : मदरसा क्लासच्या बहाण्याने घरी थांबवलं आणि १४ वर्षाच्या मुलीला नको नको तिथे... पुण्यातील कात्रज हादरले!

पुणे : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे एका लहान मुलीवर झालेल्या अत्याचाराची संतापजनक घटना ताजी असतानाच, आता

Amravati Murder Case : सिनेमापेक्षाही भयंकर! आधी हाताचा पंजा छाटला अन् मग कोयत्याने सपासप वार केला; नेमकं कारण काय?

प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वाट मिटवायला बोलावून केला घात, २४ वर्षीय तरुणाची भररस्त्यात हत्या अमरावती : अमरावती

Devendra Fadnavis : शेतकऱ्यांचे ४८ हजार कोटींचे थकीत वीजबिल माफ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; कर्जमाफीबद्दल राज्यातील शेतकऱ्यांकडून सन्मान मुंबई : राज्यातील

Mumbai-Goa Highway Accident : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण दुर्घटना! गोव्याहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ३ जणांचा जागीच मृत्यू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला असून गोव्याहून मुंबईकडे परतणाऱ्या एका कुटुंबावर