Nashik Housing Scam : नाशिकमधील गृहनिर्माण घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी

 विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश


मुंबई : नाशिकमधील बहुचर्चित म्हाडा घरकुल फसवणूक प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून, या संपूर्ण प्रकरणातील अनियमिततेची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या निर्देशानुसार महसूल व वन विभागाने या समितीबाबतचा अधिकृत शासन निर्णय (जीआर) प्रसिद्ध केला आहे.



नाशिक शहरात ४ हजार चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या गृहप्रकल्पांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) २० टक्के जागा राखीव ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, या नियमाचे सर्रास उल्लंघन करून हजारो सदनिका म्हाडाला न देता शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी यापूर्वीच १९४ विकासकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये शहरातील अनेक नामवंत विकासकांचा समावेश असून, सध्या या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) सुरू आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याने प्रशासकीय पातळीवर सखोल चौकशी करण्यासाठी आता सहा सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे.



नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार असून, त्यात नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पुणे येथील जमावबंदी आयुक्त, नोंदणी महानिरीक्षक, नगर रचना संचालक आणि नाशिकचे उपसंचालक भूमिअभिलेख यांचा समावेश करण्यात आला आहे. ही समिती २०१३ ते २०२४ या कालावधीत उभारण्यात आलेल्या प्रकल्पांची तपासणी करणार आहे. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या समितीच्या अहवालात ४९ प्रकल्पांमध्ये नियमांची पायमल्ली झाल्याचे प्राथमिकरित्या समोर आले होते, त्याचाच आधार घेऊन ही समिती आता सविस्तर चौकशी करणार आहे.



दोषी विकासकांवर फौजदारी कारवाई होणार


या समितीची कार्यकक्षा अत्यंत व्यापक ठेवण्यात आली आहे. ज्या विकासकांनी राखीव सदनिका उपलब्ध करून दिल्या नाहीत, त्यांच्याकडून नियमानुसार वसुली करणे, या गैरव्यवहारास जबाबदार असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर शिस्तभंगविषयक कारवाईची शिफारस करणे, तसेच दोषी विकासकांवर फौजदारी कारवाई करणे असे महत्त्वपूर्ण अधिकार या समितीला देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, भविष्यात अशा स्वरूपाचे घोटाळे रोखण्यासाठी कोणती यंत्रणा राबवता येईल, याबाबतही समिती उपाययोजना सुचवणार आहे.

Comments
Add Comment

Asha Bhosle : आज स्वर शांत झाले, स्वर समाधी; सूर सम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन

मुंबई : अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि आशा ताईंना शनिवारी तात्काळ मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात

Maharashtra's Energy Capacity : महाराष्ट्राची ऊर्जा क्षमता वाढणार

 पहिल्या कोळसा रेल्वे रॅकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत मुंबई : राज्याच्या ऊर्जा

Minister Pankaja Munde : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत शेतकरी गट व वराह पालनाचा समावेश - पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

मुंबई : राज्यात पशुधनावर आधारित उद्योजकता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना घोषित

Maharashtra Cabinet Decisions : महाराष्ट्रातील सरकारी भरती प्रक्रियेसंदर्भात राज्य शासनाचा मोठा निर्णय, मंत्रिमंडळ बैठकीत घेतले सात महत्त्वाचे निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत एकूण

North Mumbai Job Fairs : उत्तर मुंबईत दोन मेगा जॉब फेअर, युवकांना रोजगाराच्या मिळणार  संधी 

अटल बिहारी वाजपेयी कौशल्य विकास केंद्र (ABVKVK) अंतर्गत मेगा जॉब फेअरला उत्स्फूर्त प्रतिसाद 400 हून अधिक उमेदवारांची

Eknath Shinde : आशाताईंनी स्वर समाधी घेतली! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहिली श्रद्धांजली

चंद्र-सूर्य आहेत तोवर आशाताईंची गाणी अजरामर राहतील मुंबई : लता दीदी, आशा ताई आणि मंगेशकर कुटुंबाकडून सिने