North Mumbai Job Fairs : उत्तर मुंबईत दोन मेगा जॉब फेअर, युवकांना रोजगाराच्या मिळणार  संधी 

अटल बिहारी वाजपेयी कौशल्य विकास केंद्र (ABVKVK) अंतर्गत मेगा जॉब फेअरला उत्स्फूर्त प्रतिसाद


400 हून अधिक उमेदवारांची निवड/शॉर्टलिस्ट; काहींना ऑन-द-स्पॉट ऑफर लेटर


20 कंपन्यांचा सहभाग


उत्तर मुंबईतील सर्व युवकांना रोजगार देण्याच्या दृष्टीकोनातून आतापर्यंत 50,000 हून अधिक नोकऱ्या निर्माण


उत्तर मुंबईतील 100 ठिकाणी मेगा जॉब फेअर आयोजित केले जाणार


मुंबई : उत्तर मुंबईत दोन मेगा जॉब फेअर आयोजित करण्यात आले, जे उत्तर मुंबईचे खासदार व केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या पुढाकाराचा भाग आहेत. हे जॉब फेअर अटल बिहारी वाजपेयी कौशल्य विकास केंद्र (ABVKVK), कांदिवली पूर्व यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले, जे त्यांची संकल्पना आहे. या जॉब फेअरला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून उत्तर मुंबईतील 400 हून अधिक युवकांची निवड/शॉर्टलिस्ट करण्यात आली. काही उमेदवारांना ऑन-द-स्पॉट ऑफर लेटर देण्यात आले.


कॉर्पोरेट क्षेत्रातील 20 नामांकित कंपन्यांच्या सहभागामुळे उत्तर मुंबईत रोजगार निर्मितीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले. यामध्ये व्होडाफोन, अदानी, मोटोरोला, ॲमेझॉन, लोरिअल इंडिया आणि डी-मार्ट यांचा समावेश होता.



या उपक्रमाबाबत बोलताना पीयूष गोयल म्हणाले:


“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वातून प्रेरणा घेऊन उत्तर मुंबईत युवकांसाठी योग्य संधी आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत. अटल बिहारी वाजपेयी कौशल्य विकास केंद्र (ABVKVK), कांदिवली पूर्व यांच्या माध्यमातून आम्ही कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीच्या माध्यमातून उत्तर मुंबईतील प्रत्येक युवकाला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहोत. हे उपक्रम ‘विकसित भारत @2047’ या उद्दिष्टासाठी समर्पित आहेत.”  अशा उपक्रमांमुळे युवकांना थेट उद्योगांशी जोडले जाते आणि रोजगारासाठी मजबूत व्यासपीठ निर्माण होते.


11 एप्रिल रोजी जॉब फेअर मह‍िला कल्याण केंद्र, कांदिवली (पश्चिम) येथे आणि 12 एप्रिल रोजी उत्पल सांघवी ग्लोबल स्कूल, बोरीवली (पश्चिम) येथे आयोजित करण्यात आला. मोठ्या संख्येने युवकांनी उत्साहाने सहभाग घेतला, ज्यामध्ये महिला आणि पुरुष दोघांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता। उत्तर मुंबईतील 100 ठिकाणी मेगा जॉब फेअर आयोजित केले जाणार असून त्यामुळे युवकांसाठी रोजगाराच्या संधी अधिक व्यापक होतील. या जॉब फेअरमध्ये माहिती तंत्रज्ञान व IT-ITeS, रिटेल, क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट्स (QSR), बँकिंग व फायनान्स, कॉमर्स व अॅडमिनिस्ट्रेशन तसेच टेक आणि नॉन-टेक क्षेत्रांमध्ये संधी उपलब्ध करून देण्यात आल्या.


विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी संधी उपलब्ध करून देण्यात आल्या, ज्यामध्ये 10वीच्या खालील, 10वी पास, 12वी पास, ITI, डिप्लोमा धारक, पदवीधर आणि पदव्युत्तर उमेदवारांचा समावेश होता.


हे नमूद करणे आवश्यक आहे की उत्तर मुंबईतील सर्व युवकांना रोजगार देण्याच्या दृष्टीकोनातून आतापर्यंत 50,000 हून अधिक नोकऱ्या निर्माण करण्यात आल्या आहेत. हे अटल बिहारी वाजपेयी कौशल्य विकास केंद्र (ABVKVK), कांदिवली पूर्व या स्किलिंग आणि रोजगार प्लॅटफॉर्मद्वारे शक्य झाले आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रांमध्ये प्रत्येकी एक केंद्र स्थापन करण्याच्या योजनेअंतर्गत आणखी दोन केंद्रे लवकरच सुरू होणार आहेत. ही केंद्रे उत्तर मुंबईला ‘उत्तम मुंबई’मध्ये परिवर्तित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील.

Comments
Add Comment

FDA Raid : सीसीआय', 'एमआयजी क्लब', जुहू जिमखान्यासह नामांकित क्लबवर 'एफडीए'ची कारवाई

परवाने निलंबित; स्वयंपाकघरांमध्ये माश्या, झुरळांचा सुळसुळाट, बुरशी लागलेल्या भाज्या आणि अस्वच्छतेचे

Drug Free Mumbai : 'ड्रग्ज फ्री मुंबई'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी ३० जुलै २०२६ रोजी शुभारंभ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  तरूणाईला व्यसनाधिनतेपासून रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी योग्य

Devendra Fadnavis : पालघरच्या महापूर बाधितांसाठी एकात्मिक मदत आराखडा करावा

मुंबई : पालघर हा मुबलक पाऊस पडणारा आणि वेगाने नागरीकरण होत असलेला जिल्हा असल्याने या अनुषंगाने भविष्यातील विविध

Nitesh Rane : मोर्शीतील अत्याधुनिक मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे काम वेळेत पूर्ण करा; मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

अमरावती : राज्यातील मत्स्य शिक्षण आणि संशोधनाला चालना देण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे उभारण्यात

Drugs Free Mumbai : 'ड्रग्स फ्री मुंबई' मॉडेलचा राज्यभर विस्तार; राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये 'नशामुक्ती मार्गदर्शन आणि समुपदेशन समिती' स्थापन होणार

मुंबई : मुंबई शहरात अमली पदार्थांच्या विरोधात सुरू करण्यात आलेल्या 'ड्रग्स फ्री मुंबई' अभियानाचे मॉडेल आता

Guru Purnima : गुरुपौर्णिमा नेमकी कधी ? जाणून घ्या गुरुपौर्णिमेचे महत्त्व

मुंबई : हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. आपल्या गुरुबद्दल असलेला आदर, कृतज्ञता व्यक्त