Asha Bhosle : आज स्वर शांत झाले, स्वर समाधी; सूर सम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन

मुंबई : अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि आशा ताईंना शनिवारी तात्काळ मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आहे. रात्रभर उपचार सुरु होते आणि रविवारी सकाळी अचानक त्यांची प्राणज्योत मावळली, सूर सम्राज्ञी शांत झाली.



सिने-सृष्टी हळहळली


आधी लता दीदी आणि आता आशा ताई मंगेशकर घराण्यांचे दोन हिरे, दोन स्वर शांत झाले. त्यामुळे संपूर्ण चाहत्यांमध्ये सेलेब्रिटींमध्ये शोककळा पसरली आहे. आज सकाळी ११ वाजता आशा भोसले यांचे पार्थिव कासा ग्रँड लोअर परेल येथील निवास्थानी ठेवण्यात आले होते. आशा ताईंना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसागर उसळला महाराष्ट्रातील नेते मंडळींसह अनेक दिग्गज कलाकार खेळाडू यांनी अंतिम संस्कारात आपली उपस्थिती लावली.त्यांच्या घरापासून ते शिवाजी पार्कपर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. शासकीय इतमामात शिवाजी पार्कमध्ये आशा ताईंवर अंत्यसंस्कार करण्यात आले.



ही नेते मंडळी आशा ताईंसोबत शेवटच्या क्षणी होती उपस्थित


महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबईच्या महापौर रितू तावडे, भाजप नेते आशिष शेलार, उबाठाचे उद्धव ठाकरे सहकुटुंबीय आशा ताईंना निरोप देण्यासाठी उपस्थित होते.



सिने -सृष्टी कलाकार


रितेश देशमुख, तब्बू, विकी कौशल, राकेश रोशन, अनुराधा पौडवाल, नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, हेलन, रणवीर सिंग, आमिर खान, सचिन पिळगावकर, सुशांत शेलार तसेच क्रीडा विश्वातून देखील सपत्नीक सचिन तेंडुलकर , मोहम्मद सिराज या खेळाडूंनी आशा ताईंना वाहिली श्रद्धांजली

Comments
Add Comment

Heavy Rainfall Warning : राज्यात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा, कोकण, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रात सतर्कतेचे आवाहन

मुंबई : राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला असून

Mumbai News : मस्जिद बंदर येथे म्हाडाच्या इमारतीचा भाग कोसळला; ६ जणांची सुटका, २ जखमी

मुंबई: मुंबईतून एक मोठी दुर्घटना टळल्याची बातमी समोर आली आहे. शनिवारी दुपारी मुंबईतील अत्यंत दाट वस्तीच्या आणि

Devendra Fadnavis : मी राज्यात समाधानी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर भाष्य; संत तुकारामांच्या अभंगाचा संदर्भ देत या चर्चांना पूर्णविराम मुंबई :

Maharashtra News : राज्यातील निम्म्याहून अधिक धरणे भरली

५३.३८ टक्के पाणीसाठा; मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम मुंबई : राज्यातील विविध

Mumbai Environment : तरंगता कचरा रोखण्यासाठी मालाडमध्ये 'द ओशन क्लीनअप' इंटरसेप्टर पायलट प्रकल्प कार्यान्वित

तरंगता कचरा संकलन प्रकल्प पाहणीसाठी तेजिंदर सिंग तिवाना उतरले नदीपात्रात! मुंबई : मालाड खाडीमध्ये जागतिक

MUMBAI-PUNE WATER LEVEL : मुंबई आणि पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली; दोन्ही शहरांच्या धरणांमध्ये जोरदार जलसाठा जमा!

मुंबई: महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः मुंबई व पुणेकरांसाठी एक अतिशय दिलासादायक बातमी समोर आली आहे. यावर्षी