Mira - Bhayanda Cylinder Blast : भाईंदरमध्ये सिलेंडरचा स्फोट; झोपडपट्टीला बेचिराख, तिघांचा मृत्यू

भाईंदर : मुंबईजवळील भाईंदर परिसरात सिलेंडर स्फोटाची घटना घडली असून परिसरात घबराट पसरली आहे. झोपडपट्टी भागात लागलेल्या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्या असून काही लोकांचा मृत्यू झाला आहे. काही जण गंभीर जखमी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.



अवैध साठ्यामुळे दुर्घटना?


प्राथमिक माहितीनुसार, संबंधित ठिकाणी मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरचा अवैध साठा करण्यात आला होता. युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅसचा तुटवडा आणि वाढलेले दर याचा फायदा घेत हा साठा केल्याचा संशय आहे.




नेमकी घटना कशी घडली?


इंद्रलोक परिसरात शुक्रवारी रात्री सुमारे ८ ते ८.३० वाजण्याच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. लोंढा कॉम्प्लेक्सच्या मागील मोकळ्या जागेत उभारलेल्या तात्पुरत्या शेडमध्ये ठेवलेल्या सिलेंडरना अचानक आग लागली आणि त्यानंतर एकामागून एक स्फोट झाले.



स्फोटांची मालिका आणि आगीचा फैलाव


या आगीत सुमारे २० ते ३० सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. स्फोटांच्या तीव्रतेमुळे आग वेगाने पसरली आणि आसपासच्या झोपड्यांना आगीच्या भक्ष्यस्थानी आल्या. काही वाहनांचेही मोठे नुकसान झाले.




जीवितहानी आणि जखमी


या दुर्घटनेत आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.



अग्निशमन दल


घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. स्थानिकांच्या मदतीने आग नियंत्रणात आणण्यात यश आले. घटनास्थळावरून सुमारे २६ ते २९ सिलेंडर आढळल्याचेही समोर आले आहे.


आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, निवासी भागात इतक्या मोठ्या प्रमाणात सिलेंडर साठा कसा करण्यात आला? , याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Comments
Add Comment

Maharashtra Sadan : 'दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा'

नवी दिल्ली : सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्ली दौऱ्यादरम्यान नवीन व जुने

Mhada : म्हाडाच्या घरांसाठी शुक्रवारपर्यंत अर्ज करता येणार

आतापर्यंत ८७ हजार २३९ अर्ज, तर ६१,१५३ अनामत रक्कमेसह अर्ज दाखल मुंबई : म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्ज करण्याची

Water Management : तलावांमध्ये १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक

पाणी जपून वापरण्याचे मुंबईकरांना आवाहन मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये फक्त २,५८,४१० द. श. लि.

Wrestling : भारतीय मल्लांचे आशियाई कुस्तीत वर्चस्व, २७ पदकांसह पटकावले सांघिक विजेतेपद

नवी दिल्ली : व्हिएतनाममधील दा नांग येथे पार पडलेल्या २३ वर्षांखालील आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतीय पुरुष

Heatwave : उष्णतेच्या लाटेत विशेष खबरदारी घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आवाहन

नवी दिल्ली : दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि पंजाबसह अनेक राज्यांमध्ये तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या

Modi : मोदी सरकारने केलेल्या ३ सुधारणांमुळे ८० कोटी रेशनधारकांना होणार फायदा

नवी दिल्ली : पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकार दर महिन्याला ८० कोटी लोकांना अन्नधान्याचा