Ashok Kharat : भोंदू अशोक खरात प्रकरणात १६० जीबी डिजिटल डेटा जप्त

नाशिक : नाशिकमध्ये चर्चेत असलेल्या स्वयंघोषित कॅप्टन भोंदू अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक प्रकरणे समोर येत आहेत. तपास यंत्रणांनी तब्बल १६० जीबी इतका डिजिटल डेटा जप्त केला असून, या पुराव्यांमुळे प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. फॉरेन्सिक तपास पूर्ण झाल्यानंतर संबंधित अहवाल विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) सादर करण्यात आला आहे. या नव्या पुराव्यांमुळे अशोक खरात यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


तपासादरम्यान विविध डिजिटल उपकरणांतून मोठ्या प्रमाणावर माहिती मिळाली आहे. तीन पेन ड्राइव्हमधील ३२ जीबी डेटा, त्यामधील १९ स्वतंत्र फोल्डर्स, ६४ जीबी क्षमतेचा ओटीजी पेन ड्राइव्ह तसेच एक लॅपटॉप यांची तपासणी करण्यात आली. या सर्व उपकरणांतील माहिती सायबर आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून सखोल तपासली जात असून, एकूण १६० जीबीपेक्षा अधिक डेटा तपास यंत्रणांच्या हाती लागला आहे.या डिजिटल पुराव्यांमधून नोव्हेंबर २०२३ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत घडलेल्या घटनांचा तपशील उघड झाला आहे. विशेषतः कॅनडा कॉर्नर परिसरातील कार्यालयातून जप्त केलेल्या माहितीमुळे अनेक बाबी स्पष्ट होत आहेत. तपास यंत्रणांनी प्रत्येक पुराव्याचे ‘ए’, ‘बी’ आणि ‘बी’ अशा कोडमध्ये वर्गीकरण केले असून, ‘ए’ गटातील माहिती अत्यंत संवेदनशील असल्याचे समोर आले आहे. याशिवाय, या प्रकरणात साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले असून न्यायालयात सादर करण्यासाठी पुरावे व्यवस्थित गोळा केले जात आहेत. डिजिटल माहिती आणि साक्षीदारांच्या जबाबांमुळे तपास अधिक मजबूत झाला आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी नवे पैल समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


दरम्यान, या प्रकरणातील तिसऱ्या गुन्ह्यात अशोक खरात यांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सुनावणीदरम्यान काही गंभीर आरोप मांडण्यात आले. एका प्रकरणात पीडितेला विशिष्ट आश्वासन देऊन फसवणूक केल्याचा आरोप वकिलांनी केला. या पार्श्वभूमीवर तपासासाठी अधिक वेळ देत न्यायालयाने पोलिस कोठडी मंजूर केली. एकूणच, डिजिटल पुरावे, फॉरेन्सिक अहवाल आणि साक्षीदारांचे जबाब यामुळे अशोक खरात प्रकरण निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे. तपास यंत्रणा आता या सर्व पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई करत असून, येत्या काळात आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

Panchayat Elections : ग्रामपंचायत निवडणुका पुन्हा लांबणीवर

४ ऑगस्टच्या यादीला ब्रेक; राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय मुंबई : मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकीय

Night Walk : रात्रीच्या जेवणानंतर शतपावली किती महत्त्वाची?

शरीर निरोगी ठेवण्यासाठी अनेक लोक सकाळी व्यायाम आणि Morning Walk करतात. यामुळे नक्कीच शरीराला फायदे होतात यात काही शंका

Indian Railways Facts : ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर 'X' चे चिन्ह का असते ? हे चिन्ह नसेल, तर रेल्वे कंट्रोल रूममध्ये का उडते धांदल ? पाहा रेल्वे सुरक्षेचे मोठे रहस्य!

रेल्वे प्रवास करताना बहुतांश प्रवाशांचे मुख्य ध्येय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुखरूप पोहोचणे हेच असते. जर

Minister Nitesh Rane : महाराष्ट्र सागरी व भूजलशाही मच्छीमार कल्याणकारी महामंडळाच्या स्थापनेबाबत मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा

मुंबई: महाराष्ट्र सागरी व भूजलशाही मच्छीमार कल्याणकारी महामंडळाच्या स्थापनेसंदर्भात मंत्रालयात

Nashik : नाशिकच्या जलसंवर्धन उपक्रमाची ‘मन की बात’मध्ये दखल, प्रधानमंत्री मोदींकडून कौतुक

Nashik : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रविवारी ( दि.२६) ‘मन की बात’ कार्यक्रमात नाशिक जिल्ह्यात राबविण्यात

Nitesh Rane: ससून डॉक आणि मरोळ मच्छीमार मार्केटच्या विकासकामांचा नितेश राणेंकडून आढावा

मुंबई: मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुंबईतील ससून डॉक आणि मरोळ मच्छीमार मार्केटच्या