Ashok Kharat : भोंदू अशोक खरात प्रकरणात १६० जीबी डिजिटल डेटा जप्त

नाशिक : नाशिकमध्ये चर्चेत असलेल्या स्वयंघोषित कॅप्टन भोंदू अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक प्रकरणे समोर येत आहेत. तपास यंत्रणांनी तब्बल १६० जीबी इतका डिजिटल डेटा जप्त केला असून, या पुराव्यांमुळे प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. फॉरेन्सिक तपास पूर्ण झाल्यानंतर संबंधित अहवाल विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) सादर करण्यात आला आहे. या नव्या पुराव्यांमुळे अशोक खरात यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


तपासादरम्यान विविध डिजिटल उपकरणांतून मोठ्या प्रमाणावर माहिती मिळाली आहे. तीन पेन ड्राइव्हमधील ३२ जीबी डेटा, त्यामधील १९ स्वतंत्र फोल्डर्स, ६४ जीबी क्षमतेचा ओटीजी पेन ड्राइव्ह तसेच एक लॅपटॉप यांची तपासणी करण्यात आली. या सर्व उपकरणांतील माहिती सायबर आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून सखोल तपासली जात असून, एकूण १६० जीबीपेक्षा अधिक डेटा तपास यंत्रणांच्या हाती लागला आहे.या डिजिटल पुराव्यांमधून नोव्हेंबर २०२३ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत घडलेल्या घटनांचा तपशील उघड झाला आहे. विशेषतः कॅनडा कॉर्नर परिसरातील कार्यालयातून जप्त केलेल्या माहितीमुळे अनेक बाबी स्पष्ट होत आहेत. तपास यंत्रणांनी प्रत्येक पुराव्याचे ‘ए’, ‘बी’ आणि ‘बी’ अशा कोडमध्ये वर्गीकरण केले असून, ‘ए’ गटातील माहिती अत्यंत संवेदनशील असल्याचे समोर आले आहे. याशिवाय, या प्रकरणात साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले असून न्यायालयात सादर करण्यासाठी पुरावे व्यवस्थित गोळा केले जात आहेत. डिजिटल माहिती आणि साक्षीदारांच्या जबाबांमुळे तपास अधिक मजबूत झाला आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी नवे पैल समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


दरम्यान, या प्रकरणातील तिसऱ्या गुन्ह्यात अशोक खरात यांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सुनावणीदरम्यान काही गंभीर आरोप मांडण्यात आले. एका प्रकरणात पीडितेला विशिष्ट आश्वासन देऊन फसवणूक केल्याचा आरोप वकिलांनी केला. या पार्श्वभूमीवर तपासासाठी अधिक वेळ देत न्यायालयाने पोलिस कोठडी मंजूर केली. एकूणच, डिजिटल पुरावे, फॉरेन्सिक अहवाल आणि साक्षीदारांचे जबाब यामुळे अशोक खरात प्रकरण निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे. तपास यंत्रणा आता या सर्व पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई करत असून, येत्या काळात आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

Mumbai Water Storage : मुंबईवर पाणीटंचाईचं सावट गडद: तलावांत १८.८६ टक्के साठा

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये सध्या केवळ १८.८६% पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणीटंचाईची

BMC अभियंत्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा ?

मुंबई : महानगरपालिकेच्या मध्यवर्ती अभियांत्रिकी विभागामध्ये पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा लागू असला तरीही

Nitesh Rane : दहशतवाद्यांचे अड्डे बनलेले मदरसे माझ्या रडारवर, मंत्री नितेश राणेंचा निर्वाणीचा इशारा

विजय मांडे, कर्जत : मदरसे दहशतवाद्यांचे अड्डे झाले आहेत. तिथे देशविरोधी गोष्टी शिकवल्या जातात. हे मदरसे माझ्या

Nashik TCS : टीसीएस प्रकरणी दानिश शेख यांचे बँक खाते सील

नाशिक : राज्यभर गाजत असलेल्या टीसीएस प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपी दानिश शेख याचे बँक खाते सील केले

Kharbao Business Park : खारबाव बिझनेस पार्क'चा विस्तार

ठाणे : मुंबई महानगर प्रदेशाचा संतुलित आणि आर्थिक विकास साधण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत मोठा निर्णय घेतला

MSRTC : ST BUS साठी उड्डाणपुलांखाली चार्जिंग स्टेशन उभारणार

मुंबई : राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) इलेक्ट्रिक बस अर्थात ‘लालपरी’साठी पुलांखालच्या मोकळ्या जागांचा