RBI Repo Rate : भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेट स्थिर ठेवला

एमपीसीच्या बैठकीत कोणताही बदल नाही


मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) 2026-27 आर्थिक वर्षासाठी पहिल्या मौद्रिक धोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीचे निकाल आज, 8 एप्रिलला जाहीर केले. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी जाहीर केलेल्या निकालानुसार, रेपो रेट 5.25 टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आला आहे आणि यामध्ये कोणतीही बदल करण्यात आलेली नाहीत.


आरबीआयने पॉलिसी स्टान्स न्यूट्रल ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, हे निर्णय जागतिक स्तरावरील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घेतले गेले आहेत. कर्ज घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती


जर आपण बँकेकडून फ्लोटिंग रेटवर लोन घेतले असेल, तर सध्या तुमच्या ईएमआयवर कोणताही परिणाम होणार नाही, कारण रेपो रेट 5.25 टक्क्यांवर स्थिर आहे. रेपो रेटमध्ये बदल थेट बँकांच्या कर्ज व ठेवीच्या व्याजदरांवर परिणाम करतो.


रेपो रेट कमी केल्यास बँका कर्जाचे व्याजदर कमी करतात.


रेपो रेट वाढल्यास बँका कर्जाचे व्याजदर वाढवतात.


रेपो रेट असा दर आहे, ज्यावर आरबीआय देशातील बँकांना पैसे उधार देते. त्यामुळे रेपो रेटचा थेट परिणाम सामान्य ग्राहकांवरही होतो.


मागील वर्षीचे रेपो रेटमधील बदल


फेब्रुवारी 2025: 6.50 → 6.25 टक्के


एप्रिल 2025: 6.25 → 6 टक्के


जून 2025: 6 → 5.50 टक्के


ऑगस्ट 2025: स्थिर 5.50 टक्के


ऑक्टोबर 2025: स्थिर 5.50 टक्के


डिसेंबर 2025: 5.50 → 5.25 टक्के


फेब्रुवारी 2026: स्थिर 5.25 टक्के

Comments
Add Comment

फिलीपिन्समध्ये ७.८ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप

मनिला : फिलीपिन्समध्ये सोमवारी ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा अत्यंत शक्तिशाली भूकंप झाला असून, यामध्ये किमान १५

Mamata Banerjee : तृणमूल काँग्रेसचे १४ बंडखोर खासदार भाजपच्या वाटेवर

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये सत्ता गमावल्यानंतर राष्ट्रीय पातळीवरही 'तृणमूल काँग्रेस' पक्षाला सर्वात मोठे

Adani Airport : मुख्यमंत्री कार्यालयाकडून सिडको आणि 'अदानी एअरपोर्ट' प्रशासनाला नोटीस

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांना कार्यक्रमाचे निमंत्रण न पाठवल्याने राजशिष्टाचाराचा

High Court : सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांना अवमान नोटीस

उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीत चालढकल; तात्पुरत्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा होऊनही आदेश रखडले मुंबई :

Aarey Colony : आरे वसाहतीतील झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रस्ताव अखेर रद्द

राज्य शासनाने जागा घेतली ताब्यात; ३३.६ एकर जमिनीबाबत २० वर्षांपूर्वी झाला होता निर्णय मुंबई : आरे दुग्ध

Sunil Tatkare : NDA बैठकीमुळे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात बदल; सुनील तटकरे यांची माहिती

MUMBAI : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत बुधवारी (१० जून) 'एनडीए'ची (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) महत्त्वाची बैठक