RBI Repo Rate : भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेट स्थिर ठेवला

एमपीसीच्या बैठकीत कोणताही बदल नाही


मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) 2026-27 आर्थिक वर्षासाठी पहिल्या मौद्रिक धोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीचे निकाल आज, 8 एप्रिलला जाहीर केले. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी जाहीर केलेल्या निकालानुसार, रेपो रेट 5.25 टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आला आहे आणि यामध्ये कोणतीही बदल करण्यात आलेली नाहीत.


आरबीआयने पॉलिसी स्टान्स न्यूट्रल ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, हे निर्णय जागतिक स्तरावरील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घेतले गेले आहेत. कर्ज घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती


जर आपण बँकेकडून फ्लोटिंग रेटवर लोन घेतले असेल, तर सध्या तुमच्या ईएमआयवर कोणताही परिणाम होणार नाही, कारण रेपो रेट 5.25 टक्क्यांवर स्थिर आहे. रेपो रेटमध्ये बदल थेट बँकांच्या कर्ज व ठेवीच्या व्याजदरांवर परिणाम करतो.


रेपो रेट कमी केल्यास बँका कर्जाचे व्याजदर कमी करतात.


रेपो रेट वाढल्यास बँका कर्जाचे व्याजदर वाढवतात.


रेपो रेट असा दर आहे, ज्यावर आरबीआय देशातील बँकांना पैसे उधार देते. त्यामुळे रेपो रेटचा थेट परिणाम सामान्य ग्राहकांवरही होतो.


मागील वर्षीचे रेपो रेटमधील बदल


फेब्रुवारी 2025: 6.50 → 6.25 टक्के


एप्रिल 2025: 6.25 → 6 टक्के


जून 2025: 6 → 5.50 टक्के


ऑगस्ट 2025: स्थिर 5.50 टक्के


ऑक्टोबर 2025: स्थिर 5.50 टक्के


डिसेंबर 2025: 5.50 → 5.25 टक्के


फेब्रुवारी 2026: स्थिर 5.25 टक्के

Comments
Add Comment

Anant Ambani : हिप्पोंना मारु नका, वनतारामध्ये पाठवा; अनंत अंबानी यांची कोलंबिया सरकारला विनंती

मुंबई : उद्योगपती अनंत अंबानी यांचे प्राणीप्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात

Mumbai News : मुंबईत पाण्याचा निचरा करण्यासाठी ५४७ पंपांची आणि फिरते डीवॉटरिंग पंप असणाऱ्या १० वाहनांची व्यवस्था

मुंबईत यंदा पाणी साचण्याची फक्त ८० ठिकाणे मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची

BMC News : 'मध्य वैतरणा प्रकल्प राबवताना तुमचे पर्यावरण प्रेम कुठे होते?'

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने गारगाई पाणी प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी स्थायी समिती व महापालिका

single-window clearance : लाईव्ह इव्हेंट्स परवानगीसाठी ‘एक खिडकी’ सुविधा

मुंबई : राज्यातील लाईव्ह मनोरंजन क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लाईव्ह

Godavari to Narmada : असा होणार गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचा समारोप समारंभ

मुंबई : जलव्यवस्थापन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि जनसहभागातून प्रभावी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या

Seeds Act : राज्याचा स्वतंत्र बियाणे कायदा करणार

मुंबई : शेतकऱ्यांना स्वतःचे बियाणे साठवणे, वापरणे, देवाणघेवाण करणे आणि (ब्रँडेड नाव न वापरता) विक्री करण्यास