Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होणार; १३ ऑगस्टपासून पावसाचा जोर वाढण्याचा हवामान विभागाचा अंदाज

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी आता पुन्हा एकदा वातावरणात मोठा बदल होत आहे. येत्या २४ तासांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार असून, १३ ऑगस्टपासून पावसाचा जोर प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः कोकण, मुंबई आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्याला याचा सर्वाधिक प्रभाव जाणवू शकतो.



मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने जारी केलेल्या अंदाजानुसार, ९ ते १२ ऑगस्ट दरम्यान उत्तर व दक्षिण कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळतील. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस अपेक्षित असून, घाटमाथ्यावर पावसाची तीव्रता वाढणार आहे. तसेच, मराठवाडा आणि विदर्भात विखुरलेल्या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि मेघगर्जना होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.



हवामान विभागाच्या 'इम्पॅक्ट-बेस्ड फोरकास्ट'नुसार मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचणे, स्थानिक पूरपरिस्थिती निर्माण होणे, तसेच झाडे आणि जुन्या इमारती कोसळण्याच्या घटना घडण्याची शक्यता आहे. विशेषतः घाट परिसरात भूस्खलन आणि दरडी कोसळण्याचा धोका असल्याने हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.



राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा २% जास्त पाऊस


राज्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला असून, आजपर्यंत ६३७.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे (सरासरी ६२२.७ मिमी), जो सरासरीच्या तुलनेत २ टक्के जास्त आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पावसाने उघडीप दिल्याने विदर्भ व मराठवाड्यात सरासरीपेक्षा काहीसा कमी पाऊस झाला असून, हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे.

Comments
Add Comment

Navi Mumbai News : कोपरखैरणे रेल्वे स्थानकावर तरुणीचा छळ; व्हायरल व्हिडिओनंतर 6 तासांत आरोपी पोलिसांच्या ताब्यात

नवी मुंबई : कोपरखैरणे रेल्वे स्थानकावर महिला प्रवाशांना त्रास देणाऱ्या एका तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर

World Tribal Day : वनरंग-2026मधून आदिवासी संस्कृतीचा जागर; छगन भुजबळांकडून समाजाच्या योगदानाचे कौतुक

मुंबई : जागतिक आदिवासी दिनानिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ‘आदिवासी संस्कृती उत्सव-वनरंग 2026’चे

Eknath Shinde : तिसऱ्या मुंबईवर राज ठाकरेंची टीका; एकनाथ शिंदेंनी सांगितला विकासाचा रोडमॅप

नवी दिल्ली: ‘तिसरी मुंबई’च्या विकासावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackery) यांनी केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ

Motor Act : जन विश्वास मोटार कायद्यातील बदलांमुळे १५ ऑगस्टपासून किरकोळ गुन्हे सुलभतेने मिटणार

Mumbai : मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत आणि न्यायप्रक्रियेत एक मोठा बदल घडवून आणणारा जन विश्वास (तरतुदींमधील सुधारणा)

Railway Bridge : सायन रेल्वे ओव्हर ब्रिजचे उद्घाटन सप्टेंबर अखेरपर्यंत लांबणीवर; दुसरा गर्डर ८-९ ऑगस्टच्या मध्यरात्री बसवणार

Mumbai : मुंबईच्या बहुप्रतिक्षित आणि रखडलेल्या सायन रेल्वे ओव्हर ब्रि

Worli Asphalt Plant Site : वरळीतील अस्फाल्ट प्लांटची जागा दिली भाडेतत्वावर

- महापालिकेला खड्डे बुजवण्यासाठी कोल्ड मिक्सची करावी लागली खरेदी - यंदा तब्बल अडीच कोटींचे खरेदी केले