महसुलात मोठी वाढ; सुरक्षित प्रवासाला पालकांची पसंती
मुंबई : महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यातील ‘लाल परी’ने शालेय सहलींच्या माध्यमातून यंदा यशाचे नवे शिखर गाठले आहे. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात एसटीने २५ हजार ५५८ बस फेऱ्यांच्या माध्यमातून तब्बल १२७ कोटी १८ लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळविले असून, मागील वर्षाच्या तुलनेत महसुलात ३३ कोटी २९ लाखांची मोठी वाढ झाली आहे. सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासासाठी आजही ‘एसटी’च विद्यार्थ्यांची पहिली पसंती असल्याचे यातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
शाळा आणि महाविद्यालयांनी एसटीच्या माध्यमातून सहलींचे आयोजन केल्यास विद्यार्थ्यांना प्रवासी भाड्यात शासनाकडून ५० टक्के सवलत दिली जाते. यामुळेच विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्थांना एसटीचा आधार मोठा वाटतो. खासगी ट्रॅव्हल्सच्या तुलनेत माफक दर आणि विश्वासार्हता ही एसटीची बलस्थाने ठरली आहेत.
नव्या बसेसमुळे प्रवास झाला सुखकर
शालेय सहलींसाठी एसटीने नेहमीच पुढाकार घेतला आहे. आगामी काळातही शाळा-महाविद्यालयांनी खासगी बसेसच्या मागे न लागता एसटीच्या सुरक्षित प्रवासालाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन मी करतो.