Mumbai Local News Update : पश्चिम रेल्वेवर धावणार १५ डब्याच्या लोकल ; वांद्रे स्थानकावरून....

मुंबई : मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि त्यानुसार वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता उपनगरी रेल्वे व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण होत आहे. विशेषतः ऑफिसच्या वेळेत लोकल गाड्यांमध्ये होणारी प्रचंड गर्दी ही प्रवाशांसाठी मोठी समस्या बनली आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून १५ डब्यांच्या लोकल गाड्यांचा विस्तार करण्याची तयारी सुरू आहे.



गर्दी कमी करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल


सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर अंधेरी ते विरार या दरम्यान काही प्रमाणात १५ डब्यांच्या लोकल गाड्या धावत आहेत. या गाड्यांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, शिवाय या सेवेचा आणखी विस्तार व्हावा अशी मागणी नागरिक करत आहेत. विशेषतः वांद्रेपर्यंत या गाड्यांचा विस्तार केल्यास मुंबईच्या उपनगरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.



पायाभूत कामांना वेग


१५ डब्यांच्या लोकल गाड्या चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांवर सध्या युद्धपातळीवर काम सुरू आहे. वांद्रे, खार रोड, सांताक्रूझ आणि विलेपार्ले या स्थानकांवर फलाटांचा विस्तार केला जात आहे. याशिवाय रुळांमध्ये सुधारणा, ओव्हरहेड वायरचे काम आणि सिग्नल प्रणाली अद्ययावत करण्याचे कामही सुरू आहे. ही सर्व कामे पूर्ण झाल्यानंतरच १५ डब्यांच्या लोकल गाड्या या मार्गावर नियमितपणे धावू शकतील.



डिसेंबर २०२६पर्यंत काम होईल पूर्ण


रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हे सर्व काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानंतर वांद्रे स्थानकावरून १५ डब्यांच्या लोकल फेऱ्या सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल. यामुळे प्रवाशांची गर्दी विभागण्यास मदत होईल



प्रवाशांना दिलासा मिळणार


या प्रकल्पामुळे दररोज प्रवास करणाऱ्या लाखो मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. गर्दीच्या वेळेत होणारी चेंगराचेंगरी आणि असुविधा कमी होऊन प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी प्रवास मुंबईकरांना करता येणार आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : २०३० पर्यंत राज्यात ३०० किमी नवे मेट्रो मार्ग सुरू होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; प्रत्येक प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन मुंबई : "राज्यातील मुंबई, पुणे

Central Railway New Rules : रेल्वेच्या नव्या नियमांनुसार विनातिकीट प्रवास, आरक्षित डब्यात घुसखोरी केल्यास आता भरावा लागणार हजारोंचा दंड; जाणून घ्या नवीन नियमांबद्दल

मुंबई : रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि प्रवाशांसाठी सुलभ करण्याच्या उद्देशाने रेल्वे कायदा, १९८९

Nitesh Rane : पाणी साठवण प्रकल्पाला खोपोली मत्स्यबीज केंद्राची जागा देणार, मत्स्य उत्पादनावर परिणाम होणार नाही; मंत्री नितेश राणे

सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून तोडगा

Nitesh Rane : मत्स्य महाविद्यालयाचा तात्काळ प्रस्ताव सादर करा, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

रामेश्वर-देवगड येथे आंबा संशोधन उपकेंद्रांतर्गत कीटकनाशक अवशेष तपासणी प्रयोगशाळा स्थापन करण्याचा प्रस्तावही

Uorfi Javed : १ रुपया तरी घेतलाय हे सिद्ध करा, अकाऊंट डीॲक्टिव्हेट करेन! सीजेपीला पाठिंबा दिल्याच्या आरोपांवर उर्फी जावेद भडकली

मुंबई : आपल्या अतरंगी फॅशन आणि रोखठोक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर उर्फी जावेद

Devendra Fadnavis : राज्यातील नद्यांचे पुनरुज्जीवन होणार

- मुख्यमंत्र्यांचा निर्णय; पहिल्या टप्प्यात ४ हजार कोटींचा निधी उभारणार मुंबई : राज्यातील वाढती पाणीटंचाई दूर