मुंबई (विशेष प्रतिनिधी)
स्थायी समितीने फेरविचारासाठी पाठवून दिलेला गारगाई पाणी प्रकल्पाला अखेर स्थायी समितीने मंजुरी दिली. या प्रकल्प कामांसाठी आकारला गेलेला जास्त दर आणि पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने स्थायी समितीने अंदाजित दरातच हे काम करण्याची मागणी करत हा प्रस्ताव फेटाळला होता. पण त्यानंतर प्रशासनाने तब्बल ७ टक्के दर कमी करत तसेच सुमारे २६९ कोटी रुपयांची सूट कंत्राटदाराकडून मिळवून घेतली. त्यामुळे महापालिकेची तब्बल कोट्यवधी रुपये वाचवण्यात आले. त्यामुळे स्थायी समितीमध्ये अखेर याप्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे एकप्रकारे महापालिकेत भाजपची आत्ता आल्यानंतर उधळपट्टीला लगाम करत तिजोरीतील होणाऱ्या खर्चाची बचत केली.
यावेळी झालेल्या चर्चेत भाजपचे प्रकाश दरेकर यांनी कंत्राट दर कमी करण्यात यश आल्याने स्थायी समिती अध्यक्षांचे अभिनंदन केले. आपल्या यापूर्वीच्या निर्णयामुळे महापालिकेचे सुमारे २७०कोटी रुपयांची बचत झाली असल्याचे सांगत सर्वांचे धन्यवाद मानले. तर मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी भविष्यात या कंपनीला कोणत्याही प्रकारचा फेरफार करता येणार नाही आणि वाढीव खर्चाचा प्रस्ताव सादर केला जावू अशी उपसूचना मांडली
याला सभागृहनेते गणेश खणकर यांनी चोख उत्तर देत हा प्रस्ताव जेव्हा मंजुरीला आला होता, तेव्हा जास्त दराने होत्या म्हणून आम्ही तो परत पाठवून लावला.त्यानंतर प्रशासनाने याचे सादरीकरण केल्यानंतर आणि त्यांनी ७ टक्के दर कमी केल्यानंतर कुठेही हा प्रकल्प होणे आवश्यक आहे. त्यामुळे अखेर मनसेचे किल्लेदार आणि उबाठाचे यशोधर फणसे यांची उपसूचना बहुमताच्या जोरावर फेटाळून लावत स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी याला मंजुरी दिली. त्यामुळे मुंबईकरांना ४४० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होण्याच्या दृष्टीकोनातून मार्ग मोकळा झाला आहे.