भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव संपन्न; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रमुख उपस्थिती

मुंबई: भगवान महावीरांनी शांतीचा आणि सेवाभावाचा मार्ग दाखविला. सेवाकार्यात नेहमीच अग्रेसर राहून जैन समाजाने आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. बोरीवली पश्चिम येथील कोरा केंद्र मैदान येथे सकल जैन समाज यांच्या वतीने भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, महापौर रितू तावडे, आमदार पराग शहा, अमित साटम, संजय उपाध्याय, गुरुदेव नम्र मुनी तसेच मान्यवर उपस्थित होते.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशाच्या प्रगतीत जैन समाजाचे योगदान मोलाचे आहे. गोसेवा आणि सेवाकार्यातही जैन समाज अग्रेसर आहे. भगवान महावीर यांनी दाखवलेला मार्ग मानवतेच्या कल्याणाचा असून या विचारांतूनच विश्व कल्याण साधले जाऊ शकते.
तीर्थंकरांचे विचार सर्वांना सोबत घेवून जाणारे आहेत. समाजाच्या वतीने साकारण्यात येणारी प्राणी रुग्णालयाची संकल्पना भूतदया अधोरेखित करणारी आहे. वारकरी परंपरेशी घट्ट नाळ जोडलेल्या मुंबईतील डबेवाले यांना ई-बाईक्स वितरणाचा उपक्रमही अतिशय स्तुत्य असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, भगवान महावीर यांनी अहिंसेचा संदेश दिला. अखिल मानवतेसाठी त्यांनी मार्ग दाखविला. या मार्गाचे अनुसरण सर्वांनी करण्याची गरज असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.


कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, जैन समाज हा भारतीय समाज-संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे श्री लोढा यांनी सांगितले.


महापौर रितू तावडे म्हणाल्या, भगवान महावीर यांचा शांतीचा संदेश आजच्या परिस्थितीत अत्यंत महत्त्वाचा आहे.


यावेळी मान्यवरांच्या हस्ते अरहम प्राणी रुग्णालयाच्या संकल्पनेचे उद्घाटन तसेच मुंबईतील डबेवाले यांना १०८ ई बाईक्सचे वितरण करण्यात आले. दिव्यांगांना ५० ई ट्रायसिकलचे वितरणही यावेळी करण्यात आले.

Comments
Add Comment

Sindhu Mahakumbh : सिंधू महाकुंभाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या संदेशाचा महाराष्ट्रात गौरव; राज्यपालांच्या हस्ते इंद्रेश कुमार आणि पाल्गा रिंपोचे यांचा सन्मान

मुंबई : लडाख येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सिंधू महाकुंभ (Sindhu Mahakumbh) उपक्रमाने राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक

Analog Paneer : पनीरच्या ३२ टक्के नमुन्यांमध्ये भेसळ, 'ॲनालॉग पनीर'मध्ये वनस्पती चरबीचा वापर

मुंबई : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बाजारपेठेतून घेतलेल्या पनीरच्या नमुन्यांपैकी तब्बल ३२ टक्के नमुने

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी घेतला करंजा मत्स्य बंदर प्रकल्पाचा आढावा

- ४ हजार ५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता; अत्याधुनिक यंत्रणेसह अनुभवी मनुष्यबळाचा वापर

Central Railway New Rule : 'धूम्रपान ते फेरीवाले…' रेल्वेत गैरप्रकार करणाऱ्यांची खैर नाही; रेल्वे कायद्यात झाले 'हे' मोठे बदल

मुंबई : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! रेल्वे कायदा, १९८९ मधील अनेक तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आल्या

Maharashtra Rojgar Melava 2026 : महाराष्ट्रातील तरुणांसाठी मोठी संधी! राज्यात होणार १ हजार रोजगार मेळावे; मंत्री मंगलप्रभात लोढांचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई : राज्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व

Nitesh Rane : रत्नागिरीला मिळणार जागतिक ओळख! भगवती बंदरात अत्याधुनिक क्रुझ टर्मिनलला गती; पर्यटन, रोजगाराला मोठी चालना

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील भगवती बंदर (Bhagwati Port) येथे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक क्रुझ टर्मिनल (cruise terminal)