पुढील सहा महिन्यांत 'एफआयआर'पासून 'चार्जशीटपर्यंत'ची सर्व प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल

गडचिरोलीतील 'सी-६०' जवानांना विशेष पदक जाहीर


मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलाला तंत्रज्ञानाने अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने आता कंबर कसली आहे. गुन्हेगारी तपासात पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी 'कृत्रिम बुद्धिमत्ता' (एआय) आणि 'ब्लॉकचेन' तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून, पुढील सहा महिन्यांत एफआयआरपासून ते दोषारोपपत्रापर्यंतची (चार्जशीट) सर्व प्रक्रिया पूर्णपणे 'डिजिटाइज' करण्याचे आदेश दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली.


मुंबईतील पोलीस महासंचालक कार्यालयात सोमवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची अर्धवार्षिक परिषद पार पडली. या परिषदेला संबोधित केल्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाचा कृती आराखडा मांडला. केंद्र सरकारने राज्यांच्या तांत्रिक प्रगतीसाठी दिलेल्या १०६ मुद्द्यांच्या पालनात महाराष्ट्र अग्रस्थानी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. "आता आपण पुराव्यांच्या व्यवस्थापनासाठी 'ब्लॉकचेन' तंत्रज्ञानाचा वापर करणार आहोत. यामुळे डिजिटल पुराव्यांची सुरक्षितता वाढेल आणि त्यात कोणताही बदल करणे कोणालाही शक्य होणार नाही. ही यंत्रणा येत्या सहा महिन्यांत सर्व पोलीस ठाण्यांमध्ये कार्यान्वित करण्याच्या सूचना पोलीस महासंचालकांना देण्यात आल्या आहेत," असे त्यांनी सांगितले.


राज्यातील गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण (कॉन्व्हिक्शन रेट) सध्या ५० टक्क्यांच्या आसपास आहे, ते ९५ टक्क्यांपर्यंत नेण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. यासाठी गेल्या ४ ते ५ वर्षांतील प्रकरणांचे 'एआय'च्या माध्यमातून विश्लेषण करण्याचे काम गुन्हे अन्वेषण विभागाला (सीआयडी) सोपवण्यात आले आहे. विशेषतः सत्र न्यायालयांमधील निकालांमध्ये सुधारणा करण्यासाठी विशेष रणनीती आखली जात असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.


२४४ पोलिसांनी दिले बलिदान : "गडचिरोलीत माओवादाचा बीमोड करताना आमच्या २४४ पोलिसांनी बलिदान दिले आहे. त्यांच्या शौर्याची दखल घेत, ज्या जवानांनी 'सी-६०' दलात किमान ३ वर्षे सेवा बजावली आहे, त्या सर्वांना 'सी-६० पदक' देऊन सन्मानित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे," असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


अंमली पदार्थांविरोधात मोहीम : राज्यातील तरुण पिढीला व्यसनाधीनतेपासून वाचवण्यासाठी 'ड्रग्ज फ्री कॅम्पस' ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. अंमली पदार्थांच्या तस्करी आणि विक्रीविरुद्ध राज्यात लवकरच एक मोठी मोहीम उघडली जाईल. पोलीस महासंचालक यासंदर्भातील सविस्तर रणनीती लवकरच सादर करणार आहेत, असे फडणवीस म्हणाले.


अपघात रोखण्यासाठी 'नागपूर मॉडेल' : रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी नागपूरमध्ये राबवण्यात आलेल्या प्रायोगिक मॉडेलमुळे तेथील अपघातांत ३० टक्क्यांनी घट झाली आहे. हेच यशस्वी 'नागपूर मॉडेल' आणि मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील प्रयोगांच्या धर्तीवर संपूर्ण राज्यात अपघात रोखण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Lashkar-e-Taiba : पाकिस्तानात दहशतवाद्यांचा एकामागोमाग एक खात्मा! लष्कर-ए-तैबाच्या टॉप कमांडरची गोळ्या झाडून हत्या

पाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटनांवर पुन्हा एकदा अज्ञात हल्लेखोरांनी निशाणा साधला आहे. शेख युसूफ आफ्रिदी (Sheikh Yousuf

West Bengal Election 2026 : विक्रमी मतदानामुळे ममता बॅनर्जींचे सरकार संपुष्टात येईल - अमित शाह

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जिल्ह्यातील राणाघाट येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

IPL 2026 GT vs CSK : गुजरातकडून चेन्नईचा घरच्याच मैदानावर लाजिरवाणा पराभव!

आयपीएल २०२६ च्या ३७ व्या सामन्यात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. गुजरातने चेन्नईला त्यांच्या घरच्या मैदानावर,

अमेरिकेच्या येल विद्यापिठाचा विद्यार्थी करणार मुंबई बंदर, माथाडी कामगार, शहराचा विकासावर पीएचडी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) अमेरिकेच्या येल विद्यापिठाच्या इतिहास विभागातील विद्यार्थी हा , विसाव्या शतकातील

Malad BMC School : मालाड पश्चिममधील अतिधोकादायक नेमाणी शाळेत शिकतात महापालिकेची मुले

- भाजप नगरसेविकेने शिक्षण समितीच्या बैठकीत शाळा बंद करण्याची केली मागणी - पर्यायी शाळा लिबर्टी गार्डन शाळेत सुरु

BMC News : महापालिकेच्या स्टॉल्सचा परवाना अविवाहित व्यक्तीच्या मृत्यूनंतर आई, वडिलांच्या नावे होणार

- भाऊ आणि बहिणीच्या नावे करण्यास प्रशासनाने दर्शवला ठाम नकार मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेचे स्टॉल्स