सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला मिळणार 'टेक ऑफ'

मुंबई-सिंधुदुर्ग विमान प्रवासासाठी १०० टक्के 'व्हिजिएफ' मंजूर; फ्लाय ९१ कंपनीची निवड, प्रति आसन २ हजार ९९१ रुपये दर निश्चित


मुंबई : कोकणच्या विकासाचा कणा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी महायुती सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सुखद निर्णय घेतला आहे. चिपी (सिंधुदुर्ग) ते मुंबई या विमान प्रवासासाठी राज्य सरकारने १०० टक्के 'व्हायबिलिटी गॅप फंडिंग'ला (व्हिजिएफ) प्रशासकीय आणि वित्तीय मंजुरी दिली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे आता सर्वसामान्य कोकणवासीयालाही परवडणाऱ्या दरात विमान प्रवास करणे शक्य होणार असून, खऱ्या अर्थाने कोकणच्या पर्यटनाला 'टेक ऑफ' मिळणार आहे.

केंद्र सरकारच्या 'आरसीएस-उडान' योजनेच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला असून, यापूर्वी सोलापूर-पुणे-मुंबई मार्गासाठीही अशाच प्रकारे १०० टक्के निधी देण्यास मान्यता देण्यात आली होती. तोच नियम मुंबई-सिंधुदुर्ग प्रवासासाठी लागू करण्यात आला आहे. त्यानुसार, ही योजना प्रत्यक्ष विमानसेवा सुरू झाल्यापासून एक वर्षासाठी किंवा केंद्र सरकारच्या योजनेत समावेश होईपर्यंत लागू राहील. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने प्रत्यक्ष विमान फेऱ्यांची गणना करूनच निधीची देयके सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कोकणच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे. केवळ एका तासात मुंबई-सिंधुदुर्ग अंतर पार होणार असून, याचा मोठा फायदा चाकरमानी आणि व्यावसायिकांना होणार आहे. त्यामुळे चिपी विमानतळ आता खऱ्या अर्थाने गजबजलेले पाहायला मिळेल.

प्रति आसन २ हजार ९९१ रुपये दर


या विमानसेवेसाठी 'मेसर्स जस्ट उडो एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड' (फ्लाय ९१) या कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कंपनीला प्रति 'आरसीएस' आसनासाठी २ हजार ९९१ रुपये या दराने निधी दिला जाणार आहे. १७ मार्च २०२६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकल्पासाठी ७ कोटी ६४ लाख २० हजार ५० रुपयांच्या वार्षिक खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. ३० मार्च रोजी सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय निर्गमित केला.

पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून स्वागत

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी या निर्णयाचे मनापासून स्वागत केले आहे. सिंधुदुर्गच्या अर्थव्यवस्थेला आणि पर्यटनाला गती देणारा हा क्रांतिकारी निर्णय आहे. यामुळे मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा आता आठवड्याचे सातही दिवस सुरू राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
Comments
Add Comment

Ahilyanagar : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान ; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, राजकीय वातावरण तापले

अहिल्यानगर (राहुरी प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ahilyanagar District Central Cooperative Bank) होवू घातलेल्या

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ketan Agrawal Murder Case : 'मला त्याला स्लो पॉयझन देऊन मारायचं होतं..';केतन हत्याकांड प्रकरणातील 'त्या' गुप्त कटामागचा मास्टरमाइंड कोण?

केतन अग्रवाल हत्याकांडात धक्कादायक दावा; 'स्लो पॉयझन' देण्याचाही कट असल्याची तपासात चर्चा पुणे : केतन

Minister Radhakrishna Vikhe Patil : मतदार यादीत घुसखोरांना जागा नाही ; पुनरिक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी पुढे या : ना. राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar (Shevgaon) : मतदार यादीची सखोल पुनरिक्षण मोहीम भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.सरकारी स्तरावर काम सुरू असले

Wardha Murder : वर्ध्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना! 12 वर्षांच्या मुलीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; नराधमांनी ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा

वर्धा : वर्धा  (wardha) जिल्ह्यातील रोठा गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली

Pune Metro : पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला नवा मुहूर्त; वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका!

पुणे : पुण्यातील ट्रॅफिक जॅम, विशेषतः हिंजवडी आयटी पार्क परिसरात होणाऱ्या रोजच्या वाहतूक कोंडीने त्रस्त