Marathwada Weather : मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता; नागरिकांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा (Marathwada) विभागात पुढील दोन दिवस हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने वादळी पाऊस, विजांच्या कडकडाटासह गारपिटीचा अंदाज व्यक्त केला असून, नागरिकांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.


अंदाजानुसार, या भागात वाऱ्यांचा वेग वाढून अचानक पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीटही होऊ शकते. त्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे. उर्वरित राज्यात वातावरण ढगाळ राहून वादळी पावसाची शक्यता असल्याने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.


हवामान तज्ज्ञांच्या मते, सध्याच्या बदलामागे दक्षिण कर्नाटक भागात समुद्रसपाटीपासून सुमारे ५.८ किलोमीटर उंचीवर तयार झालेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती कारणीभूत आहे. तसेच उत्तर ओडिशापासून दक्षिण तमिळनाडूपर्यंत वाऱ्यांच्या प्रवाहात खंड पडल्यामुळे कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. यामुळे वातावरण अस्थिर झाले असून पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे.


दरम्यान, शहरातील तापमानातही चढ-उतार दिसून येत आहेत, ज्यामुळे वातावरण अधिक दमट आणि अस्थिर झाले आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, वादळी वाऱ्यांच्या वेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा असे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

Ashok Kharat Case : भोंदू बाबाचा मोठा पर्दाफाश! खरातचा सीएही रडारवर, १५०० कोटींच्या मालमत्तेचा होणार तपास

मुंबई : स्वतःला ज्योतिषी म्हणवत भविष्य सांगण्याच्या नावाखाली महिलांना जाळ्यात ओढून त्यांच्यावर लैंगिक

Car Accident : काँग्रेस खासदाराच्या गाडीला अपघात, खासदार जखमी

भंडारा : राज्याच्या राजकीय वर्तुळाला सोमवारी (३० मार्च २०२६) सकाळीच अपघाताची धक्कादायक बातमी कळली आहे. काँग्रेस

Tuljabhavani Temple : चैत्र पौर्णिमा महोत्सवानिमित्त २२ तास खुलं राहणार तुळजाभवानीचं दर्शन

तुळजापूर : तुळजाभवानी देवीच्या मंदिरात यंदा विशेष दर्शन व्यवस्था करण्यात आली असून चैत्र पौर्णिमा

21 प्रवर्गातील दिव्यांगांना शासन योजनांचा लाभ

सचिव तुकाराम मुंढे मुंबई : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 अंतर्गत निर्धारित करण्यात आलेल्या सर्व 21

नाशिकमध्ये तथागत आंबेडकरी विचारक संघाच्या वतीने अधिवेशन पार पडले; अॅड. संदीप जाधव यांच्या “बोधगया : सत्य आणि विपर्यास” पुस्तकाचे अनावरण

नाशिक : नाशिक येथे तथागत आंबेडकरी विचारक संघाच्या वतीने आयोजित भव्य अधिवेशनात अॅड. संदीप जाधव लिखित “बोधगया :

 रामनवमी भंडाऱ्यासाठी मंत्री लोढा यांच्याकडून मंडळांना गॅसची मद

गिरगावच्या ओम श्री सदगुरू साईनाथ मंडळाकडून मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आभार धार्मिक कार्यात सहकार्याची