रामनवमी भंडाऱ्यासाठी मंत्री लोढा यांच्याकडून मंडळांना गॅसची मद

गिरगावच्या ओम श्री सदगुरू साईनाथ मंडळाकडून मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आभार


धार्मिक कार्यात सहकार्याची आवश्यकता असल्यास संपर्क करा, मंत्री लोढा यांचे कार्यकर्त्यांना आवाहन


मुंबई : गिरगाव येथील ओम श्री सदगुरू साईनाथ रामनवमी पदयात्रा मंडळाच्या वतीने आयोजित भंडाऱ्यासाठी आवश्यक असलेल्या गॅसची व्यवस्था करून दिल्याबद्दल राज्याचे कॅबिनेट मंगलप्रभात लोढा यांचे मंडळातर्फे आभार व्यक्त करण्यात आले. रामनवमी निमित्त मंडळाच्या वतीने दरवर्षी पदयात्रा आणि भंडाऱ्याचे आयोजन करण्यात येते. यंदाही मोठ्या संख्येने भाविक सहभागी होणार असल्याने भंडाऱ्याची व्यापक तयारी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर गॅसची आवश्यकता भासल्याने मंडळाने मंत्री लोढा यांच्याकडे विनंती केली होती असे मंडळच्या उत्सव समितीचे पालखी प्रमुख राजू बोडके यांनी सांगितले.


इराण आणि अमेरिकादरम्यान सुरू असलेल्या युद्धामुळे सध्या राज्यात इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर भंडारा कार्यक्रम होणार की नाही, अशा चिंतेत कार्यकर्ते होते. मात्र मंत्री लोढा यांनी तात्काळ दखल घेत संबंधित यंत्रणेला निर्देश देत गॅसची व्यवस्था करून दिली. त्यामुळे भंडाऱ्याचे नियोजन सुरळीत पार पडण्यास मदत झाली असल्याचे बोडके यांनी सांगितले.


यासंदर्भात मंत्री लोढा यांना विचारले असता ते म्हणाले की, आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरात नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जात असल्याचे म्हटले आहे. कुठेही इंधन पुरवठ्यात बाधा येणार नाही. तसेच आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यात आवश्यक तेवढा गॅसचा साठा उपलब्ध आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये असे जनतेला आवाहन केले आहे. धार्मिक कार्यात मला माझ्या मलबार हिल मतदार संघात सहकार्य करता आले, याचा मला अत्याधिक आनंद असल्याचेही लोढा यांनी सांगितले. त्याचबरोबर कोणत्याही धार्मिक कार्यात सहकार्याची गरज असल्यास निःसंकोचपणे माझ्या मलबार हिल विधानसभेतील कार्यकर्त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन मंत्री लोढा यांनी केले आहे. काही लोक केवळ या स्थितीत राजकारण करू पाहत आहेत. स्थानिक आमदार आणि मंत्री या नात्याने समरसता जपत मी धार्मिक कार्यात सहकार्य करत असल्याचे ही मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र