Tuljabhavani Temple : चैत्र पौर्णिमा महोत्सवानिमित्त २२ तास खुलं राहणार तुळजाभवानीचं दर्शन

तुळजापूर : तुळजाभवानी देवीच्या मंदिरात यंदा विशेष दर्शन व्यवस्था करण्यात आली असून चैत्र पौर्णिमा महोत्सवानिमित्त तुळजापूर येथील भाविकांची मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महोत्सव काळात मंदिर २२ तास खुलं ठेवण्यात येणार आहे. तसेच भाविकांना सुरळीत व सुलभ दर्शन मिळावं याकरीता उद्यापासून मंदिरात प्रवेशासाठी भक्तांना बीडकर पायऱ्या मार्गाचा वापर करता येणार आहे.


श्री तुळजाभवानी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्र पौर्णिमा महोत्सव ३० मार्च २०२६ ते ३ एप्रिल २०२६ या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानल्या जाणाऱ्या आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी यावेळी देशभरातून लाखो भाविक तुळजापूरमध्ये दाखल होत असतात.


यंदा सलग सुट्ट्या असल्यानं भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्यामुळे मंदिर संस्थानकडून विशेष नियोजन करण्यात आलं असनू ३१ मार्च रोजी मध्यरात्री १ वाजल्यापासून ते ५ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेपर्यंत सर्व भाविकांना बीडकर पायऱ्यांमार्फत मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे.


या महोत्सवानिमित्त काही महत्त्वाचे बदल करण्यात आले असनू याकाळात व्हीआयपी दर्शन आणि रेफरल दर्शन पास पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच ३१ मार्च ते २ एप्रिल दरम्यान ५०० रुपयांचा स्पेशल देणगी दर्शन पासही बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर संस्थाननं घेतला आहे. दरम्यान २०० रुपयांचं सशुल्क देणगी दर्शन पासधारक, अभिषेक पासधारक तसेच धर्म दर्शन आणि मुख दर्शन घेणाऱ्या सर्व भाविकांना बीडकर पायऱ्या मार्गेच दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे.

चैत्र पौर्णिमा महोत्सव भक्तांसाठी अत्यंत श्रद्धेचा आणि उत्साहाचा सोहळा मानला जातो. त्यामुळे या उत्सवा दरम्यान भाविकांना तूळजाभवानी देवीचं योग्य दर्शन घेता यावं याकरिता विशेष दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Bhimashankar Temple : भाविकांसाठी आनंदाची बातमी! 5 महिन्यांनंतर भीमाशंकर मंदिर 15 जूनपासून खुले; गर्दी नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था

पुणे: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर मंदिर (Bhimashankar Temple) हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र तब्बल पाच ते सहा

Wari 2026: लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी प्रशासन सज्ज, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतला आढावा

मुंबई दि. १३ जून : पंढरपूरच्या (Pandharpur) दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि त्यांना

Kolhapur Ambabai Temple : अंबाबाई मंदिराला सुवर्णवैभव! अधिक मासात भाविकाकडून १.५ किलो सोन्याचा कळस दान

कोल्हापूर : कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराला (Kolhapur Ambabai Temple) नव्या सुवर्णवैभवाची भर पडली आहे.

Mumbai-Goa Highway : प्रवाशांसाठी गुड न्यूज! मुंबई-गोवा महामार्गावर मोठा दिलासा! संगमेश्वर, पाली आणि लांजा येथील ३ महत्त्वाचे पूल लवकरच सुरू

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून

Pune IT Engineer Sucide : हिंजवडीत धक्कादायक घटना! TCS मधील मानसिक छळाला कंटाळून IT अभियंत्याने संपवलं आयुष्य

पुणे : पुण्यातील आयटी हब (IT Hub) असलेल्या हिंजवडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कामाच्या ठिकाणी होत

Ashadhi Wari 2026 : आषाढी वारीत वारकऱ्यांसाठी मोठी तयारी! पालखी मार्गावर स्वच्छता, सुरक्षा, आरोग्य सुविधा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुणे : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आणि पालखी सोहळा (Palkhi Sohala) २०२६ च्या पार्श्वभूमीवर पुण्यात महत्त्वाची नियोजन बैठक पार