मुंबईच्या डब्बेवाल्यांची पाच दिवसांची सुट्टी, मुंबईकरांना करावी लागणार डब्याची सोय

मुंबई : मुंबई लाईफलाईन म्हटली की दोन गोष्टी नजरेसमोर येतात एक म्हणजे मुंबईची लोकल ट्रेन आणि दुसरी म्हणजे मुंबईचे डब्बेवाले. १३० वर्षांपासून संपूर्ण मुंबईकरांना सकाळी, दुपारी वेळेत डब्बा पोहोचवण्याचं काम हे मुंबईचे डब्बेवाले गेली अनेक वर्ष करत आले आहेत.



मुंबईचे डब्बेवाले जाणार सुट्टीवर


परंतु मुंबईचे डब्बेवाले आता सुट्टीवर जाणार अशी माहिती समोर आली आहे, हिंदू कालगणनेनुसार पहिल्या चैत्र महिन्यात अनेक सण उत्सव असतात, अनेक जण आपल्या गावी आपल्या देवाच्या जत्रेसाठी जात असतात. त्यामुळेच मुंबईचे डब्बेवालेही आजपासून म्हणजे ३० मार्चपासून ४ दिवस सुट्टीवर जाणार आहेत. म्हणजे डब्बेवाले ३० मार्च २०२६ ते ४ एप्रिल २०२६ पर्यंत सेवा देऊ शकणार नाही.



ग्रामदेवतेच्या उत्सवासाठी सुट्टी


दरवर्षी चैत्र महिन्यात डबेवाले आपल्या मूळ गावी होणाऱ्या ग्रामदेवतेच्या वार्षिक उत्सवांना आणि जाताना उपस्थित राहण्यासाठी सहा दिवसांची सुट्टी घेतात. ही त्यांची पारंपरिक वार्षिक सुट्टी असल्याचे नमूद करत, डबेवाले असोसिएशनने सर्व ग्राहक आणि मुंबईकरांना या रजेच्या काळात डबेवाल्यांचे मानधन न कापण्याचे आवाहन केले आहे.



५००० डब्बेवाल्यांची मुंबईकरांना सेवा


मुंबईत सुमारे ५,००० डबेवाले हे सध्या हे कार्यरत आहेत. डब्बेवाल्यांनी घेतलेल्या या सहा दिवसाच्या सुट्टीमुळे मुंबईकरांना दुपारच्या जेवणाचे थोडे हाल सोसावे लागणार तर आहेच. हा परिणाम जवळपास मुंबईतील सुमारे ८०,००० ते २ लाख नोकरदार वर्गावर होणार आहे. तोपर्यंत लोकांना स्वतःला डब्बे आणावे लागणार आहेत.

Comments
Add Comment

Chief Minister Devendra Fadnavis : नागपूर मेट्रो टप्पा-२ विस्तारास व सागरी सेतू-वांद्रे किल्ला कनेक्टरला मान्यता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समिती बैठक नागपूर व मुंबईतील दोन

Chandrashekhar Bawankule : शहीद जवानांच्या वारसांना शेतजमीन हस्तांतरणासाठी मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील वीर जवान आणि अधिकारी

Minister Uday Samant : सिडको परिसरातील जलप्रदूषणाची होणार सखोल चौकशी; विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन

एमपीसीबीमार्फत सर्व तलावांचे नव्याने सर्वेक्षण करण्याचे मंत्री उदय सामंत यांचे विधान परिषदेत निर्देश मुंबई :

Devendra Fadnavis : संजय दीना पाटलांना योग्य समज द्या;

मुंबई : ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना धमकी दिल्याचा आणि

Mangal Prabhat Lodha : कौशल्य आधारित सात हजार कोटींचे प्रकल्प आणि IES कौशल्य विद्यापीठाला मंजुरी

- १०८ वर्षांचा वारसा असलेल्या आय.ई.एस. (IES) संस्थेला मुंबईत खाजगी कौशल्य विद्यापीठ सुरू करण्यास मंजुरी. - राज्यातील

Maharashtra Government : ७.६९% महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२६ ची परतफेड

मुंबई: महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ७.६९ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२६ अदत्त