बिकट परिस्थिती, घरची जबाबदारी, अन पोलीस भरतीच स्वप्न; नेमकं भरतीवेळी शरीर थकलं अन्...

पुणे : अनेक होतकरू तरुण सरकारी नोकरीचा पाठलाग करत असतात. नोकरी मिळवून कुटुंबाला गरीबीतून बाहेर काढण्याचं स्वप्न बघत असतात. असंच एक स्वप्न राज्यातल्या बुलढाणा जिल्ह्यातील तरुणानं बघितलं. पुरुषोत्तम भीमराव बुरकूल असं याचं नाव. (वय २३ वर्ष) हा तरुण पोलीस भरतीसाठी पुण्यात आला. कसून तयारी केली. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं.



नेमकं काय घडलं?


बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव तालुक्यातील चिंचोली बुरकूल या गावातला पुरुषोत्तम भीमराव बुरकूल ( वय २३ ) पोलीस भरतीसाठी पुण्यात आला. पुण्यात पोलीस भरती प्रक्रिया नियमानुसार सुरू होती. पुरुषोत्तम या भरती प्रक्रियेत सहभागी झाला.


पोलीस भरतीसाठी २८ मार्चला शारीरिक चाचणी घेण्यात आली. अनेक तरुण तरुणी आपली स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीत होते. आणि शेवटी भरती प्रक्रियेचा अत्यंत महत्वाचा टप्पा सुरू झाला. तो म्हणजे १६०० मीटर धावण्याचा, या प्रक्रियेत पुरुषोत्तम ही सहभागी झाला.


पुरुषोत्तमने सुरुवातीच्या दोन फेऱ्या अत्यंत जिद्दीने पूर्ण केल्या, मात्र तिसरी फेरी धावताना त्याच्या शरीराने साथ दिली नाही. त्याचा श्वास फुलला आणि धावत असताना त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. तो धाडकन जमिनीवर कोसळला. उपस्थित पोलीस अधिकारी आणि वैद्यकीय पथकाने त्याला तात्काळ प्रथोमपचार देऊन ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली.



कुटुंबाचा आधार हरपला


पुरुषोत्तम हा अत्यंत गरीब घरातून सरकारी नोकरीच्या आशेने पुण्याला आला होता. त्याचे वडील अनेक वर्षांपासून पॅरालिसीस या आजाराने अंथरुणाला खिळलेले होते. घरात आई आणि दोन बहिणी होत्या. वडिलांच्या आजारपणानंतर पुरुषोत्तम हा घरातला कर्ता पुरुष होता. त्याच्या अशा जाण्याने घरावर, बुरकूल गावावर शोककळा पसरली आहे. सरकारी नोकरी मिळवून वडिलांचे उपचार आणि घराला आधार द्यायचे त्याचे स्वप्न अर्धवटच राहिले. पोलीस भरतीसाठी मेहनत तर घेतली पण शरीरानेच साथ सोडली.

Comments
Add Comment

Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज समान नागरी कायद्याचे जनक - मंत्री नितेश राणे

विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करण्याबाबत केले आश्वस्त मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने समान नागरी

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच पावसाच्या सरी बरसणार

मुंबई : वाढत्या उष्णते मध्ये दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो

NCMC Card : वृद्ध असो की विद्यार्थी; सवलतीसाठी आता १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक

एसटीतील सवलतीसाठी १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक  मुंबई : राज्य मार्ग परिवहन (ST) महामंडळाच्या बसमधील सवलतीच्या

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या

Ketan Agrawal Murder Case : "सिया दोषी असेल तर तिलाही त्याच दरीत ढकला!"; आई-वडिलांचा संताप, पोलिसांकडून ९ प्रश्नांची सरबत्ती

पुणे : पुण्याला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत निर्णायक वळणावर येऊन