धक्कादायक! मुलुंडमध्ये १६ वर्षीय मुलीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; आरोपी अटकेत

मुंबई : मुलुंड परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने मुंबईत खळबळ उडाली आहे. केवळ बोलणं बंद केल्याच्या रागातून एका तरुणाने १६ वर्षीय मुलीवर कोयत्याने हल्ला केल्याची भीषण घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यासोबत असलेल्या मित्रालाही मारहाण करण्यात आली.


मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आशिष बनसोड आणि पीडित मुलगी दोघेही बदलापूर येथील रहिवासी असून एकमेकांना ओळखत होते. काही वैयक्तिक कारणांमुळे मुलीने त्याच्याशी संवाद बंद केला होता. याच संतापातून आरोपीने मुलुंडमधील तिच्या कॉलेजजवळ तिला गाठत सोबत आणलेल्या कोयत्याने तिच्या गळ्यावर वार केला. यावेळी तिच्यासोबत असलेल्या मित्रालाही त्याने गंभीर जखमी केले. हल्ल्यानंतर आरोपीने दोघांनाही जीवे मारण्याची धमकी दिली.


या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला शस्त्रासह अटक केली आहे. आरोपीवर यापूर्वीही बदलापूरमध्ये विविध गुन्हे दाखल असल्याची माहितीbadlaur  समोर आली आहे. सध्या पोलीस अधिक तपास करत आहेत.


दरम्यान, या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. केवळ बोलण्यास नकार दिल्यामुळे एवढ्या टोकाचा हल्ला होणे ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अधिक कडक उपाययोजना आणि समाजात जागरूकता वाढवण्याची गरज व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

खरातला दिली गेलेली पाण्याची जोडणी मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर, शीतल म्हात्रेंचा गंभीर आरोप

मुंबई: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण सध्या राज्यभरत चांगलचं गाजत आहे. नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक

किनारी रस्ता प्रकल्पात पादचारी भुयारी मार्गात छत उभारण्याचा प्रस्ताव फेटाळला

मुंबई: महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील भाग–२ मधील पादचारी भुयारी

नवी मुंबईचा प्रवास वेगवान होणार, ठाणे-बेलापूर मार्गावरील प्रवास आता सिग्नलमुक्त

नवी मुंबई: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिकेने एका महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी

महापालिकेच्या टाऊनहॉल जिमखान्याचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने महापालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदान येथील जुन्या क्रिडा भवनाच्या जागेवर

कुलाबा सांडपाणी प्रकल्पातील प्रक्रिया ३ दशलक्ष लिटर पाण्याची होणार विक्री

मुंबई: कुलाबा मल जल प्रक्रिया केंद्रात प्रकल्पातून पिण्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठी प्राप्त होणाऱ्या १० दशलक्ष

मिठी नदीच्या कामाला येत्या १ एप्रिलपासून होणार सुरुवात

मुंबई: मुंबईतील २६ जुलैच्या महापुराला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीतील गाळाची सफाई करण्यासाठी आतापर्यंत कंपन्याच