कामचुकार अधिकारी म्हणजे ‘भोंदू अशोक खरात’ची आधुनिक रूपे!

सुधीर मुनगंटीवारांचा घणाघात; विधिमंडळाच्या सार्वभौमत्वाशी तडजोड खपवून घेणार नाही - अध्यक्ष राहुल नार्वेकर


मुंबई : मंत्रालयातील काही कामचुकार अधिकारी हे ‘भोंदू’ अशोक खरातची आधुनिक रूपे असून, त्यांच्या 'अंधबुद्धी'मुळे लोकशाही धोक्यात येत असल्याची घणाघाती टीका भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी विधानसभेत केली. आश्वासन समितीचे अध्यक्ष रवी राणा यांनी मांडलेल्या अहवालावरून अधिकाऱ्यांच्या अरेरावीचा पाढा वाचताना, मुनगंटीवार यांनी प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी, समितीच्या कामकाजात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.


विधानसभेत मंगळवारी आश्वासन समितीचा पहिला अहवाल सादर करताना अध्यक्ष रवी राणा यांनी अधिकाऱ्यांच्या असहकार्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या मुद्द्याचा धागा पकडत मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले, "सभागृहात मंत्री एखादे आश्वासन देतात, मात्र फाईल अधिकाऱ्यांकडे गेली की त्यावर भलतेच शेरे मारले जातात. मंत्रालयातही आता जादूचे पाणी देणारे अशोक खरात नावाचे काही अधिकारी दिसत आहेत. अंधश्रद्धेप्रमाणेच 'अंधबुद्धी' सुद्धा घातक असते, याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या उपकेंद्राबाबत मंत्र्यांनी दिलेले आश्वासन अधिकारी फाईलवर फिरवतात, हे लोकशाहीसाठी मारक आहे."


नशा शराब में होती तो...


अधिकाऱ्यांच्या अजब तर्कशास्त्रावर टीका करताना मुनगंटीवार यांनी एका चित्रपट गीताचा दाखला दिला. 'नशा शराब में होती, तो नाचती बोतल...' असे काही अधिकाऱ्यांचे वागणे आहे. बाटली नाचत नाही, तर नशेने माणूस नाचतो हे समजण्याइतकीही बुद्धी नसेल तर काय म्हणावे? मंत्री सभागृहात आश्वासन देतात आणि हे अधिकारी मात्र समितीला पत्र लिहून ते आश्वासन मागे घेण्याची भाषा करतात. हे अधिकारी केवळ मंत्र्यांनाच नाही, तर संपूर्ण सभागृहाला फसवण्याचे काम करत आहेत," असा हल्लाबोल त्यांनी केला.


विधानसभा अध्यक्षांनी घेतली दखल


मुनगंटीवारांनी व्यक्त केलेल्या संतापाची दखल घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रशासनाला कडक शब्दांत समज दिली. "समित्या हा विधिमंडळाचा आत्मा आहेत. अधिकारी जर समितीसमोर येण्यास टाळाटाळ करत असतील किंवा विलंबाचे धोरण स्वीकारत असतील, तर ती विधिमंडळाच्या सार्वभौमत्वाशी केलेली तडजोड आहे. हे कदापि सहन केले जाणार नाही. यापुढे कोणत्याही समितीच्या बैठकीला अधिकारी अनुपस्थित राहिल्यास त्यांच्यावर तातडीने कठोर कारवाई केली जाईल," असे निर्देश नार्वेकर यांनी दिले.

Comments
Add Comment

Nitin Gadkari : पुणे-संभाजीनगर प्रवास दोन तासांत; मुंबई-बेंगळुरू अंतर पाच तासांत

पुणे : पुणे ते संभाजीनगर प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी नवीन उन्नत मार्ग उभारण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे हे

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाकडून 'दुय्यम श्रेणीचा प्रवासी' शब्दावर आक्षेप, अपघातग्रस्ताच्या कुटुंबाला ८ लाखांची नुकसान भरपाई

नवी दिल्ली : रेल्वे अपघात प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने 'दुय्यम श्रेणीचा प्रवासी' या शब्दप्रयोगावर आक्षेप घेत

Krishna Temple : श्रीकृष्ण चरणी भक्ताने अर्पण केली २० लाखांची सोन्याची बासरी

राजस्थान : राजस्थानात चित्तोडगड जिल्ह्यातील मेवाडचे प्रसिद्ध श्री सावळिया सेठ मंदिरात जयपूर येथील एका भाविक

Cockroach Janata Party : जंतर-मंतरवर ‘हिंदू देवतांचा अवमान आणि ‘हेट स्पीच'; कुणाल कामरा व प्रकाश राज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

मुंबई(Mumbai): जंतर-मंतर येथे ‘कॉकरोच जनता पार्टी’ आणि सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली नीट परीक्षेच्या प्रश्नावर

Navneet Rana : हनुमान गढीवर हजारो भाविकांसह नवनीत राणा व आ. रवि राणा यांचे हनुमान चालीसा पठण

अमरावती : अमरावतीतील श्री हनुमान गढी येथे शनिवारी हजारो हनुमान भक्तांच्या उपस्थितीत भाजपा नेत्या तथा माजी

Governor Jishnu Dev Verma : विद्यापीठांनी शिक्षणासह कौशल्यांचे एकत्रिकरण करणे आवश्यक - राज्यपाल जिष्णु देव वर्मा

पुणे : कृत्रिम बुद्धीमत्ता, डेटा सायन्स, रोबोटिक्स, क्वांटम तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि स्वच्छ