राज्यातील सिंचन योजनांचा वेग वाढला! ३,४५९ शेतकऱ्यांना १०.३० कोटींचे अनुदान वितरित; कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची विधान परिषदेत माहिती

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि शेतीला शाश्वत पाण्याची सोय करून देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. 'प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना' आणि 'मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजने'च्या माध्यमातून राज्यातील पात्र लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने अनुदान वितरित केले जात असून, आतापर्यंत ३ हजार ४५९ शेतकऱ्यांच्या खात्यात १०.३० कोटी रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी आज विधान परिषदेत दिली. आमदार प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या अल्प सूचना प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री जयस्वाल बोलत होते. या चर्चेत आमदार विक्रम काळे यांनीही सहभाग घेतला होता.

लॉटरी पद्धत बंद; आता थेट लाभ

शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा बदल करताना राज्यमंत्र्यांनी सांगितले की, "पूर्वी सिंचन योजनेच्या लाभासाठी लॉटरी पद्धत अवलंबली जात होती, ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागत असे. मात्र, आता ही लॉटरी पद्धत पूर्णपणे बंद करण्यात आली असून नियमित प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे जो शेतकरी पात्र आहे, त्याचा एकही अर्ज आता प्रलंबित राहणार नाही."

या योजनांसाठी केंद्र सरकारकडून ६७ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत, तर नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोखरा) योजनेच्या माध्यमातून ८० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. याशिवाय, राज्य शासनाने आपल्या तिजोरीतून २३५ कोटी रुपयांचा विशेष निधी वर्ग केल्यामुळे सिंचन प्रकल्पांना मोठी गती मिळाली आहे. नवीन आर्थिक वर्षात नियोजित केलेल्या ४७७ कोटींच्या तरतुदीमुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ठिबक आणि तुषार सिंचनासारख्या सुविधांचा लाभ घेता येणार असून, यामुळे राज्यातील कोरडवाहू शेतीला संजीवनी मिळणार आहे.
Comments
Add Comment

Lashkar-e-Taiba : पाकिस्तानात दहशतवाद्यांचा एकामागोमाग एक खात्मा! लष्कर-ए-तैबाच्या टॉप कमांडरची गोळ्या झाडून हत्या

पाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटनांवर पुन्हा एकदा अज्ञात हल्लेखोरांनी निशाणा साधला आहे. शेख युसूफ आफ्रिदी (Sheikh Yousuf

West Bengal Election 2026 : विक्रमी मतदानामुळे ममता बॅनर्जींचे सरकार संपुष्टात येईल - अमित शाह

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जिल्ह्यातील राणाघाट येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

IPL 2026 GT vs CSK : गुजरातकडून चेन्नईचा घरच्याच मैदानावर लाजिरवाणा पराभव!

आयपीएल २०२६ च्या ३७ व्या सामन्यात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. गुजरातने चेन्नईला त्यांच्या घरच्या मैदानावर,

अमेरिकेच्या येल विद्यापिठाचा विद्यार्थी करणार मुंबई बंदर, माथाडी कामगार, शहराचा विकासावर पीएचडी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) अमेरिकेच्या येल विद्यापिठाच्या इतिहास विभागातील विद्यार्थी हा , विसाव्या शतकातील

Malad BMC School : मालाड पश्चिममधील अतिधोकादायक नेमाणी शाळेत शिकतात महापालिकेची मुले

- भाजप नगरसेविकेने शिक्षण समितीच्या बैठकीत शाळा बंद करण्याची केली मागणी - पर्यायी शाळा लिबर्टी गार्डन शाळेत सुरु

BMC News : महापालिकेच्या स्टॉल्सचा परवाना अविवाहित व्यक्तीच्या मृत्यूनंतर आई, वडिलांच्या नावे होणार

- भाऊ आणि बहिणीच्या नावे करण्यास प्रशासनाने दर्शवला ठाम नकार मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेचे स्टॉल्स