गडचिरोलीत आता इंजिनिअरिंगचे धडे मिळणार

गोंडवाना विद्यापीठाचा अभियांत्रिकी पदवीसाठी एसआयटीईकडे अर्ज; मंत्री चंद्रकांत पाटलांची विधान परिषदेत माहिती


मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक शिक्षणाची दारे अधिक रुंदावण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून गोंडवाना विद्यापीठात 'अभियांत्रिकी पदवी' (Degree in Engineering) अभ्यासक्रम सुरू करण्याच्या दृष्टीने पावले उचलली असून, त्यासाठी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेकडे (AICTE) अधिकृत अर्ज करण्यात आला आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात ही महत्त्वाची माहिती दिली.


आकांक्षित जिल्ह्यावर विशेष लक्ष


आमदार अमोल मिटकरी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, गडचिरोली हा केंद्र आणि राज्य सरकारच्या दृष्टीने 'आकांक्षित जिल्हा' असून, येथील तरुणांना स्थानिक पातळीवरच दर्जेदार शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे शासनाचे प्राथमिक ध्येय आहे. सध्या जिल्ह्यात अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्राचे पदविका (Diploma) अभ्यासक्रम सुरू असून आता पदवी स्तरावर तंत्रशिक्षण नेण्यासाठी सरकार सकारात्मक आहे.


कौशल्य विकासासाठी १७० कोटींची गुंतवणूक


गोंडवाना विद्यापीठ हे केवळ पदवी देणारे केंद्र न राहता कौशल्य विकासाचे मुख्य केंद्र बनत आहे. विद्यापीठात १७० कोटी रुपये खर्चून जागतिक दर्जाच्या 'स्किल डेव्हलपमेंट' पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. यामध्ये विशेषत: 'प्रोफेशनल फुलस्टॅक वेब डेव्हलपमेंट' अभ्यासक्रमातून १५२ विद्यार्थ्यांना थेट प्लेसमेंट आणि ३४१ विद्यार्थ्यांना इंटर्नशिप मिळाली आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) सारख्या २१ व्या शतकातील तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जात आहे. गडचिरोलीतील संसाधनांचा विचार करून 'डिप्लोमा इन बांबू डिझाईन' आणि 'बांबू क्राफ्ट' सारखे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.


लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा


या चर्चेत आमदार विक्रम काळे, प्रवीण दरेकर आणि जगन्नाथ अभ्यंकर यांनीही उपप्रश्न उपस्थित करून गडचिरोलीतील शैक्षणिक सुविधांचा दर्जा वाढवण्याबाबत मागणी केली. त्यावर उत्तर देताना मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले की, दुर्गम भागातील विद्यापीठ असूनही गोंडवाना विद्यापीठाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, भविष्यात प्लेसमेंट आणि इंटर्नशिपच्या संधी आणखी व्यापक केल्या जातील.

Comments
Add Comment

राज्यातील सिंचन योजनांचा वेग वाढला! ३,४५९ शेतकऱ्यांना १०.३० कोटींचे अनुदान वितरित; कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची विधान परिषदेत माहिती

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि शेतीला शाश्वत पाण्याची सोय करून देण्यासाठी राज्य सरकार

खाजगी कौशल्य विद्यापीठ सुधारणा विधेयक परिषदेत मंजूर

मुंबई : राज्यातील कौशल्य विकास आणि रोजगारनिर्मितीला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत खाजगी कौशल्य

भोंदूबाबा अशोक खरातप्रकरणात पुरावा आढळणाऱ्या प्रत्येकावर कारवाई

मुंबई : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात ज्या-ज्या व्यक्तीविरुद्ध पुरावा मिळेल, त्या प्रत्येकाची चौकशी करून

बाळासाहेब ठाकरेंचा ढाण्या वाघ उबाठांमुळे काँग्रेसचा गुलाम - नवनाथ बन

मुंबई : बाळासाहेब ठाकरेंच्या वेळचा ढाण्या वाघ आता उद्धव ठाकरे आणि राऊतांच्या कारकीर्दीत वाघाचे कातडे पांघरून

ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना मोठी भेट

मुंबई : ठाणे महानगरपालिकेतील 'गट ड' श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेला

Ashok Kharat Case : भोंदूबाबा अशोक खरातला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

नाशिकमध्ये गाजत असलेल्या महिला लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी अशोक खरात याला न्यायालयाने २९ मार्चपर्यंत पोलीस