बाळासाहेब ठाकरेंचा ढाण्या वाघ उबाठांमुळे काँग्रेसचा गुलाम - नवनाथ बन

मुंबई : बाळासाहेब ठाकरेंच्या वेळचा ढाण्या वाघ आता उद्धव ठाकरे आणि राऊतांच्या कारकीर्दीत वाघाचे कातडे पांघरून काँग्रेसचा गुलाम झाला आहे. खुर्चीसाठी उद्धव सेना काँग्रेसच्या ताटाखालचे मांजर झालेले मतदारांनी पाहिल्यामुळेच, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये उबाठा गटाला मतदारांनी घरी बसवले. राऊतांनी इतरांना मांजर म्हणण्याच्या फंदात न पडता उबाठा गटाचे झालेले मातेरे सावरावे असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


सातारा जिल्हा परिषद निवडणुकीवेळी जे काही झाले ते हाताळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती समर्थ आहे, राऊतांना त्यात नाक खुपसण्याची गरज नाही. लोकशाहीच्या गप्पा राऊतांनी मारूच नये त्यांना तो अधिकारच नाही असे बन यांनी खडसावले. साता-यामध्ये भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असताना काही लोकांनी जाणूनबुजून वेगळ्या पक्षांशी संगनमत करण्याचा प्रयत्न केला. त्यातून हे प्रकरण घडले असे ते म्हणाले.


महायुतीची चिंता करणा-या राऊतांना खडे बोल सुनावत बन म्हणाले की राऊतांनी उबाठा गटातील गटातटाचे राजकारण, उद्धव ठाकरे आणि खुद्द राऊत यांच्यातील संघर्ष मिटवण्याकडे लक्ष द्यावे. ज्यांना स्वत:च्या पक्षातील भांडणे, तंटे, संघर्ष सोडवता येत नाहीत त्यांनी महायुतीच्या अस्तित्वाची चिंता करू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती भक्कम असून कोणीही त्याला खिंडार पाडू शकत नाही असेही त्यांनी नमूद केले.


यावेळी बन म्हणाले की, महायुती सरकार हे ११ कोटी जनतेच्या आशीर्वादामुळे स्पष्ट बहुमताने आलेले सरकार आहे, पाठीत खंजीर खुपसून, विश्वासघात करून आलेल्या मविआ सरकारसारखे नाही. मविआ सरकार वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे, राऊतांना सचिन वाझे तसेच अनेक अट्टल गुन्हेगारांना पाठीशी घालावे लागले होते. महायुती सरकार भरभक्कम असून सरकार टिकवण्यासाठी कुणालाही पाठीशी घालण्याची गरज भासत नाही.


सध्याच्या युद्धस्थितीमुळे निर्माण झालेला गॅस आणि इंधन तुटवड्याच्या समस्येकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील एनडीए आणि महायुती सरकार डोळ्यात तेल घालून बघत असून ती समस्या सोडवण्यासाठी युद्धस्तरावर काम करत आहेत. साठेबाजांवर, काळाबाजार करणा-यांवरही कठोर कारवाई केली जात आहे. कोणावरही रिकामे गॅस सिंलेंडर वाजवायची वेळ येणार नाही. राज्यातील सूज्ञ जनतेने मात्र वेळोवेळी झालेल्या निवडणुकांमध्ये उबाठा गटाला योग्य जागा दाखवत केवळ टाळ्या वाजवण्याचे काम राऊतांसाठी शिल्लक ठेवले आहे या शब्दांत बन यांनी खिल्ली उडवली.


फुटकळ टीका करण्यापेक्षा राऊतांनी पायाखाली काय जळतेय ते पहावे. देशामध्ये शांती आहे मात्र उबाठा गटात संजय राऊत आणि आदित्य ठाकरे या दोन गटात पेटलेले युद्ध राऊतांनी आधी शमवावे आणि मग इराण इस्रायल युद्धाचे भारतावर उमटलेल्या पडसादांबद्दल मोदी सरकार, महायुती सरकारला शहाजोग सल्ले द्यावे असे बन यांनी सुनावले. संपूर्ण जगाला युद्धाच्या झळा बसत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वामुळे भारताला झळा जाणवल्या नाहीत. अनेक देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढल्या असल्यातरी भारतात मात्र किमती आवाक्यात ठेवू शकलो कारण, देशाची काळजी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी समर्थ आहेत असे ही ते म्हणाले.

Comments
Add Comment

Central Railway : मुंबई PRS प्रणाली बंद; PNR फाईल कॉम्प्रेशनमुळे काही रेल्वे सेवा तात्पुरत्या ठप्प

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS) मध्ये PNR फाईल कॉम्प्रेशनच्या तांत्रिक देखभाल कामासाठी

Mega Block on Central Railway : रविवारी मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक; मेन लाईन आणि ट्रान्स-हार्बरवरील अनेक लोकल सेवा प्रभावित

मुंबई : सेंट्रल रेल्वेच्या मुंबई विभागाकडून रविवार, १० मे २०२६ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीची

कौतुकास्पद ! पेपर विक्रेत्याच्या मुलीने मिळविले शंभर टक्के, शिकवणी न लावता श्रावणीने गाठले यशाचे शिखर

नाशिक :  मनात जिद्द असेल तर आयुष्यातील कठोर प्रसंगांवरही मात करता येते. याचाच प्रत्यय नाशिकमध्ये आला आहे. आर्थिक

DRDO News : भारताची संरक्षण क्षेत्रात मोठी झेप! ओडिशात स्वदेशी ‘TARA’ ग्लाइड शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी

ओडिशा : ओडिशाच्या किनारपट्टीवर भारताने संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. Defence

Defamation on social media :सोशल मीडियावर बदनामी करणे महागात पडणार, कायद्यात बदल करण्यासाठी राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा (Social media platforms) वापर करून पुराव्यांविना केली जाणारी बदनामी (Defamation) आणि त्यातून

Nashik TCS Case : “धर्मांतरासाठी दबाव, बुरखा-नमाजचे प्रशिक्षण”, सरकारी वकिलांनी केले अनेक धक्कादायक दावे

- निदा खानला ११ मेपर्यंत पोलिस कोठडी नाशिक : नाशिकमधील TCS कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात अटक करण्यात