Ashok Kharat case : पीडितांच्या आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्यास होणार गुन्हा दाखल

मुंबई : अशोक खरात प्रकरणानंतर सोशल मीडियावर पीडित महिलांबाबत आक्षेपार्ह मजकूर, फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी सायबर पोलिसांनी थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. पीडित महिलांची बदनामी करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पीडित महिलांसोबत इतर संबंधित महिलांचेही फोटो चुकीच्या पद्धतीने वापरले जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे निरपराध महिलांचीही बदनामी होत असल्याने पोलिसांनी अशा प्रकारांना गांभीर्याने घेतले आहे.


या प्रकरणानंतर अनेक फोटो सोशल मीडियावर मॉर्फ करून तसेच AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बनावट स्वरूपात व्हायरल केले जात असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक सायबर पोलिसांनी अशा सर्व आक्षेपार्ह पोस्ट्सवर बारकाईने लक्ष ठेवले असून, संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. कोणत्याही प्रकारे बदनामीकारक मजकूर, फोटो किंवा व्हिडिओ शेअर करणाऱ्यांवर थेट गुन्हा नोंदवला


दरम्यान, पीडित आणि तक्रारदारांची ओळख गोपनीय ठेवण्यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवा, चुकीची माहिती आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्ट्सवरही लक्ष ठेवण्यात येत आहे, जेणेकरून प्रकरणाची संवेदनशीलता कायम राहील. एकूणच, अशोक खरात प्रकरणात आता तपासाबरोबरच सोशल मीडिया मॉनिटरिंगलाही प्राधान्य देण्यात येत असून, पीडित महिलांच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी पोलिसांकडून ठोस पावले उचलली जात आहेत.



Comments
Add Comment

खरातच्या काळ्या कारनाम्याचा छडा आयपीएस तेजस्वी सातपुते लावणार, कोण आहेत आयपीएस तेजस्वी सातपुते?

नाशिक: महाराष्ट्रातील भोंदूबाबा म्हणजेच अशोक खरातचं काळं सत्य आता हळूहळू समोर येत आहे. स्वत:ला कॅप्टन आणि

नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार, पतीकडून उकळले १० लाख रुपये; डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार

मुंबई: डोंबिवलीतून अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रहिम पद्मसी,करीम जैन आणि करण जोशी अशा तीन नावांचा वापर

पुण्यातून मोठी अपडेट समोर; वसंत मोरेंना अटक होण्याची शक्यता

पुणे: पुण्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाचे नेते वसंत मोरे

मच्छीमारांना सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील; मस्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणेंनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील मच्छीमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी मुख्यमंत्री मत्स्य संपदा

विधान परिषदेत विरोधकांचे संख्याबळ घटणार; ९ आमदार निवृत्त होणार; संख्याबळानुसार महाविकास आघाडीच्या पदरात केवळ दोनच जागा

मुंबई: विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर, आता विधान परिषदेतही विरोधकांचे संख्याबळ कमालीचे घटणार आहे.

मगरपट्ट्याच्या मागील बाजूस कॅनल फुटल्याने रस्त्यावर पाणीच पाणी

पुणे : मगरपट्टा सोसायटीच्या मागील बाजूस असलेल्या कालव्याला भगदाड पडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडत असून