विधान परिषदेत विरोधकांचे संख्याबळ घटणार; ९ आमदार निवृत्त होणार; संख्याबळानुसार महाविकास आघाडीच्या पदरात केवळ दोनच जागा

मुंबई: विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर, आता विधान परिषदेतही विरोधकांचे संख्याबळ कमालीचे घटणार आहे. येत्या १३ मे २०२६ रोजी वरिष्ठ सभागृहातील ९ सदस्यांची मुदत संपत असून, विधानसभेतील सध्याचे पक्षीय बलाबल पाहता महाविकास आघाडीला या नऊपैकी केवळ दोनच जागांवर समाधान मानावे लागणार आहे. परिणामी, परिषदेतील सत्ताधारी महायुतीची बाजू आणखी भक्कम होणार आहे.


निवृत्त होणाऱ्यांमध्ये भाजपचे रणजितसिंह मोहिते-पाटील, संजय केनेकर, संदीप जोशी आणि दादाराव केचे यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त नीलम गोऱ्हे (शिवसेना), अमोल मिटकरी (राष्ट्रवादी काँग्रेस), शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट), राजेश राठोड (काँग्रेस) आणि उद्धव ठाकरे (उबाठा) यांचीही मुदत संपत आहे. मंगळवारी या सदस्यांना औपचारिक निरोप दिला जाणार आहे.


दरम्यान, मुदत संपत असलेल्या ९ जागांसाठी एप्रिल महिन्यात निवडणूक लागण्याची शक्यता आहे. निवृत्त होणाऱ्यांमध्ये सर्वाधिक सदस्य भाजपचे असले, तरी विधानसभेतील प्रचंड संख्याबळाच्या जोरावर भाजप आपल्या जागा पुन्हा सहज जिंकू शकते.



शरद पवार गटाला माघार घ्यावी लागणार


विधानसभेतील सद्यस्थिती पाहता महाविकास आघाडीकडे एकूण ४६ (उबाठा २०, काँग्रेस १६ आणि शरद पवार गट १०) आमदार आहेत. या मतांच्या जोरावर मविआला जास्तीत जास्त दोनच जागा जिंकणे शक्य आहे. राज्यसभा निवडणुकीच्या वेळी झालेल्या तडजोडीनुसार, या दोन जागांपैकी एक जागा उबाठा आणि दुसरी जागा काँग्रेसला सोडण्याचे निश्चित झाले आहे.यामुळे शरद पवार गटाला या निवडणुकीतून माघार घ्यावी लागणार आहे.



पोटनिवडणुकीनंतर अतिरिक्त बळ मिळणार


दुसरीकडे, महायुतीकडे (भाजप १३२, शिवसेना ५७ आणि अजित पवार गट ४१) असे मोठे संख्याबळ आहे. त्यातच राहुरी आणि बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध झाल्यास महायुतीच्या खात्यात अतिरिक्त दोन आमदारांची भर पडणार आहे. यामुळे रिक्त होणाऱ्या नऊ जागांपैकी सात जागांवर महायुतीचा विजय सुकर मानला जात आहे.



निवृत्तीनंतर विरोधकांची स्थिती


काँग्रेस : ५
उबाठा : ५
शरद पवार गट : २


Comments
Add Comment

Thane : मेट्रो, टनेल, पॉड टॅक्सी ते परवडणारी घरे; ठाणे बनतंय सुपर सिटी

ठाणे : “पूर्वी ‘पुणे तिथे काय उणे’ म्हटले जायचे; आता ‘ठाणे तिथे काय उणे’ असे आत्मविश्वासाने म्हणण्याची वेळ आली

Jitendra Shelke Death : अशोक खरात यांचे निकटवर्तीयाचा ट्रकखाली चिरडून मृत्यू, पत्नी आणि मुलगा गंभीर

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, शुक्रवारी झालेल्या एका भीषण अपघातात

Heat wave : १३ राज्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा, काळजी घेण्याचे आवाहन

- अकोला देशातीलच नव्हे तर जगातील सर्वाधिक उष्ण शहर मुंबई : सध्या देशभरातील हवामानात मोठे बदल होत आहेत. काही

Corporate Jihad : कॉर्पोरेट जिहादवर काय म्हणाले मंत्री नितेश राणे ?

पिंपळगाव बसवंत : जबरदस्तीने नमाज पढायला लावणे आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याच्या अधिकृत तक्रारी प्राप्त

Transfer : जी. श्रीकांत छत्रपती संभाजीनगरचे नवे विभागीय आयुक्त

चार वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; जितेंद्र पापळकर यांची जीएसटी विभागात नियुक्ती मुंबई : राज्य शासनाने

Animal Beauty Parlor : तुम्हाला माहित आहे का? या गावाने चक्क सुरु केलंय, महाराष्ट्रात जनावरांच पाहिलं ब्युटी पार्लर; जाणून घ्या सविस्तर

सातारा : महाराष्ट्रातील गावं आता सुजलाम आणि सुफलाम होण्याच्या दिशेने आपली पाऊले उचलत आहेत. शासनाच्या अनेक योजना