विधान परिषदेत विरोधकांचे संख्याबळ घटणार; ९ आमदार निवृत्त होणार; संख्याबळानुसार महाविकास आघाडीच्या पदरात केवळ दोनच जागा

मुंबई: विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर, आता विधान परिषदेतही विरोधकांचे संख्याबळ कमालीचे घटणार आहे. येत्या १३ मे २०२६ रोजी वरिष्ठ सभागृहातील ९ सदस्यांची मुदत संपत असून, विधानसभेतील सध्याचे पक्षीय बलाबल पाहता महाविकास आघाडीला या नऊपैकी केवळ दोनच जागांवर समाधान मानावे लागणार आहे. परिणामी, परिषदेतील सत्ताधारी महायुतीची बाजू आणखी भक्कम होणार आहे.


निवृत्त होणाऱ्यांमध्ये भाजपचे रणजितसिंह मोहिते-पाटील, संजय केनेकर, संदीप जोशी आणि दादाराव केचे यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त नीलम गोऱ्हे (शिवसेना), अमोल मिटकरी (राष्ट्रवादी काँग्रेस), शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट), राजेश राठोड (काँग्रेस) आणि उद्धव ठाकरे (उबाठा) यांचीही मुदत संपत आहे. मंगळवारी या सदस्यांना औपचारिक निरोप दिला जाणार आहे.


दरम्यान, मुदत संपत असलेल्या ९ जागांसाठी एप्रिल महिन्यात निवडणूक लागण्याची शक्यता आहे. निवृत्त होणाऱ्यांमध्ये सर्वाधिक सदस्य भाजपचे असले, तरी विधानसभेतील प्रचंड संख्याबळाच्या जोरावर भाजप आपल्या जागा पुन्हा सहज जिंकू शकते.



शरद पवार गटाला माघार घ्यावी लागणार


विधानसभेतील सद्यस्थिती पाहता महाविकास आघाडीकडे एकूण ४६ (उबाठा २०, काँग्रेस १६ आणि शरद पवार गट १०) आमदार आहेत. या मतांच्या जोरावर मविआला जास्तीत जास्त दोनच जागा जिंकणे शक्य आहे. राज्यसभा निवडणुकीच्या वेळी झालेल्या तडजोडीनुसार, या दोन जागांपैकी एक जागा उबाठा आणि दुसरी जागा काँग्रेसला सोडण्याचे निश्चित झाले आहे.यामुळे शरद पवार गटाला या निवडणुकीतून माघार घ्यावी लागणार आहे.



पोटनिवडणुकीनंतर अतिरिक्त बळ मिळणार


दुसरीकडे, महायुतीकडे (भाजप १३२, शिवसेना ५७ आणि अजित पवार गट ४१) असे मोठे संख्याबळ आहे. त्यातच राहुरी आणि बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध झाल्यास महायुतीच्या खात्यात अतिरिक्त दोन आमदारांची भर पडणार आहे. यामुळे रिक्त होणाऱ्या नऊ जागांपैकी सात जागांवर महायुतीचा विजय सुकर मानला जात आहे.



निवृत्तीनंतर विरोधकांची स्थिती


काँग्रेस : ५
उबाठा : ५
शरद पवार गट : २


Comments
Add Comment

Maharashtra Rain Alert : 29 ते 31 जुलैदरम्यान राज्यात पावसाचा जोर वाढणार; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे 29 ते 31 जुलैदरम्यान

Laxmanrao Joshi : ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव जोशी यांचे निधन; 'व्रतस्थ संपादकाला मुकलो' – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर :  नागपूर 'तरुण भारत'चे माजी मुख्य संपादक ल. त्र्यं. (लक्ष्मणराव) जोशी (Laxmanrao Joshi) यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री

Illegal Mining : अवैध गौण खनिज उत्खननासाठी दहापट दंड

- मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे समभाग भांडवल ५०० कोटींवर मुंबई : राज्यातील वाळू आणि

Satara Suicide : NEET परीक्षेतील अपयशाने खचली! कराडमधील १८ वर्षीय विद्यार्थिनीची विष प्राशन करून आत्महत्या

सातारा : गेल्या काही दिवसांपासून नीट पेपरफुटीमुळे देशभरात आंदोलने सुरु होती. नीट पेपरफुटीमुळे आणि परिक्षेतील

Nagpur Rain Alert Update : नागपुरात मुसळधार पावसाची जोरदार हजेरी : सखल भागात साचले पाणी, सोमलवार शाळेचे मैदान जलमय; हवामान विभागाचा 'यलो अलर्ट'

नागपूर : उपराजधानी नागपूरमध्ये (Nagpur Heavy Rain) हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे.

Nagpur Manish Nagar Accident : नागपूरच्या मनीष नगरमध्ये हृदयद्रावक दुर्घटना : ३ वर्षांच्या चिमुकल्याचा कारखाली चिरडून मृत्यू; थरार CCTV मध्ये कैद

नागपूर : नागपूर शहरातील मनीष नगर परिसरातून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. आपल्या वडिलांच्या