मुंबईत वर्षभरात ५५ हजार ३९० क्षयरोग रुग्णांची नोंद

मुंबई: मुंबईत महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागाकडून क्षय रूग्णांसाठी उच्च दर्जाच्या निदान सेवा, नवीन औषधोपचार पद्धती आणि सातत्यपूर्ण रुग्ण सहाय्य व पाठपुरावा करण्यात येतो. परिणामी, औषध प्रतिरोधक क्षयरोगाचे रुग्ण बरे होण्याचा दर गेल्या ८ वर्षात दुप्पट होऊन ८१ टक्क्यांपर्यंत पोहचला असल्याचा दावा महापालिका आरोग्य विभागाने केला आहे. जागतिक क्षयरोग दिन २४ मार्च रोजी असून विविध आरोग्य संस्थांमध्ये वर्ष २०२५ मध्ये मुंबईत एकूण ५४ हजार ३९० क्षयरोग रुग्णांची संख्या नोंदवली गेली. पैकी ४८ हजार ८३५ रुग्ण मुंबईचे रहिवासी होते. यापैकी ४० टक्के रुग्ण एक्स्ट्रा पल्मनरी, ६ टक्के बालरुग्ण आणि ८ टक्के औषध प्रतिरोधक क्षयरोगाचे प्रकारातील होते,असे आरोग्य विभागाने नमुद केले आहे.


राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारने २०२५ मध्ये “क्षयरोग (TB) मुक्त भारत अभियान” सुरू केले. या कार्यक्रम अंतर्गत १३ लाख ८ हजार २०० संवेदनशील लोकसंख्येची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १ लाख २४ हजार ७७४ संशयित रुग्णांचे एक्स-रे करण्यात आले.


मुंबईतील आरोग्य संस्थांच्या ठिकाणी ४५ आणि ३४ पोर्टेबल मशीन उपलब्ध आहेत. या संयंत्राद्वारे क्षयरोग व रीफॅम्पीसीन औषध-प्रतिरोधक क्षयरोगाचे मोफत व अचूक निदान केले जाते. तसेच आता केंद्रीय क्षयरोग विभागाकडून ४ पॅथोडिटेक्ट मशीनही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या संयंत्राद्वारे क्षयरोग तसेच रीफॅम्पीसीन व आयसोनाझेड औषध-प्रतिरोधक क्षयरोगाचेही निदान करणे होईल. सध्या २ पॅथोडिटेक्ट संयंत्रे सर जे. जे. रूग्णालय व आयआरएल जीटीबी प्रयोगशाळेत उपलब्ध झाली आहेत. वर्ष २०२५ मध्ये एकूण २ लाख मॉलीक्यूलर चाचण्या करण्यात आल्या.


उच्च जोखीम घटक ओळखून योग्य उपचारासाठी ही सेवा दिली जाते. या सेवेअंतर्गत १९,१७२ रुग्णांची नोंदणी करण्यात आली आहे. मुंबईत ३१ डिआर टीबी क्लिनिकमधून मोफत उपचार व औषध दुष्परिणाम व्यवस्थापन सेवा दिली जाते. ६ महिन्यांची प्रगत उपचार पद्धती सुरू करण्यात आली आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत १०९३ रुग्णांवर उपचार सुरू झाले असून ८९ रुग्णांनी उपचार पूर्ण केले आहेत.



पौष्टिक आहार किट


निक्षय मित्रांच्या माध्यमातून दरमहा टीबी रुग्णांना सहा महिन्यांकरिता पौष्टिक आहार किट देण्यात येते. मागील २ वर्षांत निक्षय पोषण योजने अंतर्गत एकूण १,४८,८६७ रेशन किट वितरित करण्यात आले.



क्षयरोगाची १० लक्षणे


दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला,ताप,वजन घटणे,रात्री घाम येणे,भूक न लागणे,छातीत दुखणे,श्वास घेण्यास त्रास,रक्त किंवा कफ खोकल्यातून येणे,थकवा,मानेला सूजवरीलपैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास दुर्लक्ष करू नये. नागरिकांनी जवळच्या बीएमसी दवाखाना, हेल्थ पोस्ट किंवा “आपला दवाखाना” येथे जाऊन मोफत तपासणी व उपचार करून घ्यावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.


 

 
Comments
Add Comment

मुंबईत अत्यंत जबाबदारीने आणि प्रभावीपणे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन कार्यक्रम राबवावा; मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

मुंबई: महाराष्ट्रात लवकरच विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन) कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

वांद्रे पश्चिम भागांत शनिवारी, रविवारी पाणीकपात

मुंबई: पाली हिल जलाशयाच्‍या पाणी पातळीत सुधारणा करण्‍यासाठी वांद्रे पश्चिम येथील रामदास नायक मार्ग, स्‍वामी

मुंबई महापालिका सभागृहात दिवंगत अलका केरकर यांना वाहिली श्रध्दांजली

मुंबई: मुंबई महापालिकेच्या माजी उपमहापौर आणि प्रभाग क्रमांक ९८च्या भाजप नगरसेविका अलका केरकर यांचे अल्पशा

वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू प्रकल्पग्रस्त मच्छिमारांना दिलासा; नुकसानभरपाईसाठी विशेष अभ्यासगट स्थापन करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू बांधकाम प्रकल्पामुळे मच्छीमार बांधवांच्या होणाऱ्या नुकसान भरपाईसंदर्भात आज

तीन महिन्यांत संपूर्ण राज्याचे 'ईटीएस' सर्वेक्षण

राज्यातील अवैध उत्खननावर 'एसआयटी'चा हातोडा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा मुंबई :

खासगी कंपन्यांमधील कामाचे तास वाढवणारे विधेयक राज्य सरकारकडून मागे

मुंबई : राज्यातील दुकाने आणि खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांचे दैनंदिन कामाचे तास १० पर्यंत वाढवण्याबाबतचे