Amravati : राज्यात खरीप पेरण्यांना वेग; २० जुलैअखेर ७४ टक्के पेरणी पूर्ण, अमरावती विभाग आघाडीवर

मुंबई : जून महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यभरातील खरीप हंगाम धोक्यात आला होता. वेळेवर पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांना पेरण्या लांबणीवर टाकाव्या लागल्या. जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातही पावसाची स्थिती विस्कळीत राहिल्याने अनेक भागांतील शेतकरी चिंतेत होते. मात्र, गेल्या पाच ते सात दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे खरीप पेरण्यांना मोठा वेग आला आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ऊस पीक वगळता राज्यात २० जुलैअखेर सरासरी खरीप क्षेत्रापैकी ७४ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. (Kharif sowing 2026)



राज्यातील सरासरी १४४.३६ लाख हेक्टर खरीप क्षेत्रापैकी १०६.७९ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. यंदा १ जून ते २० जुलै या कालावधीत राज्यात सरासरी ४२१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरीप पेरणीचा आढावा घेण्यात आला. गेल्या वर्षी याच कालावधीत राज्यात ८८ टक्के पेरणी पूर्ण झाली होती, तर यंदा ही आकडेवारी ७४ टक्क्यांवर पोहोचली आहे. (monsoon 2026)



विभागनिहाय पाहिल्यास अमरावती विभागात सर्वाधिक ८९ टक्के पेरणी झाली असून छत्रपती संभाजीनगर विभागात ७९ टक्के, नाशिक विभागात ७८ टक्के आणि लातूर विभागात ७७ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. कोल्हापूर विभागात ६३ टक्के, पुणे आणि नागपूर विभागात प्रत्येकी ६१ टक्के पेरणी झाली असून कोकण विभागात केवळ १५ टक्के पेरणी झाली आहे.सोयाबीन पिकाच्या लागवडीत छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांमध्ये मिळून ११३ टक्के पेरणी झाली आहे. लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये ८७ टक्के सोयाबीनची लागवड झाली आहे. अमरावती विभागातील बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये ८८ टक्के, तर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये ७० टक्के सोयाबीन पेरणी पूर्ण झाली आहे.



तूर पिकाच्या पेरणीत नाशिक विभाग आघाडीवर असून येथे १२१ टक्के पेरणी झाली आहे. अमरावती विभागात ९१ टक्के, छत्रपती संभाजीनगर विभागात ८६ टक्के, कोल्हापूर विभागात ८३ टक्के, नागपूर विभागात ७८ टक्के, पुणे विभागात ६२ टक्के आणि लातूर विभागात ५७ टक्के तुरीची पेरणी झाली आहे. मक्याच्या लागवडीत अमरावती विभागाने सर्वाधिक १४२ टक्क्यांचा टप्पा गाठला असून नाशिक विभागात १२८ टक्के, कोल्हापूर विभागात १०० टक्के, छत्रपती संभाजीनगर विभागात ९४ टक्के, पुणे विभागात ८८ टक्के, नागपूर विभागात ८५ टक्के आणि लातूर विभागात ४२ टक्के मका पेरणी पूर्ण झाली आहे. समाधानकारक पावसामुळे आगामी काही दिवसांत उर्वरित क्षेत्रातील पेरण्याही पूर्ण होतील, अशी अपेक्षा कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

Mega Block : रविवारी ठाणे-कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे दिनांक २६ जुलै रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे

Western Railway : पश्चिम रेल्वेच्या १३ विशेष गाड्यांच्या फेऱ्या वाढविल्या

मुंबई, गुजरातहून बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडकडे जाणाऱ्या विशेष रेल्वे सेवांना मुदतवाढ मुंबई : प्रवाशांची

Weather Department : महाराष्ट्रासह १७ राज्यांत मुसळधार पाऊस पडणार, हवामान विभागाचा अंदाज

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता मुंबई : भारतीय हवामान विभागाने देशातील हवामानाबाबत अत्यंत महत्त्वाचा

Mulund Station : मुलुंड स्थानकात पादचारी पुलासाठी मध्यरात्री विशेष ब्लॉक

२५० टन क्रेनने गर्डर लाँचिंगचे काम; दोन लोकल फेऱ्या रद्द मुंबई : मुलुंड रेल्वे स्थानकावर नवीन ६ मीटर रुंदीच्या

Indian Railways : मुंबई रेल्वे आरक्षण सेवा साडेतीन तास बंद राहणार

मुंबई : मुंबई प्रवासी आरक्षण प्रणालीमधील ‘स्टॅटिक’ आणि ‘डायनॅमिक’ फाइल्सच्या कॉम्प्रेशनच्या तांत्रिक

CBI Raid : मुंबईतून IRCTC च्या लाचखोर अधिकाऱ्याला अटक, सीबीआयची कारवाई

मुंबई : केंद्रीय अन्वेषण विभाग, सीबीआयने एका लाचखोरी प्रकरणात आयआरसीटीसी मुंबईच्या पश्चिम विभागीय