Amravati : राज्यात खरीप पेरण्यांना वेग; २० जुलैअखेर ७४ टक्के पेरणी पूर्ण, अमरावती विभाग आघाडीवर

मुंबई : जून महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यभरातील खरीप हंगाम धोक्यात आला होता. वेळेवर पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांना पेरण्या लांबणीवर टाकाव्या लागल्या. जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातही पावसाची स्थिती विस्कळीत राहिल्याने अनेक भागांतील शेतकरी चिंतेत होते. मात्र, गेल्या पाच ते सात दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे खरीप पेरण्यांना मोठा वेग आला आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ऊस पीक वगळता राज्यात २० जुलैअखेर सरासरी खरीप क्षेत्रापैकी ७४ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. (Kharif sowing 2026)



राज्यातील सरासरी १४४.३६ लाख हेक्टर खरीप क्षेत्रापैकी १०६.७९ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. यंदा १ जून ते २० जुलै या कालावधीत राज्यात सरासरी ४२१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरीप पेरणीचा आढावा घेण्यात आला. गेल्या वर्षी याच कालावधीत राज्यात ८८ टक्के पेरणी पूर्ण झाली होती, तर यंदा ही आकडेवारी ७४ टक्क्यांवर पोहोचली आहे. (monsoon 2026)



विभागनिहाय पाहिल्यास अमरावती विभागात सर्वाधिक ८९ टक्के पेरणी झाली असून छत्रपती संभाजीनगर विभागात ७९ टक्के, नाशिक विभागात ७८ टक्के आणि लातूर विभागात ७७ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. कोल्हापूर विभागात ६३ टक्के, पुणे आणि नागपूर विभागात प्रत्येकी ६१ टक्के पेरणी झाली असून कोकण विभागात केवळ १५ टक्के पेरणी झाली आहे.सोयाबीन पिकाच्या लागवडीत छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांमध्ये मिळून ११३ टक्के पेरणी झाली आहे. लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये ८७ टक्के सोयाबीनची लागवड झाली आहे. अमरावती विभागातील बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये ८८ टक्के, तर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये ७० टक्के सोयाबीन पेरणी पूर्ण झाली आहे.



तूर पिकाच्या पेरणीत नाशिक विभाग आघाडीवर असून येथे १२१ टक्के पेरणी झाली आहे. अमरावती विभागात ९१ टक्के, छत्रपती संभाजीनगर विभागात ८६ टक्के, कोल्हापूर विभागात ८३ टक्के, नागपूर विभागात ७८ टक्के, पुणे विभागात ६२ टक्के आणि लातूर विभागात ५७ टक्के तुरीची पेरणी झाली आहे. मक्याच्या लागवडीत अमरावती विभागाने सर्वाधिक १४२ टक्क्यांचा टप्पा गाठला असून नाशिक विभागात १२८ टक्के, कोल्हापूर विभागात १०० टक्के, छत्रपती संभाजीनगर विभागात ९४ टक्के, पुणे विभागात ८८ टक्के, नागपूर विभागात ८५ टक्के आणि लातूर विभागात ४२ टक्के मका पेरणी पूर्ण झाली आहे. समाधानकारक पावसामुळे आगामी काही दिवसांत उर्वरित क्षेत्रातील पेरण्याही पूर्ण होतील, अशी अपेक्षा कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

Mumbai Healthcare : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री  प्रतापराव जाधव यांनी दुसऱ्यांदा घेतला मुंबईतील आरोग्य व्यवस्थेचा आढावा 

आरक्षित रूग्णशय्या तसेच केंद्रीय आरोग्य योजनांचे माहितीपर फलक रूग्णालयांनी दर्शनी भागात लावण्याचे दिले

Kalina Water Cut : मुंबईच्या रक्षकांचे पाण्याविना हाल, ऐन पावसाळ्यात कलिना पोलीस क्वार्टर्समध्ये पाणीपुरवठा खंडीत

कलिना पोलीस क्वॉटर; एक दिवस विथआउट वॉटर! मुंबई : सांताक्रुझमध्ये कलिना येथील पोलीस क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या

मुंबईच्या कनेक्टिव्हिटीला नवी चालना! मेट्रो, लिंक रोड आणि ट्विन टनेल प्रकल्पांना नवी गती

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते मुंबई महानगर प्रदेश

MLA Nilesh Rane : आनंदाची बातमी, गणेशभक्तांसाठी १२ सप्टेंबरला धावणार शिवसेना एक्सप्रेस

मुंबई : कोकणात राहणाऱ्यांसाठी गणेशोत्सव आणि शिमगा अर्थात होळी हे दोन अतिशय महत्त्वाचे सण. नोकरी व्यवसायाच्या

Mumbai Anti-Narcotics Cell : मुंबईत ९ कोटी ४८ लाखांचे मेथॅम्फेटामाइन जप्त; अमली पदार्थविरोधी पथकाची मोठी कारवाई

मुंबई : मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करत मुंबई आणि ग्रेटर

Kurla Landslide : कुर्ला-राजावाडी रुग्णालयातील मृतांचा आकडा वाढला; आणखी एका तरुणाचा मृत्यू

मुंबई : कालच्या घटनेनंतर जखमी आणि मृतांची संख्या अद्ययावत करण्यात आली आहे. 13 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 1.15 वाजता