Mumbai Rain : मुंबईत वर्षभराच्या तुलनेत सरासरी ७६ टक्के पडला पाऊस

मुंबई : मुंबईत (Mumbai) आतापर्यंत वर्षभराच्या तुलनेत सरासरी ७५ ते ७६ टक्के एवढ्या पावसाची (Rain) नोंद झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. हवामान खात्याच्या अंदाज घेणाऱ्या वेधशाळेच्या नोंदीनुसार आतापर्यंत शहरात ७४.२९ टक्के तर उपनगरांत ८०.७३ टक्के एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत सरासरी २१०० ते २३०० मि.मी एवढा पाऊस पडला जातो. त्यातुलनेत आतापर्यंत शहरात १५५३ मि.मी आणि उपनगरांत १८७२ मि.मी एवढ्या पावसाची नोंद आतापर्यंत झाली आहे.



मुंबईत शहरातील पावसाची नोंद कुलाबा वेधशाळेच्या माध्यमातून आणि उपनगरांतील पावसाची नोंद सांताक्रुझ (Santacruz) वेधशाळेच्यावतीने घेतली जाते. मुंबई शहरात मागील २४ तासांमध्ये ५४.८ मि.मी आणि उपनगरांत २१.२ मि.मी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. तर मागील वर्षी २४ जुलैपर्यंत शहर भागात ४३.०४ टक्के अर्थात ९०१ मि.मी एवढा पाऊस पडला होता तर उपनगरांत ४९.६९ टक्के अर्थात ११५२ मि.मी एवढा पाऊस पडला होता.


तर महापालिका स्वयंचलित पावसाळी यंत्रावर नोंदवलेल्या नोंदीनुसार शहर भागात ६६. ६० टक्के व उपनगरांत ७१.९३ टक्के एवढा पाऊस पडला आहे. यात आतापर्यंत शहरांत ६६.६० टक्के म्हणजे १३९५.२७ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. तर पूर्व व पश्चिम उपनगरात ७१.९३ टक्के अर्थात पूर्व उपनगरात १६९६.७४ मि.मी व पश्चिम उपनगरात १६३९.३२ मि.मी एवढा पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

Comments
Add Comment

BMC Schools : महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना ३१ जुलैपर्यंत ८० टक्के शालेय साहित्याचे वाटप

मुंबई : मुंबई महापालिकेच्या (BMC) शाळांमध्ये (Schools) शालेय विद्यार्थ्यांना (Students) दरवर्षी २७ शैक्षणिक वस्तुंचे मोफत वाटप

BMC : तब्बल १२७८ महिलांमध्ये स्तन कर्करोगाची आढळली लक्षणे, महापालिकेच्यावतीने केला जाणार मोफत उपचार

महापालिका सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी दिली माहिती मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री

Mumbai Water Supply : मुंबईकरांचा पाणी साठा सुस्थितीत, आता प्रतीक्षा ऑगस्टमधील पावसाची

मुंबई : मुंबईला (Mumbai) पाणी पुरवठा (Water Supply) करणाऱ्या सर्व धरणांमधील पाणी साठा आता चांगल्याप्रकारे वाढू लागला असून

Ashadhi Ekadashi : वडाळा येथील 'प्रतिपंढरपूर' विठ्ठल मंदिरात मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या हस्ते महापूजा आणि महाअभिषेक संपन्न

मुंबईकरांच्या सुख-समृद्धीसह महानगराच्या सर्वांगीण विकासासाठी विठुरायाच्या चरणी प्रार्थना वडाळा : आषाढी

Amravati : राज्यात खरीप पेरण्यांना वेग; २० जुलैअखेर ७४ टक्के पेरणी पूर्ण, अमरावती विभाग आघाडीवर

मुंबई : जून महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यभरातील खरीप हंगाम धोक्यात आला होता. वेळेवर पाऊस न झाल्याने

Mega Block : रविवारी ठाणे-कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे दिनांक २६ जुलै रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे