मुंबईतील टँकर माफियांची लॉबी नष्ट करा; महापालिका सभागृहात सर्वच नगरसेवकांची एकमुखी मागणी

मुंबई: मुंबईत सध्या पाण्याची काही भागांमध्ये समस्या निर्माण झाली असून ही टंचाई फक्त आणि फक्त टँकर माफियांसाठी होत असल्याचा आरोप नगरसेवकांनी करत मुंबईतील अशाप्रकारची टँकर माफिया लॉबीच नष्ट करण्यात यावी तसेच त्यांच्याशी संगनमत करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी महापालिका सभागृहात केली. यावर प्रशासनाच्यावतीने टँकरद्वारे भरण्यात येणाऱ्या पाण्याबाबतच्या कार्यध्दतीत सुधारणा करण्यासाठी धोरण बनवण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र प्रशासनाच्या या उत्तरामुळे समाधान न झाल्यामुळे महापौरांनी अपेक्षित उत्तर देण्यासाठी योग्यप्रकारे आढावा कार्यवाही केली जावी अशाप्रकारचे निर्देश प्रशासनाला दिले.


शिवसेना नगरसेवक रितेश कमलेश राय यांनी महापालिका सभागृहात ६६ ब अन्वये चर्चा उपस्थित करत मुंबईतील टँकर माफियांवर कारवाई करण्याची मागणी केली. के दक्षिण विभागात सध्या मोठ्याप्रमाणात पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. मात्र पाणी वितरणातील असमानता आणि पाण्याची चोरी ही मोठी समस्या आहे. त्यामुळे अपुऱ्या पाणी समस्येमुळे नागरिकांना खासगी टँकरशिवाय पर्याय नसल्याचे सांगत या टँकरसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहे. त्यामुळे ही पाणी समस्या केवळ टँकर माफियांसाठी निर्माण केली जाते का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याला एआयएमआयएमचे विजय उबाळे यांनी झोपडपट्टी आणि टोलेजंग इमारतींमध्ये पाणी पुरवठ्यात तफावत का? तर प्रविण छेडा यांनी मुंबईतील बोअरवेलची गणना केली जावी अशी मागणी केली.


स्वप्ना म्हात्रे यांनी मुंबईत टोलेजंग इमारती उभारले जात आहेत, त्यांच्यासाठी पाण्याचे नियोजन केले जात आहे का असा सवाल केला. तर विशाखा राऊत यांनी ७ मल जल प्रक्रिया केंद्रातील प्रक्रिया केलेले पाणी समुद्रात सोडायचे आणि त्याच समुद्राचे पाणी गोडे करायचे हा कुठला प्रकार असा सवाल उपस्थित केला. अश्रफ आझमी यांनी गळतीतून वाया जाणारे पाणी वाचवण्यासाठी गळती शोध यंत्रणा अधिक प्रभावीपणे राबवण्याची सूचना केली. तर भाजपच्या प्रिती सातम यांनी महापालिकेच्या जलभरणा केंद्रावर एका परवानगीवर दहा ते बारा टँकर भरले जात असल्याचा आरोप करत अशाप्रकारे अशाप्रकारे भरले जाणारे खासगी टँकरना भरणा करण्यास बंदी घालावी, जेणेकरून पाणी चोरी मोठ्याप्रमाणात कमी होईल अशी मागणी केली केली. उबाठाचे सचिन पडवळ यांनी महापालिकेच्या जलभरणा केंद्रांवर गृहनिर्माण सोसायट्यांच्या बोगस लेटरहेडच्या आधारे महापालिकेच्या जलभरणा केंद्रावरुन टँकर भरुन जनतेला अवाच्या सव्वा दराने पाणी विकले जाते. तर भाजपचे प्रकाश दरेकर यांनी पाणी समस्या आणि टँकर माफिया हा चर्चेचा नाही तर चिंतेचा विषय असल्याचे सांगत मुंबईच्या प्रवेशद्वाराजवळ जर पाणी समस्या असेल तर हे मुंबईचे दुर्भाग्य आहे. तर सभागृहनेते गणेश खणकर यांनी टँकर माफिया ही मोठी समस्या असून ही माफियागिरी आता बंद करायलाच हवी. आज २४ तास टँकरने पाणी पुरवठा होता आणि अशा टँकर माफियांना मदत करणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली. तसेच यापुढे एकही अनधिकृत जलजोडणी देण्यात यावी अशीही मागणी केली. यावेळी झालेल्या चर्चेत शिवसेनेच्या यामिनी जाधव , धर्मेश गिरी, वकार खाना, संध्या दोषी, रोशन शेख, दिशा यादव, योगिता कदम, चिंतामणी निवाते आदी सदस्यांनी भाग घेतला होता


यावेळी प्रशासनाच्यावतीने अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी पाण्याचे स्त्रोत वाढवणे आणि वितरण व्यवस्था सुधारणे यासाठी प्रशासन प्रयत्न करेल असे सांगत जलवाहिनी जुन्या झाल्यामुळे त्यातून होणारी गळती ही नाकारण्यासारखी नसल्याचेही सांगितले. तसेच गळती शोधण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला जात आहे.मात्र, टँकर माफिया यांची सध्याची कार्यपध्दतीत बदल करणे आवश्यक आहे. त्यामुळे सदस्यांच्या भावना लक्षात घेवून त्याप्रमाणे धोरण बनवले जाईल असे सांगितले. यावर महापौर रितू तावडे यांनी प्रशासनाच्या उत्तराशी समाधानी नसून सदस्यांना अपेक्षित उत्तर देण्याच्यादृष्टीकोनातून योग्यती कार्यवाही केली जावी असे निर्देश प्रशासनाला दिले.

Comments
Add Comment

महापुरुषांची नावे संक्षिप्त घेणाऱ्यांवर कारवाई करा; शिवसेना नगरसेवकांची मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेच्या वतीने जोगेश्वरी रुग्णालयाचे नामकरण हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब

महापालिका शाळांमधील न्युट्रीबार वादात; मध्यान्ह भोजनात इस्कॉनच्या खिचडीची झाली मागणी

मुंबई: मुंबई महापालिका शाळांमधील मुलांना पोषक आहारांतर्गत देण्यात येणाऱ्या न्युट्रीबारच्या वाटपाबाबत आता

मुंबईचा पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्ग पावसाळ्यापूर्वी समतल करा; उपमहापौरांची आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

मुंबई: मुंबई महानगरातील रस्त्यांची स्थिती अधिक सुधारण्यासाठी पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच प्रमुख

महापालिकेच्यावतीने मुंबई क्लीन लीग स्पर्धा; स्वच्छता विषयक स्पर्धेच्या नोंदणीचा अक्षय कुमार यांच्या उपस्थितीत शुभारंभ

मुंबई: मुंबई अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या अनुषंगाने, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने

मुंबई वॉटर मेट्रो जलवाहतूक प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुंबई : "मुंबई महानगर प्रदेशात जलप्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात

आमदार हेमंत पाटील यांनी मांडली 'लव्ह जिहाद' आणि 'लोकसंख्या नियंत्रणाची' आग्रही भूमिका

विधान परिषदेत धर्मांतर विरोधी विधेयकावर चर्चा मुंबई : विधान परिषदेत आज धर्मांतर विरोधी विधेयकावर अत्यंत