पाणी समजून प्यायलं थिनर; चार वर्षांच्या चिमुकल्याच्या तोंडापासून ते पोटापर्यंत...

ठाणे : ठाण्याच्या इंदिरानगरमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. चार वर्षाच्या चिमुकल्याने चुकून पाणी समजून घरात असलेले थिनर पिऊन टाकले आहे. ही थरकाप उडवणारी घटन सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडल्याने कुटुंबात घबराट पसरली.
खेळता खेळता प्रकार घडला.


मिळालेल्या माहितीनुसार, यादव कुटुंब हे वागळे इस्टेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास आहेत. सोमवार सायंकाळी चिमुकला घरात खेळत होता. दरम्यान त्याच वेळी घरात एका डब्यात असलेले थिनर त्याला पाणी असल्याचे वाटले आणि त्याने ते पिऊनही टाकले. अवघ्या काही मिनिटांनी त्याच्या घशाला त्रास होऊन जळजळ होऊ लागली आणि पोटातही दुखू लागल्याने त्याने लगेच जाऊन आईला माहिती दिली.


पोराने सर्व सांगितल्यानंतर कुटुंबियांनी कोणताही उशीर न करता त्याला लगेच जवळच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवले. सध्याच्या स्थितीला चिमुकल्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे.

Comments
Add Comment

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु

मराठमोळ्या मुलीशी लग्न करुन आता पत्नीला बुरख्यातच ठेवतो; म्हणाल्या, पुरुष स्त्रियांकडे...

मुंबई: प्रसिद्ध युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अदनान शेख सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो