'अतिरेक्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानशी मैत्री होणार नाही'

जम्मू : अतिरेक्यांना आश्रय देणे थांबवून आतंकवाद संपवला तरच पाकिस्तानशी मैत्रीची चर्चा होईल. मात्र दहशतवाद संपवण्याची पाकिस्तानची इच्छा नाही. पाकिस्तान अतिरेक्यांना पाठबळ देत आहे. अतिरेक्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानशी भारताची कधीही मैत्री होणार नाही असे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. जम्मू येथील आमंत्रण रिसॉर्ट हॉल येथे महाराजा हरिसिंह डोगरा पुरस्कार सोहळ्यात विशेष अतिथी म्हणून रामदास आठवले बोलत होते. यावेळी माजी राज्यपाल आणि भारताच्या पहिल्या महिला आय पी एस किरण बेदी यांच्यासह अनेक मान्यवरांना रामदास आठवले यांच्या हस्ते महाराजा हरिसिंह डोगरा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाच्या आयोजक आणि रिपाइं जम्मू काश्मीर प्रदेश अध्यक्षा संध्या गुप्ता आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.


दिवंगत अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असताना आगरा येथे पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्याशी अटलजींची चर्चा झाली होती. तेव्हा पाकिस्तानने दहशतवादी कारवाया थांबवाव्यात. दहशतवाद जोपर्यंत थांबवला जात नाही तोपर्यंत पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण सबंध स्थापन होऊ शकत नाहीत असे वाजपेयी यांनी सांगितल्यानंतर पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ या लष्करशहाने दहशतवाद संपविण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळे दहशतवाद संपवण्याची आणि भारताशी मैत्री करण्याची पाकिस्तानचीच इच्छा नाही. अतिरेक्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानशी भारताची मैत्री कधीही होणार नाही असे रामदास आठवले यावेळी म्हणाले.


'भारत नाही कुणाचा गुलाम,
म्हणून आम्ही करीत आहोत
देशासाठी बलिदान देणाऱ्यांना सलाम...'


असे सांगत रामदास आठवले यांनी देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांचा महाराजा हरिसिंह डोगरा पुरस्काराने सन्मान केला. त्यात बी एस एफ; सी आर पी एफ च्या शहीद जवानांच्या कुटुंबियांचा समावेश होता. यावेळी २६/ ११ मुंबई हल्ल्यावेळी अनेकांचे प्राण वाचविणारे पोलिस सबइन्स्पेक्टर मंगेश नाईक यांचा महाराज हरिसिंह डोगरा पुरस्काराने रामदास आठवले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.


माजी राज्यपाल आणि भारताच्या पहिल्या महिला आयपीएस किरण बेदी या आपल्या शिस्तप्रिय कर्तृत्वासाठी लोकप्रिय होत्या. दिल्लीत आयपीएस म्हणून कर्तव्य बजावताना त्यांनी तत्कालीन पंतप्रधानांची गाडी जेसीबीने उचलून नेऊन कारवाई केली होती. याची आठवण सांगताना रामदास आठवले यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्या विकासाची गाडी कोणी अडवू शकत नाही. विकासाच्या दिशेने भरधाव वेगाने मोदींची विकासाची गाडी पुढे चालली आहे, अशी टिप्पणी केली. तसेच शिस्तप्रिय कर्तव्य कठोर अधिकारी म्हणून किरण बेदी यांचा महाराज हरिसिंह डोगरा पुरस्काराने गौरव केला. जम्मू काश्मीर मधून कलम ३७० हटविल्यामुळे येथील पोलिस बीएसएफ यांना अधिकारी मिळाले आहेत. त्यामुळे पूर्वीपेक्षा तुलनेने जम्मू काश्मीरमध्ये चांगली शांतता वाढत आहे. दहशतवाद कमी होत आहे. जम्मू काश्मीरमधून दहशतवाद नष्ट करायचा आहे आणि ते लवकरच केंद्र आणि राज्य सरकार परस्पर समन्वयातून करून दाखवेल, असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Chhattisgarh : वीज प्रकल्पात बॉयलरचा स्फोट, अनेकांचा मृत्यू

शक्ती : छत्तीसगडमधील शक्ती जिल्ह्यात वेदांता कंपनीच्या वीज निर्मिती प्रकल्पात बॉयलरचा स्फोट झाला. या स्फोटात नऊ

पर्यावरणप्रेमी की पर्यावरणाला हानीकारक आहे EV ?

नवी दिल्ली : दिल्ली सरकारने ‘ईव्ही धोरण २.०’ अंतर्गत विद्युत वाहनांना प्रदूषणाविरुद्ध प्रभावी पर्याय म्हणून

Samrat Choudhary : बिहारमध्ये 'सम्राट' पर्व सुरू; उद्या सम्राट चौधरी बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार

पाटणा : बिहारच्या राजकारणात आज एक मोठी ऐतिहासिक घडामोड घडली आहे. सुमारे दोन दशके मुख्यमंत्रिपद भूषवल्यानंतर

Dr Babasaheb Ambedkar Jayanti : ज्यांनी भाकरी दिली, त्यांनाच भाकरीवर अर्पिली कलावंदना!

कोल्हापूरच्या अमित माळकरींनी साकारले बाबासाहेबांचे अनोखे चित्र कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Donald Trump, Xi Jinping : इराण युद्धाबद्दल शी जिनपिंग यांच्याशी थेट चर्चा नाही- ट्रम्प

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी सांगितले की त्यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी

Delhi–Dehradun Expressway inauguration today : दिल्ली ते डेहराडून आता अवघ्या अडीच तासांत! पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज 'इकॉनॉमिक कॉरिडॉर'चे भव्य लोकार्पण

नवी दिल्ली : उत्तर भारतातील प्रवाशांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. बहुप्रतीक्षित दिल्ली-डेहराडून एक्सप्रेसवे