'अतिरेक्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानशी मैत्री होणार नाही'

जम्मू : अतिरेक्यांना आश्रय देणे थांबवून आतंकवाद संपवला तरच पाकिस्तानशी मैत्रीची चर्चा होईल. मात्र दहशतवाद संपवण्याची पाकिस्तानची इच्छा नाही. पाकिस्तान अतिरेक्यांना पाठबळ देत आहे. अतिरेक्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानशी भारताची कधीही मैत्री होणार नाही असे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. जम्मू येथील आमंत्रण रिसॉर्ट हॉल येथे महाराजा हरिसिंह डोगरा पुरस्कार सोहळ्यात विशेष अतिथी म्हणून रामदास आठवले बोलत होते. यावेळी माजी राज्यपाल आणि भारताच्या पहिल्या महिला आय पी एस किरण बेदी यांच्यासह अनेक मान्यवरांना रामदास आठवले यांच्या हस्ते महाराजा हरिसिंह डोगरा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाच्या आयोजक आणि रिपाइं जम्मू काश्मीर प्रदेश अध्यक्षा संध्या गुप्ता आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.


दिवंगत अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असताना आगरा येथे पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्याशी अटलजींची चर्चा झाली होती. तेव्हा पाकिस्तानने दहशतवादी कारवाया थांबवाव्यात. दहशतवाद जोपर्यंत थांबवला जात नाही तोपर्यंत पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण सबंध स्थापन होऊ शकत नाहीत असे वाजपेयी यांनी सांगितल्यानंतर पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ या लष्करशहाने दहशतवाद संपविण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळे दहशतवाद संपवण्याची आणि भारताशी मैत्री करण्याची पाकिस्तानचीच इच्छा नाही. अतिरेक्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानशी भारताची मैत्री कधीही होणार नाही असे रामदास आठवले यावेळी म्हणाले.


'भारत नाही कुणाचा गुलाम,
म्हणून आम्ही करीत आहोत
देशासाठी बलिदान देणाऱ्यांना सलाम...'


असे सांगत रामदास आठवले यांनी देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांचा महाराजा हरिसिंह डोगरा पुरस्काराने सन्मान केला. त्यात बी एस एफ; सी आर पी एफ च्या शहीद जवानांच्या कुटुंबियांचा समावेश होता. यावेळी २६/ ११ मुंबई हल्ल्यावेळी अनेकांचे प्राण वाचविणारे पोलिस सबइन्स्पेक्टर मंगेश नाईक यांचा महाराज हरिसिंह डोगरा पुरस्काराने रामदास आठवले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.


माजी राज्यपाल आणि भारताच्या पहिल्या महिला आयपीएस किरण बेदी या आपल्या शिस्तप्रिय कर्तृत्वासाठी लोकप्रिय होत्या. दिल्लीत आयपीएस म्हणून कर्तव्य बजावताना त्यांनी तत्कालीन पंतप्रधानांची गाडी जेसीबीने उचलून नेऊन कारवाई केली होती. याची आठवण सांगताना रामदास आठवले यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्या विकासाची गाडी कोणी अडवू शकत नाही. विकासाच्या दिशेने भरधाव वेगाने मोदींची विकासाची गाडी पुढे चालली आहे, अशी टिप्पणी केली. तसेच शिस्तप्रिय कर्तव्य कठोर अधिकारी म्हणून किरण बेदी यांचा महाराज हरिसिंह डोगरा पुरस्काराने गौरव केला. जम्मू काश्मीर मधून कलम ३७० हटविल्यामुळे येथील पोलिस बीएसएफ यांना अधिकारी मिळाले आहेत. त्यामुळे पूर्वीपेक्षा तुलनेने जम्मू काश्मीरमध्ये चांगली शांतता वाढत आहे. दहशतवाद कमी होत आहे. जम्मू काश्मीरमधून दहशतवाद नष्ट करायचा आहे आणि ते लवकरच केंद्र आणि राज्य सरकार परस्पर समन्वयातून करून दाखवेल, असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती

Strait of Hormuz : होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय नाविकांच्या तैनातीला मनाई

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर डीजीएमएचा मोठा निर्णय नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या

Narendra Modi : पंतप्रधान मोदी शुक्रवारी देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनला दाखवणार हिरवा झेंडा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी हरियाणातील जिंद रेल्वे स्थानकावरून जिंद आणि सोनीपत दरम्यान

Solar Eclipse : ऑगस्टमध्ये खग्रास सूर्यग्रहण; भारतातून दिसणार की नाही ? युरोपमधून दिसेल दुर्मिळ खगोलीय दृश्य !

नवी दिल्ली : तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा खग्रास सूर्यग्रहणाचे साक्षीदार होण्याची संधी जगाला मिळणार आहे.