PM Surya Ghar yojana : 'पंतप्रधान सूर्य घर' योजनेत महाराष्ट्राची बाजी

- उत्तर प्रदेश, गुजरातला टाकले मागे; चार महिन्यांत १ लाख ८ हजार घरांवर सौर यंत्रणा


मुंबई : स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेच्या दिशेने सुरू असलेल्या 'पंतप्रधान सूर्य घर : मोफत वीज' योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राने देशात अव्वल स्थान पटकावले आहे. निवासी घरांच्या छतावर सौर यंत्रणा बसविण्यात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरले असून, देशातील एकूण सौर संचांपैकी सुमारे २० टक्के वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली.


नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या अवघ्या पाच महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्रात १ लाख ८ हजार ३२७ घरांमध्ये सौर यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. राज्याने या कामगिरीच्या जोरावर उत्तर प्रदेश आणि गुजरात सारख्या सौर ऊर्जेत आघाडीवर असलेल्या राज्यांनाही मागे सारले आहे.


महाराष्ट्रातील सौर यंत्रणांच्या स्थापनेचा वेग लक्षवेधी आहे. ताज्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्राने उत्तर प्रदेश (९५ हजार ६६५) आणि गुजरात (९४ हजार ३६४) या राज्यांवर मात केली आहे. विशेष म्हणजे, राजस्थान, आसाम, छत्तीसगड आणि ओडिशा या चार राज्यांची एकत्रित आकडेवारी गृहीत धरली, तरी महाराष्ट्रातील सौर संचांची संख्या त्यापेक्षा जास्त आहे. केरळ, मध्य प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीर या पाच राज्यांच्या एकत्रित संख्येपेक्षाही महाराष्ट्र सौर ऊर्जेच्या प्रसारात आघाडीवर आहे.



शाश्वत ऊर्जेला प्राधान्य :


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या योजनेमुळे नागरिकांना मोफत किंवा स्वस्त वीज मिळण्यासोबतच कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत होत आहे. "पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे देशात स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढला असून, महाराष्ट्राने या मोहिमेत अग्रस्थान मिळवून देशाला नवी दिशा दिली आहे," असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.



कोणत्या राज्यात किती सौर यंत्रणा?


महाराष्ट्र : १,०८,३२७
उत्तर प्रदेश : ९५,६६५
गुजरात : ९४,३६४
आंध्र प्रदेश : ३०,९१५
राजस्थान : ३९,४८४

Comments
Add Comment

भव्य राष्ट्रध्वज नागपूरच्या राष्ट्राभिमानाचे प्रतीक ठरेल - मुख्यमंत्री फडणवीस

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांची आहुती दिली याचा प्रत्येक

Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी २२,१८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

- त्र्यंबक-नाशिकचा कुंभमेळा जगाला आकर्षण वाटणारा असावा - मुख्यमंत्री फडणवीस त्र्यंबक - नाशिक मध्ये सिंहस्थ

धामणगाव गढी परिसरात चक्क अस्वलाचा मुक्त संचार सीसीटीव्हीत कैद; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव गढी परिसरात अस्वलाचा मुक्त संचार आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

युद्धामुळे वाढली शेणाच्या गोवऱ्यांची किंमत

मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या संघर्षाचे परिणाम आता इंधन पुरवठ्यावरही दिसू लागले आहेत. इराण,

उन्हाळी सुट्टीत प्रवाशांना दिलासा: मुंबई, पुणे, सोलापूरसह अनेक मार्गांवर उन्हाळी धावणार स्पेशल ट्रेन

पुणे : उन्हाळ्याचे दिवस म्हणजेच सुट्टीचे दिवस, वर्षभर अभ्यास करून दमलेल्या मुलांच्या उन्हाळ्यात परीक्षा संपतात

आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष