येत्या ३१ मार्च २०२६ पूर्वी पाण्याचे बिल न भरल्यास पाण्याची लाइन कापणार

मुंबई: महानगरपालिकेमार्फत नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यात येत असून सर्व जलजोडणीधारकांनी प्रलंबित जलदेयकाचा भरणा येत्या ३१ मार्च २०२६ पूर्वी करावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्‍यात येत आहे. निर्धारित मुदतीत प्रलंबित जल देयकाचा भरणा न केल्यास जलजोडणी खंडित करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा देण्‍यात आला आहे.


महानगरपालिका जल अभियंता खात्याने थकीत जल देयकांच्या वसुलीच्या दृष्टीने व्यापक मोहीम हाती घेतली आहे. नागरिकांना जल देयकांचा भरणा करणे सुलभ व्हावे, ह्या दृष्टीकोनातून नजीकच्या विभाग कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रावर सुविधा करून देण्‍यात आली आहे. तसेच, महानगरपालिकेच्या https://aquaptax.mcgm.gov.in या संकेतस्थळावरही जल देयक भरणा करता येणार आहे. या संकेतस्थळावर जाऊन नागरिकांकरिता → लॉग इन → पाणी विभाग या मार्गाने जलदेयकाची माहिती पाहून भरणा करण्याची सुविधा उपलब्ध आहे.


याखेरीज, एनईएफटी (NEFT), ऑनलाईन पेमेंट (Online Payment), मोबाईल ऍप (Mobile App) यांसारख्या डिजिटल माध्यमांतून जल देयके भरण्‍याची सुविधा उपलब्‍ध आहे.


निर्धारित मुदतीत म्‍हणजेच ३१ मार्च २०२६ पूर्वी प्रलंबित जलदेयकाचा भरणा न केल्यास संबंधित जलजोडणी खंडित करण्याची कार्यवाही करण्यात येऊ शकते. त्यामुळे सर्व जलजोडणीधारकांनी ही बाब लक्षात घेऊन वेळेत जलदेयक भरावे, असे आवाहन करण्यात येत आहे.


ज्या जलजोडणीधारकांना जलदेयके प्राप्त झाली नसतील त्यांनी आपल्या प्रशासकीय विभाग कार्यालयात (वॉर्ड ऑफिस) संपर्क साधावा. नागरिकांना महानगरपालिकेच्या ऍक्‍वा संकेतस्थळावरून किंवा संबंधित सहाय्यक अभियंता (जलकामे) कार्यालयातून जलदेयकाची प्रत उपलब्ध करून घेता येईल, अशी माहितीही महानगरपालिका प्रशानाकडून देण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Casting Yard Accident : दहिसर - भाईंदर जोड मार्ग कास्टिंग यार्ड दुर्घटना, VJTI मार्फत चौकशी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : दहिसर - भाईंदर जोड मार्ग कास्टिंग यार्ड येथे आज प्लॅटफॉर्म कोसळून दोन कामगारांचा मृत्यू

Nails Free Tree : मुंबईतील १०७१ झाडे काँक्रीटमुक्त, झाडांवरील ५० किलो खिळ्यांच्या वेदनांचा भार केला हलका

मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : शहरातील पर्यावरण संवर्धनासाठी राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत मोठे यश मिळत असून, वृक्ष

Rahul Narvekar : शिक्षक केवळ वाचायला शिकवत नाही, तर समाज घडवतो आणि वाचवतो" - राहुल नार्वेकर यांचे गौरवोद्गार

मुंबई : "शिक्षक हा केवळ अक्षरांची ओळख करून देणारा घटक नाही, तर तो खऱ्या अर्थाने समाज घडवणारा आणि संकटाच्या काळात

Mohan Bhagwat : अस्थिर जगाचा आधार केवळ भारतच; पण त्यासाठी शेवटच्या घटकाचा विकास हवा" – डॉ. मोहन भागवत

आदिवासी अस्मिता हीच देशाची ओळख"; कर्मयोगी एकल शिक्षक मेळाव्यात डॉ. मोहन भागवत यांचे प्रेरक उद्गार सत्ता नव्हे, तर

First Tribal University : विदर्भात साकारणार देशातील पहिले आदिवासी विद्यापीठ

५०० कोटींच्या प्रकल्पातून शैक्षणिक क्रांतीचे नवे पर्व मुंबई : गेल्या तीन दशकांपासून आदिवासी आणि दुर्गम भागात

BMC News : मुंबईच्या महापौर रस्ते आणि नालेसफाईच्या पाहणी मोहिमेवर

रस्ते कामांचा वेग वाढवताना बांधकामात आणि दर्जा राखण्यात हयगय नको; प्रशासनाला दिले निर्देश मुंबई : रस्त्यांची