Gas Cylinder: गॅस नियमांत मोठे बदल; पुण्यातील 'या' ग्राहकांना आता मिळणार नाही गॅस सिंलिंडर

पुणे: तुम्ही जर घरगुती गॅस सिलिंडर वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आतापासून KYC (केवायसी) प्रक्रिया पूर्ण नसलेल्या ग्राहकांना गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय गॅस कंपन्यांनी घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आता अनेक ठिकाणी सुरू झाली असून, केवायसी नसल्यास तुमचे गॅस बुकिंग ऑनलाइन स्वीकारले जाणार नाही. त्यामुळे ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करणं बंधनकारक आहे.


केवायसीसोबतच गॅस वितरणाबाबत आणखी एक मोठा बदल करण्यात आला आहे. आता दोन सिलिंडर बुक करण्यामधील कालावधी २१ दिवसांवरून थेट ३० दिवसांपर्यंत वाढवण्यात आला आहे. म्हणजेच, एकदा सिलिंडर घेतल्यानंतर आता तुम्हाला पुढील बुकिंगसाठी किमान ३० दिवस वाट पाहावी लागणार आहे. या नियमामुळे ग्राहकांच्या प्रतीक्षा कालावधीत आठ दिवसांची वाढ झाली असून, याचा थेट परिणाम गॅसच्या उपलब्धतेवर होणार आहे.


आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठा साखळीवर मोठा ताण आला आहे. कच्च्या तेलाच्या किमती आणि पुरवठ्यातील अनिश्चिततेमुळे एलपीजी सिलिंडरच्या उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वितरकांनी स्पष्ट केले आहे की, प्रलंबित केवायसी आणि वाढती मागणी यामुळे वितरण व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे.


नागरिकांनी गॅसचा वापर काटकसरीने करावा आणि आपल्या जवळच्या वितरकाकडे जाऊन तातडीने केवायसी अपडेट करून घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. अन्यथा, गॅस बुकिंगमध्ये तुम्हालाही मोठा मनस्ताप सहन करावा लागू शकतो.

Comments
Add Comment

LPG Booking Rule : LPG सिलेंडरच्या बुकिंग कालावधीत वाढ; किती दिवसांनी दुसरा बुक करता येणार?

मुंबई : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या इराण-इस्त्रायलच्या संघर्षाचा फटका आता भारताला बसत असल्याचं दिसून येतं

अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत भीषण आग; स्फोटानंतर आगीचा भडका होताच कामगार धावले

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये होणाऱ्या स्फोटावरुन सातत्याने येथील सुरक्षेचा

राज्यातील प्रलंबित मुद्रांक प्रकरणांचा निपटारा जलद; 'महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक २०२६' मंजूर

मुंबई: राज्यातील मुद्रांक शुल्क विभागातील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा जलद गतीने होण्यासाठी तसेच, प्रशासकीय

मत्स्य व्यवसाय विभागात डिजिटल क्रांती; मंत्री नितेश राणे यांची संकल्पना

मुंबई: आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन मत्स्य व्यवसाय विभागात डिजिटल क्रांती घडवण्याचा निर्णय मत्स्यव्यवसाय आणि

Miss India Earth 2019 : आतिफशी लग्न, मग धर्म परिवर्तन, आणि पुन्हा हिंदू धर्म.... या मिस इंडियाने पुन्हा स्वीकारला हिंदू धर्म

पुणे : ‘मिस इंडिया अर्थ २०१९’ किताब जिंकलेली सायली सुर्वे सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सायली

म्युनिसिपल बाँडच्या माध्यमातून नाशिकच्या विकासाला गती!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे 'महाराष्ट्राच्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा (ULB) ग्रीन