कधी आहे पापमोचनी एकादशी ? काय आहे या दिवसाचे महत्त्व ? कशी करावी या दिवशी पूजा ?

मुंबई : हिंदू पंचांगाप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील अकरावी तिथी म्हणजे एकादशी. हा दिवस भगवान विष्णूच्या उपासनेसाठी, आध्यात्मिक शुद्धीसाठी आणि शारीरिक-मानसिक नियंत्रणासाठी उपवास करण्याकरिता अतिशय पवित्र दिवस म्हणून ओळखला जातो. दरवर्षी २४ वेळा एकादशी येते. विष्णूला प्रसन्न करण्यासाठी एकादशीला उपवास आणि विष्णूचे नामस्मरण करतात. महाराष्ट्रात आषाढी एकादशी (देवशयनी) आणि कार्तिकी एकादशी (प्रबोधिनी) या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. या दिवशी पंढरपूरची वारी केली जाते. इतर एकादशींना उपवास आणि विष्णूचे नामस्मरण करतात. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी एकादशी ही 'पापमोचनी एकादशी' म्हणून ओळखली. पापातून मुक्तता मिळवण्यासाठी या एकादशीला उपवास आणि विष्णूचे नामस्मरण करतात.


यंदा हिंदू पंचांगाप्रमाणे अर्थात हिंदू कॅलेंडरप्रमाणे रविवार १५ मार्च २०२६ रोजी 'पापमोचनी एकादशी' आहे. 'पापमोचनी एकादशी' शनिवार १४ मार्च २०२६ रोजी सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी सुरू होईल आणि रविवार १५ मार्च २०२६ रोजी सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटांनी संपेल. उदय तिथीनुसार पापमोचनी एकादशीचे व्रत रविवार १५ मार्च रोजी करायचे आहे. उपवास सोमवार १६ मार्च २०२६ रोजी सकाळी साडेसहा ते आठ वाजून चोपन्न मिनिटे या कालावधीत सोडता येईल.


नकळत घडलेल्या चुका, मानसिक क्लेश आणि पापांच्या भारातून मुक्त होण्यासाठी पापमोचनी एकादशीला उपवास आणि विष्णूचे नामस्मरण करतात. ही एकादशी हिंदू पंचांगानुसार वर्षातली शेवटची एकादशी म्हणून ओळखली जाते. वर्षभरातील नकारात्मकता नष्ट करण्यासाठी पापमोचनी एकादशीचे व्रत म्हत्त्वाचे मानले जाते. ब्रह्मपुराणात या एकादशीचा उल्लेख आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा करतात. यासाठी आंघोळ करुन धूत वस्त्र अथवा सोवळे नेसून संकल्प करतात. शुद्ध तुपाचा दिवा लावून विष्णूची प्रतिमा किंवा मूर्ती याची प्रतिष्ठापना करतात. मूर्तीला पंचामृताने स्नान घालतात. नंतर विष्णूला तुळशीची पानं अर्पण करतात. विष्णूसहस्त्रनामाचा जप करतात. विष्णूच्या कथांचे वाचन करतात. उपवास करतात किंवा ताज्या फळांचे सेवन करतात. विष्णूचे नामस्मरण करतात. या व्रताला मनापासून केले तर आर्थिक, सामाजिक, मानसिक प्रगती होते असे सांगतात. अडचणींमधून मार्ग निघतो असेही सांगतात. यामुळे ज्यांची श्रद्धा आहे अशी मंडळी मनापासून हे व्रत करतात.


ही संकलित माहिती आहे. प्रयोग करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे आहे.

Comments
Add Comment

Rachin Ravindra : केकेआरला मोठा धक्का ! एकही सामना न खेळता स्टार खेळाडू हंगामातून बाहेर

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये केकेआरने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. या हंगामात ११ पैकी चार सामने जिंकत ९ गुण मिळवले

IPL 2026 : प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी चेन्नईच्या संघात कुलदीप यादवची एन्ट्री तर RCB मध्येही मोठा बदल

चेन्नई : आयपीएलच्या १९ व्या हंगामात प्लेऑफमध्ये कोणते संघ पोहोचणार याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

New Jail In Mumbai : मुंबईत मानखुर्द परिसरात ११ एकर भूखंडावर उभारणार नवे कारागृह

मुंबई : राज्यातील कारागृहांवरील वाढता ताण आणि कैद्यांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबईतील घाटकोपर-मानखुर्द

France Football : फ्रान्सचा वर्ल्ड कप संघ जाहीर; कीलीयन मबंप्पेला कर्णधारपद ,कोलो मुआनी संघाबाहेर

पॅरिस : आगामी 2026 FIFA World Cup साठी फ्रान्सने २६ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. २०२२ च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिना विरुद्ध

Kireon Pollard: मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! कायरन पोलार्डवर BCCI ची कारवाई

IPL 2026 : यंदाच्या आयपीएलमधील ५८ व्या साखळी सामन्यात अर्थात लीग मॅचमध्ये मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सचा पराभव केला.

Minister Chhagan Bhujbal : दुसऱ्या टप्प्यात जातनिहाय गणना होणार; मंत्री छगन भुजबळ यांना केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांचे पत्र

जातीनिहाय जनगणनेचा संभ्रम दूर मुंबई : जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील प्रश्नावलीत ओबीसींचा कॉलम नसल्याने