कधी आहे पापमोचनी एकादशी ? काय आहे या दिवसाचे महत्त्व ? कशी करावी या दिवशी पूजा ?

मुंबई : हिंदू पंचांगाप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील अकरावी तिथी म्हणजे एकादशी. हा दिवस भगवान विष्णूच्या उपासनेसाठी, आध्यात्मिक शुद्धीसाठी आणि शारीरिक-मानसिक नियंत्रणासाठी उपवास करण्याकरिता अतिशय पवित्र दिवस म्हणून ओळखला जातो. दरवर्षी २४ वेळा एकादशी येते. विष्णूला प्रसन्न करण्यासाठी एकादशीला उपवास आणि विष्णूचे नामस्मरण करतात. महाराष्ट्रात आषाढी एकादशी (देवशयनी) आणि कार्तिकी एकादशी (प्रबोधिनी) या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. या दिवशी पंढरपूरची वारी केली जाते. इतर एकादशींना उपवास आणि विष्णूचे नामस्मरण करतात. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी एकादशी ही 'पापमोचनी एकादशी' म्हणून ओळखली. पापातून मुक्तता मिळवण्यासाठी या एकादशीला उपवास आणि विष्णूचे नामस्मरण करतात.


यंदा हिंदू पंचांगाप्रमाणे अर्थात हिंदू कॅलेंडरप्रमाणे रविवार १५ मार्च २०२६ रोजी 'पापमोचनी एकादशी' आहे. 'पापमोचनी एकादशी' शनिवार १४ मार्च २०२६ रोजी सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी सुरू होईल आणि रविवार १५ मार्च २०२६ रोजी सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटांनी संपेल. उदय तिथीनुसार पापमोचनी एकादशीचे व्रत रविवार १५ मार्च रोजी करायचे आहे. उपवास सोमवार १६ मार्च २०२६ रोजी सकाळी साडेसहा ते आठ वाजून चोपन्न मिनिटे या कालावधीत सोडता येईल.


नकळत घडलेल्या चुका, मानसिक क्लेश आणि पापांच्या भारातून मुक्त होण्यासाठी पापमोचनी एकादशीला उपवास आणि विष्णूचे नामस्मरण करतात. ही एकादशी हिंदू पंचांगानुसार वर्षातली शेवटची एकादशी म्हणून ओळखली जाते. वर्षभरातील नकारात्मकता नष्ट करण्यासाठी पापमोचनी एकादशीचे व्रत म्हत्त्वाचे मानले जाते. ब्रह्मपुराणात या एकादशीचा उल्लेख आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा करतात. यासाठी आंघोळ करुन धूत वस्त्र अथवा सोवळे नेसून संकल्प करतात. शुद्ध तुपाचा दिवा लावून विष्णूची प्रतिमा किंवा मूर्ती याची प्रतिष्ठापना करतात. मूर्तीला पंचामृताने स्नान घालतात. नंतर विष्णूला तुळशीची पानं अर्पण करतात. विष्णूसहस्त्रनामाचा जप करतात. विष्णूच्या कथांचे वाचन करतात. उपवास करतात किंवा ताज्या फळांचे सेवन करतात. विष्णूचे नामस्मरण करतात. या व्रताला मनापासून केले तर आर्थिक, सामाजिक, मानसिक प्रगती होते असे सांगतात. अडचणींमधून मार्ग निघतो असेही सांगतात. यामुळे ज्यांची श्रद्धा आहे अशी मंडळी मनापासून हे व्रत करतात.


ही संकलित माहिती आहे. प्रयोग करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे आहे.

Comments
Add Comment

Pune Crime : धक्कादायक ! शरीरात दैवी शक्तीचा वास असल्याचं भासवून महिलेवर अत्याचार

पुणे : पुण्यामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरात एका भोंदूबाबानं चक्क अंगात देवी

Raja Shivaji : आशा भोसलेंच्या निधनानं सिनेसृष्टीवर शोककळा, 'राजा शिवाजी' सिनेमाबद्दल रितेशनं घेतला 'हा' मोठा निर्णय

मुंबई : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या बहुप्रतिक्षित सिनेमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत होते. या सिनेमाचा

Solapur News : झाडाला बांधलेली दोरी सुटली आणि... सख्ख्या भावंडांवर काळाचा घाला

सोलापूर : सोलापूर तालुक्यातील औज मंद्रूप परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. अंकलगी वस्तीवरील शेततळ्यात बुडून

Mumbai Local : आता पश्चिम रेल्वेचा प्रवास होणार अधिक सोयीस्कर, लवकरच या स्थानकांवर धावणार 15 डब्यांची लोकल

मुंबई : पश्चिम रेल्वेचा प्रवास लवकरच अधिक सोयीस्कर होणार आहे. पश्चिम रेल्वेवरील विरार ते डहाणूदरम्यान १९९४

Asha Bhosle : दुसरा जन्म मिळाला तर, पुन्हा आशा भोसलेच व्हायला आवडेल का?

गायिका आशा भोसले यांना एकदा मुलाखतीमध्ये विचारलेले की, दुसरा जन्म मिळाला तर तुम्हाला आशा भोसलेच व्हायला आवडेल

पं. हृदयनाथ मंगेशकरांचे भाषण अन् भावविवश आशाताई

'स्वरस्वामिनी आशा' या पुस्तकाचे प्रकाशन विले पार्लेतील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात राष्ट्रीय सरसंघचालक मोहन