धारावीतील ४३६ झोपडपट्टीधारकांचे देवनार येथे पुनर्वसन

मुंबई : धारावी येथे १९९९ साली लागलेल्या भीषण आगीत बाधित झालेल्या ‘राजीव गांधी एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्थे’तील ४३६ पात्र झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी देवनार येथील सर्व्हे क्रमांक ९३ मधील सुमारे ११ हजार ६५९ चौरस मीटर शासकीय जमीन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला (एसआरए) देण्यास गुरुवारी मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारातून हा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याने धारावीतील आगग्रस्त कुटुंबांच्या पुनर्वसन प्रक्रियेला गती मिळणार आहे. धारावी परिसरात १९९९ साली लागलेल्या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्या होत्या. या घटनेत बाधित झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी ‘राजीव गांधी एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्था’ स्थापन करण्यात आली होती. मात्र पुनर्वसनासाठी आवश्यक जमीन उपलब्ध नसल्याने हा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित राहिला होता.


आता देवनार येथील सर्व्हे क्रमांक ९३ मधील शासकीय जमीन एसआरएकडे वर्ग करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्यामुळे या ४३६ पात्र झोपडपट्टीधारकांच्या घरांच्या पुनर्वसन प्रकल्पाला गती मिळणार आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आगग्रस्त कुटुंबांना सुरक्षित आणि कायमस्वरूपी निवारा उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेला आता वेग मिळणार असून धारावी परिसरातील पुनर्वसनाच्या प्रयत्नांना महत्त्वपूर्ण चालना मिळेल, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.

Comments
Add Comment

भटक्या श्वानांच्या नसबंदीकरण केंद्रांची क्षमता वाढवा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील भटक्या श्वानांचे नियंत्रण, निर्बीजीकरण, रेबीज प्रतिबंधक लसीकरण यासाठी

मुंबईच्या एफ दक्षिण आणि एफ उत्तर प्रभाग समितीमध्ये शिवसेनेच्या मानसी सातमकर यांचा विजय

मुंबई : मुंबई महापालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी गुरुवारी १७ प्रभाग समित्यांपैंकी ६ प्रभाग

मत्स्यव्यवसाय आणि जल संवर्धन क्षेत्राचा वृद्धीदर ८.४ टक्क्यांवर

मुंबई : महाराष्ट्राच्या मत्स्य व्यवसाय क्षेत्रात गेल्या काही वर्षांत अत्यंत सकारात्मक बदल दिसून येत असून,

मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्थानकात आता 'आरोग्य कवच'

मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गांवरील वाढते अपघात आणि प्रवाशांचा जीवघेणा प्रवास रोखण्यासाठी राज्य सरकारने विशेष

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवार ६ मार्च रोजी मांडणार राज्याचा अर्थसंकल्प

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, शुक्रवारी ६ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र

लक्षवेधींची संख्या कमी केल्याने सत्ताधारी आणि विरोधी आमदारांकडून नाराजी

गटनेत्यांची बैठक घेणार; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आश्वासन मुंबई : राज्य विधिमंडळाच्या