मत्स्यव्यवसाय आणि जल संवर्धन क्षेत्राचा वृद्धीदर ८.४ टक्क्यांवर

मुंबई : महाराष्ट्राच्या मत्स्य व्यवसाय क्षेत्रात गेल्या काही वर्षांत अत्यंत सकारात्मक बदल दिसून येत असून, राज्याच्या अर्थव्यवस्थेत या क्षेत्राचा मोठा वाटा अधोरेखित झाला आहे. २०२४-२५ या वर्षात राज्याच्या एकूण मत्स्य उत्पादनात लक्षणीय वाढ झाली असून, मासेमारी आणि जल संवर्धन क्षेत्राचा अपेक्षित वृद्धीदर ८.४ टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातून हे आशादायक चित्र समोर आले आहे.


राज्यात २०२३-२४ मध्ये एकूण ७ लाख मेट्रिक टन मत्स्य उत्पादन झाले होते, त्यामध्ये वाढ होऊन २०२४-२५ मध्ये हे उत्पादन ७.३२ लाख मेट्रिक टन इतके झाले आहे. यामध्ये ४.६३ लाख मे. टन सागरी मासेमारीचा, तर २.६९ लाख मे. टन वाटा गोड्या पाण्यातील मासेमारीचा आहे. विशेष म्हणजे, उत्पादनाच्या मूल्यात मोठी झेप पाहायला मिळाली असून, गेल्या वर्षीच्या १० हजार ३४७ कोटी रुपयांच्या तुलनेत यंदा हे मूल्य १२ हजार ६७५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. उत्पादनात वाढ झाली असली तरी निर्यातीच्या प्रमाणात काहीशी घट झाली आहे. २०२३-२४ मधील २.४६ लाख मेट्रिक टन निर्यातीवरून २०२४-२५ मध्ये हा आकडा २.२३ लाख मेट्रिक टन इतका नोंदवण्यात आला. मात्र, जागतिक बाजारातील दरामुळे निर्यातीचे मूल्य ६ हजार ५८२ कोटींवरून ७ हजार ३४३ कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीत अधिक परकीय चलन जमा करण्यात यश आले आहे.


पायाभूत सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञानावर भर


राज्याला लाभलेल्या ७२० किमी लांबीच्या किनारपट्टीवर १७३ मासेमारी केंद्रे कार्यरत आहेत. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजने'ची मुदत २०२५-२६ पर्यंत वाढवण्यात आल्याने या क्षेत्राला अधिक बळकटी मिळणार आहे. राज्यातील १०५ जलाशयांमध्ये १० हजार ८० पिंजरे बसवण्यात आले असून, त्यातून २६ हजार २३४ मेट्रिक टन उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत ६ जेटींच्या विकासासाठी १०७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, त्यापैकी ४ जेटींची कामे यशस्वीरित्या पूर्ण झाली आहेत. राज्यात सध्या १३ हजार ८३१ यांत्रिक नौका असून सागरी मासेमारीसाठी १.१२ लाख चौ. किमी क्षेत्र उपलब्ध आहे. तसेच गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी ४ लाख हेक्टर क्षेत्र उपलब्ध असून, वार्षिक मत्स्यबीज उत्पादन क्षमता १८०.२५ कोटी इतकी आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

भटक्या श्वानांच्या नसबंदीकरण केंद्रांची क्षमता वाढवा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील भटक्या श्वानांचे नियंत्रण, निर्बीजीकरण, रेबीज प्रतिबंधक लसीकरण यासाठी

मुंबईच्या एफ दक्षिण आणि एफ उत्तर प्रभाग समितीमध्ये शिवसेनेच्या मानसी सातमकर यांचा विजय

मुंबई : मुंबई महापालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी गुरुवारी १७ प्रभाग समित्यांपैंकी ६ प्रभाग

मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्थानकात आता 'आरोग्य कवच'

मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गांवरील वाढते अपघात आणि प्रवाशांचा जीवघेणा प्रवास रोखण्यासाठी राज्य सरकारने विशेष

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवार ६ मार्च रोजी मांडणार राज्याचा अर्थसंकल्प

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, शुक्रवारी ६ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र

लक्षवेधींची संख्या कमी केल्याने सत्ताधारी आणि विरोधी आमदारांकडून नाराजी

गटनेत्यांची बैठक घेणार; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आश्वासन मुंबई : राज्य विधिमंडळाच्या

भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईच्या अध्यक्षपदी दीपक सिंह यांची नियुक्ती

मुंबई : भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईचे महामंत्री दीपक आजाद सिंह यांची आज पक्षाचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम